शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:55 IST

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

ठळक मुद्देलोकमान्य टिळक स्मारकातील कार्यक्रमसावरकरांचा सहवास लाभलेल्या कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

धामणी-संगमेश्वरचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांच्या समाजसुधारक सावरकर या विषयावरील व्याख्यानाने उपस्थितांची कोजागिरी पौर्णिमेची सायंकाळ संस्मरणीय झाली.या कार्यक्रमाला सावरकरांचा सहवास लाभलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांचा सहभाग होता. वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी परिघाबाहेरचे कार्यक्रम कोणी करत नाही म्हणून आपण करायचे अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या विविधांगी कार्यक्रमांमागील भूमिका मांडली.

वाचनालयाने सावरकरांच्या माझे मृत्यूपत्र कवितेतील,की घेतले न हे व्रत अंधतेने ।लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने ।जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे ।बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ।

या पंक्तींचे शब्दशिल्प बनवून ते वाचनालयाच्या प्रवेद्वारापाशी लावले आहे. चिपळूणच्या जुन्या पद्मा थिएटर परिसरातील सावरकरांचे भाषण, सभा, स्वागत आणि सत्कार याची आठवणही इंगवले यांनी सांगितली.ज्यांच्या हस्ते काव्यशब्दशिल्पचे अनावरण झाले त्या उन्मेश शिंदे यांचे आजोबा हिंदू महासभेचे अध्यक्ष आणि भागोजीशेठ कीर यांचे वर्गमित्र होते. त्यांनी तत्कालिन आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बेहेरे यांनी सन १९५६ साली सावरकर आपल्या घरी आल्याची आठवण सांगताना तेव्हाचा फोटोही जपून ठेवल्याचे सांगितले.श्रीनिवास पेंडसे समाजसुधारक सावरकर या विषयावर बोलताना म्हणाले की, इतिहासात अनेक घटना घडतात. मात्र, इतिहासासकडे दुर्लक्ष केल्याने भविष्य अंधारमय होतं. त्यांनी सावरकरांच्या ह्यसहा सोनेरी पानेह्णचा दाखला यावेळी दिला. भेदनीती, वर्णव्यवस्था यामुळे भारत अनेकदा पारतंत्र्यात गेला. सन १९०२ साली वयाच्या १९ व्या वर्षी सावरकरांनी बालविधवा दु:स्थितीकथन कविता लिहिली. सन १९२४ नंतर ते समाजसुधारणेकडे वळले असले तरी त्यांचा लढा तत्पूर्वीपासूनच सुरु होता, असे सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरी