शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:55 IST

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

ठळक मुद्देलोकमान्य टिळक स्मारकातील कार्यक्रमसावरकरांचा सहवास लाभलेल्या कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी उभारण्यात आलेल्या विज्ञाननिष्ठ वीरपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या काव्यशब्दशिल्पचा अनावरण सोहोळा रविवारी सायंकाळी पतित पावन मंदिराचे विश्वस्त उन्मेष शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

धामणी-संगमेश्वरचे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे व्यासंगी अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांच्या समाजसुधारक सावरकर या विषयावरील व्याख्यानाने उपस्थितांची कोजागिरी पौर्णिमेची सायंकाळ संस्मरणीय झाली.या कार्यक्रमाला सावरकरांचा सहवास लाभलेल्या कुटुंबियांच्या सदस्यांचा सहभाग होता. वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांनी परिघाबाहेरचे कार्यक्रम कोणी करत नाही म्हणून आपण करायचे अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या विविधांगी कार्यक्रमांमागील भूमिका मांडली.

वाचनालयाने सावरकरांच्या माझे मृत्यूपत्र कवितेतील,की घेतले न हे व्रत अंधतेने ।लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने ।जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे ।बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ।

या पंक्तींचे शब्दशिल्प बनवून ते वाचनालयाच्या प्रवेद्वारापाशी लावले आहे. चिपळूणच्या जुन्या पद्मा थिएटर परिसरातील सावरकरांचे भाषण, सभा, स्वागत आणि सत्कार याची आठवणही इंगवले यांनी सांगितली.ज्यांच्या हस्ते काव्यशब्दशिल्पचे अनावरण झाले त्या उन्मेश शिंदे यांचे आजोबा हिंदू महासभेचे अध्यक्ष आणि भागोजीशेठ कीर यांचे वर्गमित्र होते. त्यांनी तत्कालिन आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश बेहेरे यांनी सन १९५६ साली सावरकर आपल्या घरी आल्याची आठवण सांगताना तेव्हाचा फोटोही जपून ठेवल्याचे सांगितले.श्रीनिवास पेंडसे समाजसुधारक सावरकर या विषयावर बोलताना म्हणाले की, इतिहासात अनेक घटना घडतात. मात्र, इतिहासासकडे दुर्लक्ष केल्याने भविष्य अंधारमय होतं. त्यांनी सावरकरांच्या ह्यसहा सोनेरी पानेह्णचा दाखला यावेळी दिला. भेदनीती, वर्णव्यवस्था यामुळे भारत अनेकदा पारतंत्र्यात गेला. सन १९०२ साली वयाच्या १९ व्या वर्षी सावरकरांनी बालविधवा दु:स्थितीकथन कविता लिहिली. सन १९२४ नंतर ते समाजसुधारणेकडे वळले असले तरी त्यांचा लढा तत्पूर्वीपासूनच सुरु होता, असे सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकRatnagiriरत्नागिरी