शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

मदतीअभावी प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू

By admin | Updated: May 31, 2014 01:18 IST

काळिमा फासणरी घटना

आरवली : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य एस. टी.चे कर्मचारी सदैव जपत असतात. मात्र, त्याला काळिमा फासणरी घटना आज पुणे - रत्नागिरी गाडीमध्ये घडली. चिपळूण ते रत्नागिरी असा प्रवास करीत असताना मदतीचा हात वेळेत न मिळाल्याने विवेक रेवाळे (४५, मूळ गाव नाणीज, रा. रत्नागिरी, उत्कर्षनगर) या प्रवाशाचा मृत्यू झाला. रेवाळे व प्रकाश यादव (मूळ गाव मलकापूर, रा. रत्नागिरी) हे मेयर आॅर्गेनिक कंपनी, ठाणेसाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतात. आज चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान असा प्रवास करीत होते. नेहमीप्रमाणे ते वेगवेगळ्या सीटवर बसले होते. रेवाळे यांना अस्वस्थ वाटू लागल्याची जाणीव त्यांच्या बाजूच्या प्रवाशाला झाली असताना त्यांनी याबाबत शेजार्‍यांना कल्पना दिली. त्यांच्या नाका-तोंडातून फेस आलेला पाहून प्रकाश घाबरला. त्याने एस. टी. चालकाकडे मदतीची याचना केली. विवेकला रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली. मात्र, या चालक -वाहकांनी त्या दोघांना तुरळ येथे उतरण्यास सांगितले. ग्रामस्थांनी जवळ रुग्णालय असल्याची कल्पना चालक - वाहकांना देऊनही या दोन्ही प्रवाशांना तुरळ येथे उतरवून गाडी निघून गेली. या दरम्यान तुरळ येथे रिक्षा उपलब्ध नव्हती. थोड्या वेळाने रिक्षा उपलब्ध झाल्यावर रिक्षाचालक शैलेश शिंदे याने ग्रामस्थांच्या मदतीने विवेकला कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, त्यापूर्वीच विवेकची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची खबर मिळताच मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, शिवसेना उपविभाग अध्यक्ष वसंत उजगावकर यांनी रुग्णालयात धाव घेतली व झाल्या प्रकाराची कल्पना दूरध्वनीवरुन विभाग नियंत्रक देशमुख यांना दिली. देशमुख यांनी संताप व्यक्त करीत चालक - वाहकांवर तत्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)