शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

विनाअनुदानित शिक्षक वेतनापासून वंचित

By admin | Updated: November 5, 2015 23:55 IST

विनावेतन काम : राज्यातील २५ हजार शिक्षक

आनंद त्रिपाठी --वाटूळ--शैक्षणिक वर्ष २००१पासून शासनाने राज्यातील शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यास प्रारंभ केला. त्यानुसार राज्यभरात १२ हजार तुकड्या कायम विनाअनुदानित तत्त्वावर सुरु करण्यात आल्या. २५ हजार शिक्षक या तुकड्यांवर २००१ पासून विनावेतन काम करीत असून, संस्थांकडून त्यांना तुटपुंजे वेतन मिळत आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या अथक परिश्रमानंतर व पाठपुराव्यामुळे फेब्रुवारी २०१४ साली या कायम विनाअनुदानित तुकड्यांचा ‘कायम’ हा शब्द शासनाने काढला व आॅनलाईन मूल्यांकनानंतर अनुदान देण्याची घोषणा केली. शासन निकषानुसार कायम विनाअनुदानित तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षकाची तीन वर्षांची मान्यता असायला हवी, अशी अट होती. पण संघटनेने ती एक वर्षाची मान्यता असावी, असा सूर लावून शिक्षण संचालकांची मान्यता मिळविली.यानंतर जानेवारी २0१५ला शिक्षणाधिकारी, रत्नागिरी यांनी मूल्यमापनासाठी शाळांचे प्रस्ताव मागवले होते. परंतु हा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी उपसंचालक कार्यालयात एकही प्रस्ताव न पाठवल्याने जिल्ह्यातील एकही शाळा आॅनलाईन मूल्यांकनास पात्र ठरली नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश औताडे यांनी सांगितले. शाळांकडूनच योग्य प्रकारे प्रस्ताव सादर न झाल्याने शाळा पात्र ठरल्या नाहीत. परिणामी कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेने पुन्हा हा प्रश्न लावून धरला असून, विनाअनुदानित तुकड्यांवरील शिक्षक व शाळांना अनुदानावर येण्यासाठी आवश्यक बाबींच्या पूर्ततेसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन प्रा. प्रकाश औताडे यांनी केले आहे.कॉलेजची भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची माहिती, विनाअनुदानित तुकड्यांची शासनाकडून मान्यता (किमान ४ वर्षे) अशा तुकड्यांवर नियुक्त शिक्षकांची नेमणूक व त्याला शिक्षण उपसचांलकांची मान्यता, कोकण आयुक्तांकडून रोस्टर तपासून त्याप्रमाणे नेमणुका असणे गरजेचे आहे. अपूर्ण प्रस्ताव : जिल्ह्यातील तुकडी नाहीजिल्ह्यातील एकही तुकडी मूल्यांकनास पात्र ठरली नाही. हे केवळ अपूर्ण प्रस्तावामुळेच. उपसंचालक कार्यालयाशी संपर्क साधून वैयक्तिक मान्यता कॅम्प लावण्याच्या प्रयत्न आहे. परंतु, २०१४-१५ व २०१५-१६ची संचमान्यता असेल तरच शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता होतील.- प्रा. प्रकाश औताडे, अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना.डिसेंबरला मूल्यमापनकॉलेजचे निकाल व शिक्षकांची पात्रता या अटी पूर्ण असणे गरजेचे आहे. डिसेंबर २0१५मध्ये पुन्हा एकदा अशा तुकड्यांचे मूल्यमापन होणार आहे.