शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पावसाने विश्रांती घेताच उकाडा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:34 IST

रत्नागिरी : कधी मुसळधार तर कधी विश्रांती, असा पावसाचा जिल्ह्यात खेळ सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेताच पुन्हा ...

रत्नागिरी : कधी मुसळधार तर कधी विश्रांती, असा पावसाचा जिल्ह्यात खेळ सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेताच पुन्हा उकाड्याला प्रारंभ झाला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण १९२.८० मिलीमीटर (सरासरी २१.४२ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.

बंगालच्या उपसागरात सातत्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने अधूनमधून मुसळधार पाऊस पडत आहे. तर कधी पावसाची विश्रांती सुरू आहे. हवामान खात्याने २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या काही तालुक्यांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे.

रविवार ते मंगळवार असे तीन दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बुधवारी उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर होता. अन्य तालुक्यांमध्ये कधी जोरदार तर कधी तुरळक सरींनी पाऊस पडत होता. शुक्रवारी मात्र, पावसाने दिवसभर पूर्ण विश्रांती घेतली होती. रात्रीही तसा तुरळकच पाऊस पडला. पावसामुळे जिल्ह्यात कुठेही नुकसानीची नोंद झालेली नाही.