शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
4
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
5
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
6
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
7
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
8
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
9
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
10
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
11
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
12
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
14
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
15
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
16
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
17
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
18
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
19
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
20
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर

सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचे उद्या तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:12 IST

जागोजागी कोसळलेल्या मिऱ्या येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय भीतीच्या वातावरणात आहेत. त्यातच येत्या ४ जुलै रोजी दुपारी १२.३७ वाजता सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या गावाला बसण्याची भीती आहे. यावेळी ३ ते ४ मीटर उंचीच्या सागरी लाटा मिऱ्या किनाऱ्याला धडकणार आहेत. त्यामुळे सागराचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याच्या भीतीने मिऱ्यांवासियांमध्ये घबराट पसरली आहे.

ठळक मुद्देसागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचे उद्या तांडवपाणी नागरी वस्तीत घुसण्याच्या भीतीने मिऱ्यांवासियांमध्ये घबराट

रत्नागिरी : जागोजागी कोसळलेल्या मिऱ्या येथील सागरी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे मिऱ्यावासीय भीतीच्या वातावरणात आहेत. त्यातच येत्या ४ जुलै रोजी दुपारी १२.३७ वाजता सागराला येणाऱ्या उधाणाच्या भरतीचा तडाखा मिऱ्या गावाला बसण्याची भीती आहे. यावेळी ३ ते ४ मीटर उंचीच्या सागरी लाटा मिऱ्या किनाऱ्याला धडकणार आहेत. त्यामुळे सागराचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याच्या भीतीने मिऱ्यांवासियांमध्ये घबराट पसरली आहे.गेल्या ४ दशकांच्या काळात मिऱ्या गावाच्या सागरी अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. प्रतिबंधासाठी दगडी बंधारावजा भिंत उभारण्यात आली. परंतु ती योग्य निकष न पाळल्याने सातत्याने कोसळत आहे.

करोडो रुपये या धूपबंधाऱ्यावर खर्च करण्यात आले आहेत. तरीही मिऱ्या गावाला सागरापासून असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही. त्यामुळे आता मिऱ्यामध्ये टेट्रापॉड धर्तीवरील धूपप्रतिबंधक बंधारा उभारला जाणार आहे. मात्र, हा बंधारा पावसाळ्यात उभारला जाऊ शकत नाही. त्यामुळे तातडीची दुरुस्ती करण्याचे ठरविण्यात आले. परंतु त्यासाठीही संबंधित विभागाकडे पैसेच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती झाली नाही.

आता गुरुवारी रत्नागिरीत सागराला दुपारी १२.३७ वाजता उधाणाची भरती येणार आहे. पावसाळ्यातील या उधाणाच्या भरतीच्या वेळी जोरदार वाऱ्यांमुळे उंच लाटा मिऱ्या किनाऱ्यावर धडकण्याची भीती आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गRatnagiriरत्नागिरी