शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

दोन वर्षांचे एस. टी. अपघात केवळ दोन महिन्यांत!

By admin | Updated: May 29, 2014 00:44 IST

रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एस्.टी.कडे सर्वात सुरक्षित आणि भरवशाची सेवा म्हणून पाहिले जात असले तरी गेले दोन महिने

रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एस्.टी.कडे सर्वात सुरक्षित आणि भरवशाची सेवा म्हणून पाहिले जात असले तरी गेले दोन महिने मात्र एस्. टी.साठी त्रासदायक ठरले आहेत. गेल्या पाच वर्षांत अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातही गेल्या दोन वर्षांतील अपघातांच्या संख्येएवढे अपघात अवघ्या दोन महिन्यात झाले आहेत. एस. टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी बनली आहे. डोंगरदर्‍यांमध्ये वसलेला जिल्ह्यातील ग्रमीण समाज एस. टी.मुळे शहराशी जोडला गेला आहे. शाळा, महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी असो वा शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात काम करणारे कर्मचारी असोत. सर्वांसाठी एस. टी. फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागातून दिवसाला किमान चार ते पाच फेर्‍या होतच असतात. एस. टी.चे भारमान, फेर्‍या, एस. टी.ची संख्या वाढली आहे. मात्र सर्वात भरवशाची ही सेवा आता त्रासदायक होऊ लागली आहे. मागील पाच वर्षांत एस. टी.चे वर्षाला किमान बारा अपघात झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दोन महिन्यात तर गेल्या दोन वर्षांतील अपघाताची संख्या भरून काढली गेली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना तत्काळ मदत दिली जाते. अपघाताच्या स्वरूपावरून मदतीची रक्कम ठरविण्यात येते. २००८-०९ मध्ये ७३ हजार २ रूपये, २००९-१०मध्ये ६१ हजार ६५० रुपये, १०-११ मध्ये ७१ हजार २०० रूपये, ११-१२ मध्ये १ लाख ६५ हजार ३०० रूपये, तर १२-१३मध्ये ५३,२०० रूपयांची मदत देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात मात्र अपघाताने गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड मोडला0 आहे. मार्चमध्येच १० अपघात झाले असून, या अपघातामध्ये ३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या अपघातग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून ३४ हजार ४२१ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये १२ अपघात घडले असून, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून ७२ हजार १२ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघातानंतर तत्काळ मदत दिली जाते. न्यायालयीन निकालानंतर अपघातग्रस्त किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येते. गेल्या पाच वर्षांचा आलेख पाहता वर्षाला सरासरी १२ अपघात होत आहेत. म्हणजेच सरासरी दर महिन्याला एक अपघात होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात मात्र दोन वर्षांतील अपघाताएवढे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)