शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

दोन वर्षांचे एस. टी. अपघात केवळ दोन महिन्यांत!

By admin | Updated: May 29, 2014 00:44 IST

रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एस्.टी.कडे सर्वात सुरक्षित आणि भरवशाची सेवा म्हणून पाहिले जात असले तरी गेले दोन महिने

रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एस्.टी.कडे सर्वात सुरक्षित आणि भरवशाची सेवा म्हणून पाहिले जात असले तरी गेले दोन महिने मात्र एस्. टी.साठी त्रासदायक ठरले आहेत. गेल्या पाच वर्षांत अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातही गेल्या दोन वर्षांतील अपघातांच्या संख्येएवढे अपघात अवघ्या दोन महिन्यात झाले आहेत. एस. टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी बनली आहे. डोंगरदर्‍यांमध्ये वसलेला जिल्ह्यातील ग्रमीण समाज एस. टी.मुळे शहराशी जोडला गेला आहे. शाळा, महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी असो वा शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात काम करणारे कर्मचारी असोत. सर्वांसाठी एस. टी. फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागातून दिवसाला किमान चार ते पाच फेर्‍या होतच असतात. एस. टी.चे भारमान, फेर्‍या, एस. टी.ची संख्या वाढली आहे. मात्र सर्वात भरवशाची ही सेवा आता त्रासदायक होऊ लागली आहे. मागील पाच वर्षांत एस. टी.चे वर्षाला किमान बारा अपघात झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दोन महिन्यात तर गेल्या दोन वर्षांतील अपघाताची संख्या भरून काढली गेली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना तत्काळ मदत दिली जाते. अपघाताच्या स्वरूपावरून मदतीची रक्कम ठरविण्यात येते. २००८-०९ मध्ये ७३ हजार २ रूपये, २००९-१०मध्ये ६१ हजार ६५० रुपये, १०-११ मध्ये ७१ हजार २०० रूपये, ११-१२ मध्ये १ लाख ६५ हजार ३०० रूपये, तर १२-१३मध्ये ५३,२०० रूपयांची मदत देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात मात्र अपघाताने गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड मोडला0 आहे. मार्चमध्येच १० अपघात झाले असून, या अपघातामध्ये ३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या अपघातग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून ३४ हजार ४२१ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये १२ अपघात घडले असून, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून ७२ हजार १२ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघातानंतर तत्काळ मदत दिली जाते. न्यायालयीन निकालानंतर अपघातग्रस्त किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येते. गेल्या पाच वर्षांचा आलेख पाहता वर्षाला सरासरी १२ अपघात होत आहेत. म्हणजेच सरासरी दर महिन्याला एक अपघात होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात मात्र दोन वर्षांतील अपघाताएवढे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)