शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

दोन वर्षांचे एस. टी. अपघात केवळ दोन महिन्यांत!

By admin | Updated: May 29, 2014 00:44 IST

रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एस्.टी.कडे सर्वात सुरक्षित आणि भरवशाची सेवा म्हणून पाहिले जात असले तरी गेले दोन महिने

रत्नागिरी : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एस्.टी.कडे सर्वात सुरक्षित आणि भरवशाची सेवा म्हणून पाहिले जात असले तरी गेले दोन महिने मात्र एस्. टी.साठी त्रासदायक ठरले आहेत. गेल्या पाच वर्षांत अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातही गेल्या दोन वर्षांतील अपघातांच्या संख्येएवढे अपघात अवघ्या दोन महिन्यात झाले आहेत. एस. टी. ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी बनली आहे. डोंगरदर्‍यांमध्ये वसलेला जिल्ह्यातील ग्रमीण समाज एस. टी.मुळे शहराशी जोडला गेला आहे. शाळा, महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी असो वा शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात काम करणारे कर्मचारी असोत. सर्वांसाठी एस. टी. फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागातून दिवसाला किमान चार ते पाच फेर्‍या होतच असतात. एस. टी.चे भारमान, फेर्‍या, एस. टी.ची संख्या वाढली आहे. मात्र सर्वात भरवशाची ही सेवा आता त्रासदायक होऊ लागली आहे. मागील पाच वर्षांत एस. टी.चे वर्षाला किमान बारा अपघात झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या दोन महिन्यात तर गेल्या दोन वर्षांतील अपघाताची संख्या भरून काढली गेली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना तत्काळ मदत दिली जाते. अपघाताच्या स्वरूपावरून मदतीची रक्कम ठरविण्यात येते. २००८-०९ मध्ये ७३ हजार २ रूपये, २००९-१०मध्ये ६१ हजार ६५० रुपये, १०-११ मध्ये ७१ हजार २०० रूपये, ११-१२ मध्ये १ लाख ६५ हजार ३०० रूपये, तर १२-१३मध्ये ५३,२०० रूपयांची मदत देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात मात्र अपघाताने गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड मोडला0 आहे. मार्चमध्येच १० अपघात झाले असून, या अपघातामध्ये ३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या अपघातग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून ३४ हजार ४२१ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. एप्रिलमध्ये १२ अपघात घडले असून, या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्तांना तत्काळ मदत म्हणून ७२ हजार १२ रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अपघातानंतर तत्काळ मदत दिली जाते. न्यायालयीन निकालानंतर अपघातग्रस्त किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदत देण्यात येते. गेल्या पाच वर्षांचा आलेख पाहता वर्षाला सरासरी १२ अपघात होत आहेत. म्हणजेच सरासरी दर महिन्याला एक अपघात होत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात मात्र दोन वर्षांतील अपघाताएवढे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)