शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

तब्बल दोन वर्षाच्या नोंदी रखडल्या

By admin | Updated: June 7, 2015 00:47 IST

सतीश शेवडे : ग्राम रोजगार सेवकांबद्दल तीव्र संताप

रत्नागिरी : मनरेगाच्या फळबाग लागवड योजनेचे दोन वर्षाचे हजेरीपत्रक भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांबद्दल आज (शनिवारी) झालेल्या जिल्हा परिषद कृषी समितीत संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी तिन्ही वर्षांचे हजेरी पत्रक भरण्याच्या सूचना ग्राम रोजगार सेवकांना दिली. आजची कृषी समितीची सभा उपाध्यक्ष शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मनरेगाच्या फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, काजू व इतर झाडांची लागवड करण्यात येते. ही लागवड मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. या योजनेचे मस्टर भरण्यासाठी ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती मनरेगाअंतर्गत करण्यात आली आहे. फळबाग लागवड योजनेचे ग्राम रोजगार सेवक केवळ एकाच वर्षाचे मस्टर भरत आहेत. पुढील दोन वर्षांचे मस्टर भरण्यास ते विरोध करीत आहेत. केवळ एकाच वर्षाचे मस्टर भरले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात या सेवकांबद्दल असंतोष पसरलेला आहे. आज या विषयावर कृषी समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली. उपाध्यक्ष शेवडे यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उर्वरित दोन्ही वर्षांचे मस्टर भरण्याची सूचना उपाध्यक्ष शेवडे यांनी दिली. तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. खरीब हंगामासाठी खते, बियाणी तालुका पातळीवर खरेदी-विक्री संघात ठेवण्यात आली आहेत. याबाबत कोणाची तक्रार असल्यास कृषी विकास अधिकारी आणि उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करावी, असे उपाध्यक्ष शेवडे यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्यावरण दिन, पर्यावरण सप्ताह राबविण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही उपाध्यक्ष शेवडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कृषी अवजारे ५० टक्के अनुदानावर देण्यात येत आहेत. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही शेवडे यांनी केले. शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कृषी अवजारे ५० टक्के अनुदानावर देण्यात येत आहेत. शेतकरी याचा लाभ घेताना दिसत नाहीत. मात्र, आता तो घेतला जावा, यासाठी कृषी विभागातर्फे सध्या जोरदार प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आली. (शहर वार्ताहर)