शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तब्बल दोन वर्षाच्या नोंदी रखडल्या

By admin | Updated: June 7, 2015 00:47 IST

सतीश शेवडे : ग्राम रोजगार सेवकांबद्दल तीव्र संताप

रत्नागिरी : मनरेगाच्या फळबाग लागवड योजनेचे दोन वर्षाचे हजेरीपत्रक भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांबद्दल आज (शनिवारी) झालेल्या जिल्हा परिषद कृषी समितीत संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी तिन्ही वर्षांचे हजेरी पत्रक भरण्याच्या सूचना ग्राम रोजगार सेवकांना दिली. आजची कृषी समितीची सभा उपाध्यक्ष शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मनरेगाच्या फळबाग लागवड योजनेअंतर्गत आंबा, काजू व इतर झाडांची लागवड करण्यात येते. ही लागवड मागील तीन वर्षांपासून करण्यात येत आहे. या योजनेचे मस्टर भरण्यासाठी ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती मनरेगाअंतर्गत करण्यात आली आहे. फळबाग लागवड योजनेचे ग्राम रोजगार सेवक केवळ एकाच वर्षाचे मस्टर भरत आहेत. पुढील दोन वर्षांचे मस्टर भरण्यास ते विरोध करीत आहेत. केवळ एकाच वर्षाचे मस्टर भरले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात या सेवकांबद्दल असंतोष पसरलेला आहे. आज या विषयावर कृषी समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली. उपाध्यक्ष शेवडे यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उर्वरित दोन्ही वर्षांचे मस्टर भरण्याची सूचना उपाध्यक्ष शेवडे यांनी दिली. तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. खरीब हंगामासाठी खते, बियाणी तालुका पातळीवर खरेदी-विक्री संघात ठेवण्यात आली आहेत. याबाबत कोणाची तक्रार असल्यास कृषी विकास अधिकारी आणि उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करावी, असे उपाध्यक्ष शेवडे यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्यावरण दिन, पर्यावरण सप्ताह राबविण्यात यावा, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही उपाध्यक्ष शेवडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कृषी अवजारे ५० टक्के अनुदानावर देण्यात येत आहेत. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही शेवडे यांनी केले. शेतकऱ्यांना आवश्यक असणारी कृषी अवजारे ५० टक्के अनुदानावर देण्यात येत आहेत. शेतकरी याचा लाभ घेताना दिसत नाहीत. मात्र, आता तो घेतला जावा, यासाठी कृषी विभागातर्फे सध्या जोरदार प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आली. (शहर वार्ताहर)