शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

राजापूरजवळ बस अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 18:43 IST

राजापूर/वाटूळ : गोव्याकडून मुंबईकडे जाणारी खासगी आरामबस झाडावर आदळून दोन प्रवासी ठार झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कुडाळमधील शिवराम यशवंत परब आणि मुंबईच्या रेश्मा रमाकांत पंडीत हे दोघेजण या अपघातात ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले. हे प्रवासी गोवा, मुंबई व सिंधुदुर्गमधील आहेत.

राजापूर/वाटूळ : गोव्याकडून मुंबईकडे जाणारी खासगी आरामबस झाडावर आदळून दोन प्रवासी ठार झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कुडाळमधील शिवराम यशवंत परब आणि मुंबईच्या रेश्मा रमाकांत पंडीत हे दोघेजण या अपघातात ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले. हे प्रवासी गोवा, मुंबई व सिंधुदुर्गमधील आहेत.

गोव्यातील गिब्स या ट्रॅव्हलर कंपनीची खासगी आरामबस (जीए ०३ - एन ४७०४) शुक्रवारी सायंकाळी गोव्याहून मुंबईकडे निघाली. सुरूवातीला बसमध्ये कमी प्रवासी होते. त्यानंतर म्हापसा, झाराप, कणकवली, पणदुर, मालवण, कट्टा आदी ठिकाणचे प्रवासी बसमध्ये चढले होते. एकूण ३२ प्रवासी त्या बसमधून प्रवास करीत होते. रात्री दहाच्या दरम्यान वाटुळ घाटीतील एका अवघड वळणार बसचालक राजेश कांबळे याचा ताबा सुटला व बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऐनाच्या झाडावर आदळली व मार्गावरच कलंडली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या धडकेने ऐनाचे झाड मोडून पडले. प्रवाशांमध्ये खूप मोठा आरडाओरडा सुरू झाला.

बसला अपघात झाल्याची खबर ओणी - पाचल फाट्यावर उभारण्यात आलेल्या पोलीस पथकाला मिळताच काही मिनिटातच तेथील वर्दीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की आपल्या सहकाºयांसह वाटुळ घाटात पोहोचल्या.वाटुळ व परिसरातील अनेक स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले.

या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळेली - कुडाळमधील शिवराम यशवंत परब (४९) जागीच ठार झाले होते. त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. बसखाली अडकल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. नंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले होते. त्यातील काहींची अवस्था नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लांजा तसेच रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

तेथे उपचार सुरु असताना रेश्मा रमाकांत पंडीत (५६, परळ पूर्व, मुंबई) यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती रमाकांत पर्शुराम पंडीत हेही त्याच बसमधून प्रवास करीत होते. तेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरीत उपचार सुरु आहेत.अपघातातील जखमी प्रवाशांना ओणीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासह राजापूर, लांजा व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

या अपघातानंतर उपविभागाचे पोलीस अधिकारी मारुती जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामसिंग पाटील, हेडकॉन्स्टेबल जाधव, साळुंखे, पोलीस नाईक प्रकाश झोरे, योगेश तेंडुलकर, अतुल ठाकुर, युवराज सूर्यवंशी, नीलेश जाधव, योगेश भाताडे, महामार्गचे सहाय्यक उपनिरीक्षक हलगी, साळुंखे आरटीओचे अधिकारी आदी घटनास्थळी उपस्थित होते.

महामार्ग लवकर मोकळा

या अपघातानंतर महामार्ग पोलीसांसह खास गणपती सणासाठी महामार्गावर उभारलेल्या पथकांमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. महामार्गावर असलेली क्रेन मागवून अपघातग्रस्त बस हलवण्यात आली. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला.राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल जखमीबाबनाथ विठोबा गोसावी (४७), प्रिया रवींद्र गावडे (४६), अपर्णा शिवाजी परब (५५), दीपा बाबनाथ गोसावी, देवांग सतीश झारापकर (१६), राजेश बापू कांबळे (४७, बसचालक), प्रथमेश शिवाजी परब (२५), रवींद्र सावळाराम गावडे (४८), सौ. प्रिया रवींद्र गावडे (३५), अ. ना. उजगावकर (३४), सौ. रश्मी राजन देसाई (४८), अपर्णा बबन सावंत (३०), मंगेश वसंत चारी (२९), विजयालक्ष्मी बाबाजी सावंत देसाई (४८), रामचंद्र बापू चव्हाण (६५), राजेश बापुराव गोसावी (४८), योगेश हरिश्चंद्र सावंत (२५)रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आलेले जखमीरमाकांत पर्शुराम पंडीत (६२), उदय बापू परब (३६), रुपेश रघुवीर पाष्टे (३४), सचिन रघुवीर पाष्टे (३२), शिरीष चंद्रकांत सावंत (३०), रुचिता चंद्रकांत सावंत (६२), त्रिमूर्ती राजाराम सावंत (५१), अक्षय त्रिमूर्ती सावंत (२४), साबाजी राघोबा देसाई (२४), ओमकार साबाजी देसाई (२४), रवींद्र मनोहर परब (४९), रविना रवींद्र परब (४५), स्नेहा रवींद्र परब (१४)