शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरजवळ बस अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 18:43 IST

राजापूर/वाटूळ : गोव्याकडून मुंबईकडे जाणारी खासगी आरामबस झाडावर आदळून दोन प्रवासी ठार झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कुडाळमधील शिवराम यशवंत परब आणि मुंबईच्या रेश्मा रमाकांत पंडीत हे दोघेजण या अपघातात ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले. हे प्रवासी गोवा, मुंबई व सिंधुदुर्गमधील आहेत.

राजापूर/वाटूळ : गोव्याकडून मुंबईकडे जाणारी खासगी आरामबस झाडावर आदळून दोन प्रवासी ठार झाल्याचा प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील वाटुळ घाटात शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. कुडाळमधील शिवराम यशवंत परब आणि मुंबईच्या रेश्मा रमाकांत पंडीत हे दोघेजण या अपघातात ठार झाले तर ३० प्रवासी जखमी झाले. हे प्रवासी गोवा, मुंबई व सिंधुदुर्गमधील आहेत.

गोव्यातील गिब्स या ट्रॅव्हलर कंपनीची खासगी आरामबस (जीए ०३ - एन ४७०४) शुक्रवारी सायंकाळी गोव्याहून मुंबईकडे निघाली. सुरूवातीला बसमध्ये कमी प्रवासी होते. त्यानंतर म्हापसा, झाराप, कणकवली, पणदुर, मालवण, कट्टा आदी ठिकाणचे प्रवासी बसमध्ये चढले होते. एकूण ३२ प्रवासी त्या बसमधून प्रवास करीत होते. रात्री दहाच्या दरम्यान वाटुळ घाटीतील एका अवघड वळणार बसचालक राजेश कांबळे याचा ताबा सुटला व बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या ऐनाच्या झाडावर आदळली व मार्गावरच कलंडली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या धडकेने ऐनाचे झाड मोडून पडले. प्रवाशांमध्ये खूप मोठा आरडाओरडा सुरू झाला.

बसला अपघात झाल्याची खबर ओणी - पाचल फाट्यावर उभारण्यात आलेल्या पोलीस पथकाला मिळताच काही मिनिटातच तेथील वर्दीवर असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की आपल्या सहकाºयांसह वाटुळ घाटात पोहोचल्या.वाटुळ व परिसरातील अनेक स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले.

या अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळेली - कुडाळमधील शिवराम यशवंत परब (४९) जागीच ठार झाले होते. त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. बसखाली अडकल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. नंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला. बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले होते. त्यातील काहींची अवस्था नाजूक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लांजा तसेच रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.

तेथे उपचार सुरु असताना रेश्मा रमाकांत पंडीत (५६, परळ पूर्व, मुंबई) यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पती रमाकांत पर्शुराम पंडीत हेही त्याच बसमधून प्रवास करीत होते. तेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रत्नागिरीत उपचार सुरु आहेत.अपघातातील जखमी प्रवाशांना ओणीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रासह राजापूर, लांजा व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

या अपघातानंतर उपविभागाचे पोलीस अधिकारी मारुती जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. राजापूरच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामसिंग पाटील, हेडकॉन्स्टेबल जाधव, साळुंखे, पोलीस नाईक प्रकाश झोरे, योगेश तेंडुलकर, अतुल ठाकुर, युवराज सूर्यवंशी, नीलेश जाधव, योगेश भाताडे, महामार्गचे सहाय्यक उपनिरीक्षक हलगी, साळुंखे आरटीओचे अधिकारी आदी घटनास्थळी उपस्थित होते.

महामार्ग लवकर मोकळा

या अपघातानंतर महामार्ग पोलीसांसह खास गणपती सणासाठी महामार्गावर उभारलेल्या पथकांमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. महामार्गावर असलेली क्रेन मागवून अपघातग्रस्त बस हलवण्यात आली. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला.राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल जखमीबाबनाथ विठोबा गोसावी (४७), प्रिया रवींद्र गावडे (४६), अपर्णा शिवाजी परब (५५), दीपा बाबनाथ गोसावी, देवांग सतीश झारापकर (१६), राजेश बापू कांबळे (४७, बसचालक), प्रथमेश शिवाजी परब (२५), रवींद्र सावळाराम गावडे (४८), सौ. प्रिया रवींद्र गावडे (३५), अ. ना. उजगावकर (३४), सौ. रश्मी राजन देसाई (४८), अपर्णा बबन सावंत (३०), मंगेश वसंत चारी (२९), विजयालक्ष्मी बाबाजी सावंत देसाई (४८), रामचंद्र बापू चव्हाण (६५), राजेश बापुराव गोसावी (४८), योगेश हरिश्चंद्र सावंत (२५)रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आलेले जखमीरमाकांत पर्शुराम पंडीत (६२), उदय बापू परब (३६), रुपेश रघुवीर पाष्टे (३४), सचिन रघुवीर पाष्टे (३२), शिरीष चंद्रकांत सावंत (३०), रुचिता चंद्रकांत सावंत (६२), त्रिमूर्ती राजाराम सावंत (५१), अक्षय त्रिमूर्ती सावंत (२४), साबाजी राघोबा देसाई (२४), ओमकार साबाजी देसाई (२४), रवींद्र मनोहर परब (४९), रविना रवींद्र परब (४५), स्नेहा रवींद्र परब (१४)