शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तवसाळ बंदरात दोनशे नौका

By admin | Updated: September 1, 2014 23:04 IST

अतिवृष्टीचा इशारा : पावसाने मच्छिमारांचा घास हिरावला

रत्नागिरी : वादळी वाऱ्यासह खवळलेल्या समुद्रामुळे मच्छिमारासाठी खोल समुद्रात गेलेल्या मुंबई व राज्यातील सुमारे २०० यांत्रिकी नौकांनी तवसाळ (ता़ गुहागर) बंदराचा आधार घेतला आहे. त्या नौका नांगरावर ठेवण्यात आल्या आहेत़जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाने कहर केला असून, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. समुद्र खवळल्याने मोठ्या लाटा उसळत असल्याने खोल समुद्रातील मासेमारीला जाणे बहुतांश मच्छिमारांनी बंद केले आहे़ शासनाने धोक्याचा इशारा दिलेला असतानाही वरवडे येथे समुद्रात गेलेली यांत्रिकी नौका बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले़ मात्र, खलासी सुदैवाने बचावले़ वादळी वारा आणि मुसळधार पावसाशी सामना करत हे खलासी जीव मुठीत धरून किनाऱ्यावर परतले. या घटनेमुळे मच्छिमार भयभीत झाले आहेत. पावसाचा तसेच वाऱ्याचा आवेश किनारपट्टी भागात अद्याप कमी झालेला नसल्याने मच्छिमारी अजूनही बंद आहे.पुढील २४ तासात १२ सेंटीमीटरने पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून, त्यामुळे समुद्रात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण-नैऋत्य दिशेकडे तासी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मच्छिमारांनी मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, तशा सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मच्छिमारांनीही खोल समुद्रात जाणे टाळले आहे़मुंबई व राज्यातील अन्य भागात पर्ससीन नेटने मासेमारी करणाऱ्या नौका १० ते १५ दिवसांसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात़ त्यामुळे गेले दोन दिवस खोल समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे या यांत्रिकी नौकांनी परत न जाता जवळ असलेल्या तवसाळ बंदराचा आधार घेतला आहे़ त्यामुळे सुमारे २०० नौका तवसाळ बंदरात विसावल्या आहेत़ आता हे बंदर नौकांनी भरले आहे़ समुद्र शांत होईपर्यंत या नौकांना आता येथेच थांबावे लागणार आहे़दरम्यान, गेल्या काही दिवसात मच्छिमारीवर मोठे संकट आले आहे. १५ आॅगस्टपासून मच्छिमारी सुरू झाली असली तरी त्यानंतर वारंवार वातावरणात होणारा बदल आणि पावसाने केलेला कहर यामुळे बहुतांश दिवस मच्छिमार आपल्या व्यवसायाला मुकला आहे.भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार बरसायला सुरूवात केली आहे. समुद्री भागात वाऱ्याचा वेगही जास्त असल्याने अनेक मच्छिमारांनी समुद्रापासून चार हात लांब राहाणे पसंत केले. ज्यांनी समुद्रात नौका ढकलल्या होत्या, त्यांनाही समुद्री वाऱ्याच्या वेगाने पुन्हा किनारी परतावे लागले. गेल्या पंधरा दिवसांत बंद असलेल्या मच्छिमारीमुळे मच्छिमारांचे हंगामाच्या सुरूवातीलाच नुकसान झाले आहे. (शहर वार्ताहर)येत्या २४ तासांसाठी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून वादळी वाऱ्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारीच्या परिस्थितीत येत्या दोन दिवसात तरी फारशी काही सुधारणा होणे शक्यच नसल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे निसर्गावर हवाला ठेवून नौका समुद्रात ढकलणारा मच्छिमार हवालदिल झाला आहे.