शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
4
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
5
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
6
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
7
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
8
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
9
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
10
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
11
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
12
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
13
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
14
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
15
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
16
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
18
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
19
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
20
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान

तवसाळ बंदरात दोनशे नौका

By admin | Updated: September 1, 2014 23:04 IST

अतिवृष्टीचा इशारा : पावसाने मच्छिमारांचा घास हिरावला

रत्नागिरी : वादळी वाऱ्यासह खवळलेल्या समुद्रामुळे मच्छिमारासाठी खोल समुद्रात गेलेल्या मुंबई व राज्यातील सुमारे २०० यांत्रिकी नौकांनी तवसाळ (ता़ गुहागर) बंदराचा आधार घेतला आहे. त्या नौका नांगरावर ठेवण्यात आल्या आहेत़जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाने कहर केला असून, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. समुद्र खवळल्याने मोठ्या लाटा उसळत असल्याने खोल समुद्रातील मासेमारीला जाणे बहुतांश मच्छिमारांनी बंद केले आहे़ शासनाने धोक्याचा इशारा दिलेला असतानाही वरवडे येथे समुद्रात गेलेली यांत्रिकी नौका बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले़ मात्र, खलासी सुदैवाने बचावले़ वादळी वारा आणि मुसळधार पावसाशी सामना करत हे खलासी जीव मुठीत धरून किनाऱ्यावर परतले. या घटनेमुळे मच्छिमार भयभीत झाले आहेत. पावसाचा तसेच वाऱ्याचा आवेश किनारपट्टी भागात अद्याप कमी झालेला नसल्याने मच्छिमारी अजूनही बंद आहे.पुढील २४ तासात १२ सेंटीमीटरने पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता असून, त्यामुळे समुद्रात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण-नैऋत्य दिशेकडे तासी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मच्छिमारांनी मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, तशा सूचना मच्छिमारांना देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे मच्छिमारांनीही खोल समुद्रात जाणे टाळले आहे़मुंबई व राज्यातील अन्य भागात पर्ससीन नेटने मासेमारी करणाऱ्या नौका १० ते १५ दिवसांसाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी जातात़ त्यामुळे गेले दोन दिवस खोल समुद्रात उसळलेल्या उंच लाटांमुळे या यांत्रिकी नौकांनी परत न जाता जवळ असलेल्या तवसाळ बंदराचा आधार घेतला आहे़ त्यामुळे सुमारे २०० नौका तवसाळ बंदरात विसावल्या आहेत़ आता हे बंदर नौकांनी भरले आहे़ समुद्र शांत होईपर्यंत या नौकांना आता येथेच थांबावे लागणार आहे़दरम्यान, गेल्या काही दिवसात मच्छिमारीवर मोठे संकट आले आहे. १५ आॅगस्टपासून मच्छिमारी सुरू झाली असली तरी त्यानंतर वारंवार वातावरणात होणारा बदल आणि पावसाने केलेला कहर यामुळे बहुतांश दिवस मच्छिमार आपल्या व्यवसायाला मुकला आहे.भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार बरसायला सुरूवात केली आहे. समुद्री भागात वाऱ्याचा वेगही जास्त असल्याने अनेक मच्छिमारांनी समुद्रापासून चार हात लांब राहाणे पसंत केले. ज्यांनी समुद्रात नौका ढकलल्या होत्या, त्यांनाही समुद्री वाऱ्याच्या वेगाने पुन्हा किनारी परतावे लागले. गेल्या पंधरा दिवसांत बंद असलेल्या मच्छिमारीमुळे मच्छिमारांचे हंगामाच्या सुरूवातीलाच नुकसान झाले आहे. (शहर वार्ताहर)येत्या २४ तासांसाठी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून वादळी वाऱ्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मच्छिमारीच्या परिस्थितीत येत्या दोन दिवसात तरी फारशी काही सुधारणा होणे शक्यच नसल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे निसर्गावर हवाला ठेवून नौका समुद्रात ढकलणारा मच्छिमार हवालदिल झाला आहे.