शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

भात उत्पादनवाढीस दोन कोटी मंजूर

By admin | Updated: June 22, 2014 01:40 IST

राष्ट्रीय विकास कार्यक्रम : अन्नसुरक्षेसाठी पोषक उपक्रम

रत्नागिरी : अन्न सुरक्षा योजनेत कमी दरात तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी भातपिकाची उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने २०१४-१५ पासून पीक विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. या कार्यक्रमांतर्गत भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. भात पिकाकरता प्रत्येकी १०० हेक्टरचे २१ प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. ९० हेक्टर सुधारित प्रकल्प, १० हेक्टर क्षेत्र संकरित बियाणांसाठी असेल. एका हेक्टरसाठी साडेसात हजार रूपये उपलब्ध होणार आहेत. त्यातून पीक प्रात्यक्षिके, बहुपीक मळणीयंत्र, ड्रम सिडर, पेरणी यंत्र, पाणी योजना राबविण्यासाठी पंपसेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातील भात उत्पादन हे उपअभियान आहे. ते ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या आठ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या आठ जिल्ह्यांसाठी २० कोटी रूपये दिले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ७० हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेण्यात येते. मात्र अद्याप पारंपरिक पध्दतीचा वापर करूनच भात लागवड सुरू आहे. जिल्ह्याचे हेक्टरी उत्पादन २९ क्विंटल आहे. अद्याप पारंपरिक बियाणांचा वापर करण्यात येत आहे. कृषी विद्यापिठाने शिफारस केलेल्या अनेक संकरीत, सुधारीत बियाण्यांचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत हेक्टरी २९ क्विंटल असलेले उत्पन्न ४५ क्विंटलपर्यत वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत कमी उत्पादकता असलेल्या भाताच्या प्लॉटची निवड करण्यात येणार आहे. विद्यापिठाने सूचित केलेली बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, कृषि अधिकाऱ्यांकडून सतत पाहणी करण्यात यावी व अन्य शेतकऱ्यांना ती प्रात्यक्षिके पाहता यावीत, यासाठी सहलींचे नियोजन कृषी विभागाने करावे, यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)