शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

भात उत्पादनवाढीस दोन कोटी मंजूर

By admin | Updated: June 22, 2014 01:40 IST

राष्ट्रीय विकास कार्यक्रम : अन्नसुरक्षेसाठी पोषक उपक्रम

रत्नागिरी : अन्न सुरक्षा योजनेत कमी दरात तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी भातपिकाची उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने २०१४-१५ पासून पीक विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. या कार्यक्रमांतर्गत भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. भात पिकाकरता प्रत्येकी १०० हेक्टरचे २१ प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. ९० हेक्टर सुधारित प्रकल्प, १० हेक्टर क्षेत्र संकरित बियाणांसाठी असेल. एका हेक्टरसाठी साडेसात हजार रूपये उपलब्ध होणार आहेत. त्यातून पीक प्रात्यक्षिके, बहुपीक मळणीयंत्र, ड्रम सिडर, पेरणी यंत्र, पाणी योजना राबविण्यासाठी पंपसेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातील भात उत्पादन हे उपअभियान आहे. ते ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या आठ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या आठ जिल्ह्यांसाठी २० कोटी रूपये दिले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ७० हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेण्यात येते. मात्र अद्याप पारंपरिक पध्दतीचा वापर करूनच भात लागवड सुरू आहे. जिल्ह्याचे हेक्टरी उत्पादन २९ क्विंटल आहे. अद्याप पारंपरिक बियाणांचा वापर करण्यात येत आहे. कृषी विद्यापिठाने शिफारस केलेल्या अनेक संकरीत, सुधारीत बियाण्यांचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत हेक्टरी २९ क्विंटल असलेले उत्पन्न ४५ क्विंटलपर्यत वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत कमी उत्पादकता असलेल्या भाताच्या प्लॉटची निवड करण्यात येणार आहे. विद्यापिठाने सूचित केलेली बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, कृषि अधिकाऱ्यांकडून सतत पाहणी करण्यात यावी व अन्य शेतकऱ्यांना ती प्रात्यक्षिके पाहता यावीत, यासाठी सहलींचे नियोजन कृषी विभागाने करावे, यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)