शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
3
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
4
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
5
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
6
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
7
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
8
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
9
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
10
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
11
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
12
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
13
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
14
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
15
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
16
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
17
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
18
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
19
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
20
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट

भात उत्पादनवाढीस दोन कोटी मंजूर

By admin | Updated: June 22, 2014 01:40 IST

राष्ट्रीय विकास कार्यक्रम : अन्नसुरक्षेसाठी पोषक उपक्रम

रत्नागिरी : अन्न सुरक्षा योजनेत कमी दरात तांदूळ उपलब्ध करून देण्यासाठी भातपिकाची उत्पादकता वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी राष्ट्रीय विकास कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने २०१४-१५ पासून पीक विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. या कार्यक्रमांतर्गत भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. भात पिकाकरता प्रत्येकी १०० हेक्टरचे २१ प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. ९० हेक्टर सुधारित प्रकल्प, १० हेक्टर क्षेत्र संकरित बियाणांसाठी असेल. एका हेक्टरसाठी साडेसात हजार रूपये उपलब्ध होणार आहेत. त्यातून पीक प्रात्यक्षिके, बहुपीक मळणीयंत्र, ड्रम सिडर, पेरणी यंत्र, पाणी योजना राबविण्यासाठी पंपसेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातील भात उत्पादन हे उपअभियान आहे. ते ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद या आठ जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या आठ जिल्ह्यांसाठी २० कोटी रूपये दिले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ७० हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेण्यात येते. मात्र अद्याप पारंपरिक पध्दतीचा वापर करूनच भात लागवड सुरू आहे. जिल्ह्याचे हेक्टरी उत्पादन २९ क्विंटल आहे. अद्याप पारंपरिक बियाणांचा वापर करण्यात येत आहे. कृषी विद्यापिठाने शिफारस केलेल्या अनेक संकरीत, सुधारीत बियाण्यांचा वापर करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी योजनेंतर्गत हेक्टरी २९ क्विंटल असलेले उत्पन्न ४५ क्विंटलपर्यत वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत कमी उत्पादकता असलेल्या भाताच्या प्लॉटची निवड करण्यात येणार आहे. विद्यापिठाने सूचित केलेली बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, कृषि अधिकाऱ्यांकडून सतत पाहणी करण्यात यावी व अन्य शेतकऱ्यांना ती प्रात्यक्षिके पाहता यावीत, यासाठी सहलींचे नियोजन कृषी विभागाने करावे, यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)