शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कासवाची पिल्ले समुद्राकडे झेपावली

By admin | Updated: February 2, 2016 23:20 IST

राजापूर तालुक्यातील पहिलीच घटना : वन विभागाने केले संरक्षण

रत्नागिरी : माडबन (ता. राजापूर) येथील समुद्रकिनारी वन विभागाने ५५ दिवस संरक्षित केलेल्या कासवांच्या ७५ पिलांना सोमवारी किनाऱ्यावर सोडले. काही वेळातच ही पिल्ले सागराच्या दिशेने झेपावली. माडबन सागर किनारी ९ डिसेंबर २०१४ रोजी वन विभागाला कासवांची १२४ अंडी आढळली. विभागाने संरक्षक रचना करून वाळूमध्ये खड्डा केला व अंड्यांना त्यात सुरक्षित ठेवले. अंड्यातून पिल्लेबाहेर येण्याच्या कालावधीत या भागातील काही ठिकाणची वाळू हलकी होऊन छोटे छोटे खड्डे निर्माण झाले. त्यामुळे पिल्लेबाहेर येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे लक्षात येताच वन विभागाने या ठिकाणी श्वान, कोल्हे या प्राण्यांपासून या पिलांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर टोपले ठेवले. त्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच ग्रामस्थ तसेच इतर सरकारी यंत्रणांचेही लक्ष होते. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास राजापूर वन विभागाला पिल्ले अंड्यातून बाहेर आल्याचा फोन आला. ताबडतोब विभागीय वन अधिकारी विजय जगताप आणि रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, वनरक्षक सागर गोसावी आणि इतर कर्मचारी या ठिकाणी पोहोचले. त्याचबरोबर माडबनचे पोलीसपाटील शामसुंदर गवाणकर, सरपंच योगेश वाघधरे, ग्रामसेवक वर्षा राणे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. उन्हाच्या आधी या पिलांना समुद्रात सोडणे गरजेचे होते. संरक्षित केलेल्या ठिकाणी आज ७५ पिल्लेआढळली. या पिलांना समुद्राकडे वळवण्यात आले. थोड्याच वेळात ही पिल्लेसागराकडे झेपावू लागली. यावेळी साऱ्यांच्याच चेहऱ्यावर अवर्णनीय असा आनंद दिसून येत होता. कासवांच्या पिल्लांचे संवर्धन करण्याची राजापूर तालुक्यातील ही पहिलीच घटना असल्याचे रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी बी. आर. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)