शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी वाजलीच नाही, प्रशासनाला लाखोंचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:39 IST

Konkan Railway, ratnagirinews अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्यापही रेल्वेने प्रवास करण्याची मानसिकता नसल्याने या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. एरव्ही गर्दीने भरून वाहणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी सोडण्यात आलेल्या या गाड्यांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

ठळक मुद्दे कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी वाजलीच नाही, प्रशासनाला लाखोंचा तोटामुंबईत जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी, लोकांग्रहाखातर सुरू केलेल्या तुतारीला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्यापही रेल्वेने प्रवास करण्याची मानसिकता नसल्याने या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. एरव्ही गर्दीने भरून वाहणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी सोडण्यात आलेल्या या गाड्यांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी एस्. टी.सह रेल्वेच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसला.

शासनाने अनलॉकची घोषणा केल्यानंतर एस्. टी.सह रेल्वे प्रशासनानेही नियमांचे पालन करून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक ते तिरूवअनंतपुरम, एर्नाकुलम एक्स्प्रेस, दादर -सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आणि बेंगळुरू सिटी या चार गाड्या सोडण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दररोजच्या क्षमतेच्या ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. अन्यवेळी हीच संख्या १२५ टक्क्यांपेक्षाही जास्त असते. कोकणातील लोकांच्या मागणीनुसार सुरूवात करण्यात आलेल्या तुतारी एक्स्प्रेस या गाडीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.

या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता मडगावपर्यंत धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी सुरू करण्याची आवश्यकता आहे. ही गाडी सुरू झाल्याचे रेल्वे गाड्यांचे भारमान वाढण्यास मदत होईल, अशी आशा आहे. सध्या तोटा सहन करूनच या गाड्या धावत आहेत.प्रवासी संख्या घटलीकोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांवर कोरोनाचा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. वर्षभर गर्दीने फुल्ल होऊन जाणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. रेल्वेन सुरू केलेल्या तुतारी एक्स्प्रेसला पहिल्या दिवशी मुंबईहून ३३ टक्के तर परतीच्या प्रवासात ५९ टक्के तिकीटे आरक्षण झाली होती. लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला २४ सप्टेंबरपासून सरासरी ७० टक्के, कारवार एक्स्प्रेसला १५ ते १७ टक्के प्रवाशांनी तिकीट आरक्षित केली होती. हे प्रमाण खूपच कमी आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी