शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी वाजलीच नाही, प्रशासनाला लाखोंचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:39 IST

Konkan Railway, ratnagirinews अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्यापही रेल्वेने प्रवास करण्याची मानसिकता नसल्याने या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. एरव्ही गर्दीने भरून वाहणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी सोडण्यात आलेल्या या गाड्यांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

ठळक मुद्दे कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी वाजलीच नाही, प्रशासनाला लाखोंचा तोटामुंबईत जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी, लोकांग्रहाखातर सुरू केलेल्या तुतारीला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्यापही रेल्वेने प्रवास करण्याची मानसिकता नसल्याने या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. एरव्ही गर्दीने भरून वाहणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी सोडण्यात आलेल्या या गाड्यांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी एस्. टी.सह रेल्वेच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसला.

शासनाने अनलॉकची घोषणा केल्यानंतर एस्. टी.सह रेल्वे प्रशासनानेही नियमांचे पालन करून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक ते तिरूवअनंतपुरम, एर्नाकुलम एक्स्प्रेस, दादर -सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आणि बेंगळुरू सिटी या चार गाड्या सोडण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दररोजच्या क्षमतेच्या ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. अन्यवेळी हीच संख्या १२५ टक्क्यांपेक्षाही जास्त असते. कोकणातील लोकांच्या मागणीनुसार सुरूवात करण्यात आलेल्या तुतारी एक्स्प्रेस या गाडीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.

या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता मडगावपर्यंत धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी सुरू करण्याची आवश्यकता आहे. ही गाडी सुरू झाल्याचे रेल्वे गाड्यांचे भारमान वाढण्यास मदत होईल, अशी आशा आहे. सध्या तोटा सहन करूनच या गाड्या धावत आहेत.प्रवासी संख्या घटलीकोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांवर कोरोनाचा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. वर्षभर गर्दीने फुल्ल होऊन जाणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. रेल्वेन सुरू केलेल्या तुतारी एक्स्प्रेसला पहिल्या दिवशी मुंबईहून ३३ टक्के तर परतीच्या प्रवासात ५९ टक्के तिकीटे आरक्षण झाली होती. लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला २४ सप्टेंबरपासून सरासरी ७० टक्के, कारवार एक्स्प्रेसला १५ ते १७ टक्के प्रवाशांनी तिकीट आरक्षित केली होती. हे प्रमाण खूपच कमी आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी