शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी वाजलीच नाही, प्रशासनाला लाखोंचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:39 IST

Konkan Railway, ratnagirinews अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्यापही रेल्वेने प्रवास करण्याची मानसिकता नसल्याने या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. एरव्ही गर्दीने भरून वाहणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी सोडण्यात आलेल्या या गाड्यांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

ठळक मुद्दे कोकण रेल्वे मार्गावरील तुतारी वाजलीच नाही, प्रशासनाला लाखोंचा तोटामुंबईत जाणाऱ्यांची संख्या खूपच कमी, लोकांग्रहाखातर सुरू केलेल्या तुतारीला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी : अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर विशेष चार गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अद्यापही रेल्वेने प्रवास करण्याची मानसिकता नसल्याने या गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. एरव्ही गर्दीने भरून वाहणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी सोडण्यात आलेल्या या गाड्यांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यानंतर सर्व वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी एस्. टी.सह रेल्वेच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसला.

शासनाने अनलॉकची घोषणा केल्यानंतर एस्. टी.सह रेल्वे प्रशासनानेही नियमांचे पालन करून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या कोकण रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक ते तिरूवअनंतपुरम, एर्नाकुलम एक्स्प्रेस, दादर -सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस आणि बेंगळुरू सिटी या चार गाड्या सोडण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या संकटामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. दररोजच्या क्षमतेच्या ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. अन्यवेळी हीच संख्या १२५ टक्क्यांपेक्षाही जास्त असते. कोकणातील लोकांच्या मागणीनुसार सुरूवात करण्यात आलेल्या तुतारी एक्स्प्रेस या गाडीलाही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.

या गाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता मडगावपर्यंत धावणारी कोकणकन्या एक्स्प्रेस गाडी सुरू करण्याची आवश्यकता आहे. ही गाडी सुरू झाल्याचे रेल्वे गाड्यांचे भारमान वाढण्यास मदत होईल, अशी आशा आहे. सध्या तोटा सहन करूनच या गाड्या धावत आहेत.प्रवासी संख्या घटलीकोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांवर कोरोनाचा परिणाम झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. वर्षभर गर्दीने फुल्ल होऊन जाणाऱ्या या गाड्यांमधून केवळ ४० ते ७० टक्केच प्रवासी प्रवास करत आहेत. रेल्वेन सुरू केलेल्या तुतारी एक्स्प्रेसला पहिल्या दिवशी मुंबईहून ३३ टक्के तर परतीच्या प्रवासात ५९ टक्के तिकीटे आरक्षण झाली होती. लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला २४ सप्टेंबरपासून सरासरी ७० टक्के, कारवार एक्स्प्रेसला १५ ते १७ टक्के प्रवाशांनी तिकीट आरक्षित केली होती. हे प्रमाण खूपच कमी आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी