शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

तारणहार बनून जीवनदान देणारे झाड माझ्यासाठी भगवंतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST

असुर्डे/मनीष दळवी : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’, असे तुकाराम महाराज म्हणतात. झाडे फळे, फुले, औषध, सावली देतात हे सर्वांनाच ...

असुर्डे/मनीष दळवी : ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी’, असे तुकाराम महाराज म्हणतात. झाडे फळे, फुले, औषध, सावली देतात हे सर्वांनाच ठाऊक आहे; परंतु कठीण प्रसंगी हेच झाड कोणाचाही आधार नसताना तारणहार बनून जीवदान देणारे भगवान ठरले, अशी प्रतिक्रिया चिपळूण खेर्डी येथील ६० वर्षीय पूरग्रस्त संजीवन सावर्डेकर यांनी दिली.

संजीवन हे खेर्डी एमआयडीसीमधील घरडा केमिकल्स येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. घरात कोणीही कमावते नाही. मुलगा बेरोजगार, होतं नव्हतं ते तीन मुलींच्या विवाहमध्ये खर्च झालं. वृद्ध आई अंथरुणाला खिळलेली. त्यामुळे नाइलाजास्तव त्यांना नोकरी करावी लागते. दिनांक २१ जुलै २०२१ रोजी रात्रपाळीसाठी ते कामावर गेले होते. मुलगा डबा घेऊन येणार होता. परंतु, पावसाचा जाेर वाढला हाेता. सर्वत्र अंधार पसरला होता. उशिरापर्यंत मुलाने येण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला डबा घेऊन येण्यास जमले नाही. सिक्युरिटी गार्ड केबिनला ते एकटेच होते. काय करावे सुचत नव्हते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास खेर्डी एमआयडीसीमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्याचवेळी कंपनीत संरक्षक भिंत तोडून पाणी आत शिरू लागले. केबिनमध्येही पाण्याचा जोर वाढला. कंपनीत आता चारीही बाजूंनी पाणीच पाणी भरले हाेते. कंपनीतील सर्व मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी असतानाही ते हतबल झाले हाेते. उघड्या डोळ्यांनी केमिकलचे ड्रम वाहून देऊ जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी कंपनीच्या संरक्षक भिंतीवर ते चढले.

पाणी वाढतच राहिले. शेवटी जवळच असणाऱ्या झाडाचा त्यांनी आधार घेतला. गावात राहिल्यामुळे झाडावर चढता येत होते. त्यामुळे झाडाच्या टोकावर जाऊन बसले. आता कंटेनर वाहून जाताना दिसत होते. कंटेनरवर बसलेली माणसेही वाहून जाताना बघत होते. परंतु तेच हतबल झाले होते. ‘पाऊस कमी होऊ दे, पाणी कमी होऊ दे, माझ्या कंपनीतील व घरातील सर्वजण सुखरूप असू देत’, असे ते देवाजवळ साकडे घालत होते. अतिशय जोराची भूक लागलेली. समोर पाणीच पाणी असूनही ते पाणी पिऊ शकत नव्हते. मधुमेह रुग्ण असल्यामुळे जीव कासावीस झाला होता. दैव बलवत्तर म्हणून ते कसेबसे वाचले, असा अनुभव संजीवन सावर्डेकर यांना आला.

बुधवारी रात्री १२ ते शुक्रवारी सकाळी सात वाजेपर्यंत झाडावरच वर-खाली करीत, बसून, कधी उभा राहून बसण्याचा प्रयत्न करीत होतो. तब्बल ३१ तासांनी पाणी ओसरले, तसा मी झाडावरून उतरलो. प्रथम संकटसमयी देवदूत ठरलेल्या झाडाला प्रथम वंदन केले. हळूहळू चिखल-पाण्यातूनच वाट काढीत घरी पाेहोचलो. घर संपूर्ण पाण्याखाली गेलेले; परंतु घरातील माणसे सुखरूप होती. देवाचे आभार मानले. घरी गेल्यावर सर्वांनी मला बघितल्यावर व मी सर्वांना बघितल्यावर हायसे वाटले.

-----------------------------

आईला बघून रडूच काेसळले

माझ्या वयोवृद्ध आईला बघून माझ्या भावना अनावर झाल्या. आईला मिठी मारून धाय मोकलून रडलो. घरातील होते नव्हते ते सारे गेले; परंतु माझी लाखमोलाची माणसे जिवंत होती, हेच माझ्यासाठी सर्वकाही होते. गेले बारा दिवस घरातील चिखल-गाळ उपसत आहे. संसार उभारण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सावर्डेकर यांनी सांगितले.

-------------------

घरच्यांच्या आठवणीने जीव कासावीस

माझे घर खेर्डी बाजारपेठेत असल्याने काय झाले असेल, माझी आजारी, वयोवृद आईचे काय झाले असेल, या काळजीने माझा जीव कासावीस झाला. पाणी आणखी वाढू लागले, तसे माझे ब्लड प्रेशर वाढू लागले. नेटवर्क बंद असल्याने घराशी किंवा कंपनीतील कोणाशीही संपर्क होत नव्हता; परंतु, कोण जाणे, यावेळी जावई मयूर कदम यांचा फोन आला. सर्वजण काळजीत होते. त्यांना मी भिंतीवर उभा आहे, हे सांगतानाच फोन बंद पडला.

110821\4646img-20210809-wa0034.jpg

पूरग्रस्त संजीवन सावर्डेकर...