शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

कचरा डेपो इचलकरंजीचा; त्रास मात्र ग्रामीण भागाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2016 23:49 IST

जनआंदोलन लोकप्रतिनिधींकडून बेदखल : यड्राव, टाकवडे, शहापूर, आर. के. नगरचा भाग बाधित--कचऱ्याने केला कचरा

घन:शाम कुंभार -- यड्राव--इचलकरंजी शहरातील सर्व कचरा गोळा करून ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे कचरा डेपोत आणून टाकला जातो. प्रत्येक दिवशी चाळीस ट्रॅक्टरमधून ८० फेऱ्यांत सुमारे १२० मेट्रिक टन कचरा याठिकाणी येऊन पडतो. हा कचरा वाऱ्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरतो. कचरा इचलकरंजीचा, परंतु त्रास यड्राव, टाकवडे, शहापूर व सांगली नाका परिसराला सहन करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याने नागरिकांनाच वारंवार आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले, परंतु याची दखल लोकप्रतिनिधींनी घेतली नाही.कचरा डेपोच्या पूर्वेस टाकवडे गावची हद्द आहे. उत्तरेस यड्रावचा परिसर, पश्चिमेस शहापूर व सांगली नाका व दक्षिणेस आसरानगर, सहकारनगर हा इचलकरंजीचा परिसर आहे. या कचरा डेपोत चाळीस ट्रॅक्टर-ट्रॉलीने दोन-दोन फेऱ्या कचरा भरून आणून टाकतात. प्रत्येक खेपेस सुमारे टन-दीड टन कचरा या ट्रॉलीत मावतो. असा एकूण सुमारे १२० टन दररोज संपूर्ण शहरातील कचरा गोळा होतो.कचरा शहरातून वाहून आणताना बऱ्याच ट्रॉलीवर ताडपत्री किंवा झाकण नसल्याने भरधाव ट्रॉलीतून हा कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावरच पडतो. रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याने दुर्गंधी पसरते. तसाच उर्वरित कचरा डेपोमध्ये टाकण्यात येतो. रॅक्टर-ट्रॉलीचालकांना फक्त खेपेची काळजी असते. कचरा कोठे पडतो, याकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. डेपोतील कचरा वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात उडून यड्राव, टाकवडे, शहापूर, आर. के. नगर, सांगली नाका, आसरानगर परिसरात उडून जातो. तेथील नागरिक, रहिवासी व शेतकऱ्यांना हा कचरा गोळा करून बाजूला फेकण्याचा उपद्व्याप सहन करावा लागत आहे.या कचऱ्याच्या त्रासाला वैतागून नागरिकांना स्वयंस्फूर्तीने आंदोलनासाठी रस्त्यावर यावे लागले आहे, परंतु याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहिले नसल्याने नागरिकांच्या समस्याही कचरा डेपोतील कचऱ्यासारख्या साठून वाढत आहे. तरीही याकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना वेळ नाही. प्रशासनही याकडे गांभीर्याने पाहात नाही. इचलकरंजीच्या कचरा डेपोचा आणखी किती त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागणार, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर अवलंबून आहे. कचरा डेपोत रस्त्यामध्येच ट्रॉलीतून कचरा उतरण्यात येतो. दुसऱ्या छायाचित्रात कचरा डेपोतील वाऱ्याने उडून आलेला कचरा गोळा करून टाकताना यड्राव हद्दीतील शेतकरी.कचरा डेपो इचलकरंजीचा व त्रास आम्हाला, हा अन्याय सहन करणार नाही. नगरपालिकेने याबाबत खबरदारी घ्यावी; अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल. --- रोहित कदम, ग्रा. पं. सदस्य, यड्राव कचरा बाहेरच पडत असल्याने दुर्गंधी, मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. त्याचा बंदोबस्त करावा व तत्काळ कचरा डेपो हलवावा. =- शेखर हळदकर, ‘इनपा’चे शिक्षण समिती सदस्य