शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

धनगरवाडीला दिशांतरचा सहकार्याचा हात

By admin | Updated: March 23, 2015 00:34 IST

आगळा उपक्रम : गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

चिपळूण : लोकवस्तीपासून आणि एकूणच सामाजिक विकासाच्या प्रवाहापासून खूप दूर असणाऱ्या धनगर समाजाच्या वाड्यावस्त्या. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सेवासुविधांपासून दूर असणाऱ्या या वाड्यावस्त्यांना सहकार्याचा स्नेहार्द हात उपक्रमांतर्गत १२ कुटुंबांसाठी साहित्य व ३२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ‘दिशांतर’ संस्थेतर्फे करण्यात आले. गावातील लोकवस्तीपासून अक्षरश: कोसो दूर असणाऱ्या वाड्यावस्त्या धनगर समाजाच्या निमित्ताने पाहता येतात. सह्याद्रीच्या खोऱ्यातील डोंगरावर पूर्वापार वस्ती करणाऱ्या या समाजाला स्वातंत्र्यानंतरही सेवासुविधांपासून वंचितच राहवे लागले आहे. वस्तीवर कुणी आजारी पडले, स्त्री गरोदर असेल, कुणी झाडावरून पडले वा कुणाला साप अथवा विंचूदंश झाला, तर अशा अत्यवस्थ अवस्थेतील रुग्णाला डोलीतून न्यायचे असेल तर अडीच ते तीन तासाचे अंतर पार करावे लागत. जिथल्या दऱ्याखोऱ्यातून एकट्या माणसाला चालायलादेखील काही ठिकाणी कठीण जाते, तिथे डोलीतून कुणाला नेणे किती जिकरीचे असेल याची कल्पनाही न केलेली बरी. अनेकदा व्यवस्थेच्या या शोधाशोधीतच अनेकांचे प्राण गेलेले असतात. ओवळी गावातील राजवाड्याच्या मागील भागातून साधारणत: अर्धा तास चालल्यानंतर डोंगररांगा सुरु होतात. येथील उभ्या वाटांची बिकट वहिवाट न थकता चालत राहिलं तर पावणे दोन तासात पाच डोंगर ओलांडले की सहाव्या डोंगराचा कळसभाग दिसू लागतो. आधीच श्वास कोंडत आलेला नि पायात गोळे आलेले अशा स्थितीत आणखीन एक डोंगर खुणावताना दिसतो नि शरीरातील उरले सुरले त्राण निघून जातात. पण, पायाखालचा डोंगर संपत असतानाच भाताच्या उडव्या दिसू लागतात. आपण कळकवणे खलिपावाडीत अर्थात धनगरवाडीत पोहोचलेलो असतो. पहिली ते दहावी या इयत्तांमधील ३२ विद्यार्थी येथे आहेत. ‘दिशांतर’ टीमने सहकार्याचा हात उपक्रमाअंतर्गत इथल्या प्रत्येक कुटुंबाला कपड्यांच्या पॅकेटस्चे वितरण केले. (प्रतिनिधी)