शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

तिघा अधिकार्‍यांच्या केल्या बदल्या

By admin | Updated: June 5, 2014 00:41 IST

जिल्हा परिषद : तीन विभागांचा कार्यभार प्रभारींकडे

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाली आहे. त्यामुळे ही पदे रिक्त झाली असून, त्यांचा कारभार आता प्रभारी पाहात आहेत. रिक्त झालेली पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन खिळखिळे करण्याचा शासनाचा डाव आहे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल. एस. बागुल यांची दोन महिन्यांपूर्वीच जळगाव जिल्हा परिषद येथे बदली झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर १ जून रोजी जळगावसाठी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी अनिलकुमार कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर झाली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांना त्यावेळी कार्यमुक्त न केल्याने ते मंगळवारपर्यंत जिल्हा परिषदेत कार्यरत होते. आता त्यांनी स्वत:च्या प्रयत्नाने हिंगोली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली फिरवून घेतली. जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोज वेताळ यांची बदली मिरज येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी झाली आहे. या तिन्ही अधिकार्‍यांना प्रशासनाने नुकतेच कार्यमुक्त केले. जिल्हा कृषी विकास अधिकारी या पदावर पुणे येथील आयुक्त कार्यालयातील उपसंचालक पी. एन. देशमुख यांची बदली झाली आहे. ते अद्याप रुजू झालेले नाहीत. शिक्षणाधिकारी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अजून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पदांचा कार्यभार प्रभारींकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची ही प्रमुख पदे किती दिवस रिक्त राहणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)