शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

तिघा अधिकार्‍यांच्या केल्या बदल्या

By admin | Updated: June 5, 2014 00:41 IST

जिल्हा परिषद : तीन विभागांचा कार्यभार प्रभारींकडे

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाली आहे. त्यामुळे ही पदे रिक्त झाली असून, त्यांचा कारभार आता प्रभारी पाहात आहेत. रिक्त झालेली पदे कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन खिळखिळे करण्याचा शासनाचा डाव आहे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एल. एस. बागुल यांची दोन महिन्यांपूर्वीच जळगाव जिल्हा परिषद येथे बदली झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडण्यात आले नव्हते. मात्र, त्यानंतर १ जून रोजी जळगावसाठी त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी अनिलकुमार कुलकर्णी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांची बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर झाली होती. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्यांना त्यावेळी कार्यमुक्त न केल्याने ते मंगळवारपर्यंत जिल्हा परिषदेत कार्यरत होते. आता त्यांनी स्वत:च्या प्रयत्नाने हिंगोली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली फिरवून घेतली. जिल्हा कृषी विकास अधिकारी मनोज वेताळ यांची बदली मिरज येथे उपविभागीय कृषी अधिकारीपदी झाली आहे. या तिन्ही अधिकार्‍यांना प्रशासनाने नुकतेच कार्यमुक्त केले. जिल्हा कृषी विकास अधिकारी या पदावर पुणे येथील आयुक्त कार्यालयातील उपसंचालक पी. एन. देशमुख यांची बदली झाली आहे. ते अद्याप रुजू झालेले नाहीत. शिक्षणाधिकारी आणि महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अजून कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही पदांचा कार्यभार प्रभारींकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची ही प्रमुख पदे किती दिवस रिक्त राहणार आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (शहर वार्ताहर)