शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळे गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:50 IST

उन्हाळी सुटीमुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गणपतीपुळे, पावस या धार्मिक स्थळांसह सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. आरेवारे मार्गावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हॉटेल्स, लॉजिंगसह यात्री निवासमध्येही गर्दी वाढली आहे.

ठळक मुद्देसुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळे गजबजली, कोकणी मेव्याचा आस्वाद पर्यटकांच्या वाहनांमुळे महामार्गावर लांबच लांब रांगा

रत्नागिरी : उन्हाळी सुटीमुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गणपतीपुळे, पावस या धार्मिक स्थळांसह सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. आरेवारे मार्गावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हॉटेल्स, लॉजिंगसह यात्री निवासमध्येही गर्दी वाढली आहे.शाळा, महाविद्यालयांना दीर्घ सुटी असल्याने जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे मार्गावर उन्हाळी सुटीनिमित्त जादा गाड्या सुरू केल्या आहेत. एस. टी.च्या शिवशाही बसेसनाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.शेजारच्या जिल्ह्यातून एक दिवसीय सहल काढून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पर्यटक खासगी वाहनातून एक दिवसाच्या सहलीसाठी येत आहेत. गुहागर, मार्लेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, पावस, आडीवरे या ठिकाणी येण्याचा कल वाढला आहे. ठराविक भाडे ठरवून मंडळी खासगी बसेस, १६ सीटर, ४० सीटर गाड्या, छोट्या कार यांना मागणी वाढली आहे. एसी, नॉन एसी अशा वर्गवारीमध्ये किलोमीटरचे दर ठरविण्यात येत आहेत.उन्हाळी सुटीबरोबर कोकणी मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळत आहेत. एस. टी. बसेस, रेल्वे, खासगी आराम बसेसना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. प्रवाशांनी फुल्ल भरून गाड्या पळत आहेत. गणपतीपुळे, आरे-वारे, काजिरभाटी, मांडवी, भाट्ये बीच, गुहागर, राजापूर, मार्लेश्वर, रत्नागिरी, दापोली, याठिकाणी राज्यासह परराज्यातील पर्यटकांनी गर्दी केली आहे.

सुटीमुळे गणपतीपुळे, पावस परिसरात पर्यटक बहुसंख्येने आले आहेत. सागरी महामार्गाने प्रवास करीत असल्यामुळे शिरगाव येथील अरूंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. रत्नागिरी करून गोव्याला जाणारे पर्यटकही अधिक आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. रत्नागिरी, गणपतीपुळे दर्शनानंतर माघारी फिरणारेही अधिक आहेत. कोल्हापूर मार्गावरही पर्यटकांची वाहने अधिक आहेत. गर्दीमुळे गणपतीपुळे परिसरातील गावांमध्ये पर्यटक निवासासाठी थांबत आहेत.समुद्रस्नानाचा आनंदसमुद्रात बोटिंग, किनाऱ्यावर घोडेस्वारी, परचुरी खाडीत मगर सफर, माडा पोफळींच्या बागेत कोकणी लोककलांचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वाळूत खेळण्याबरोबर समुद्रस्नानाचा आनंदही पर्यटक लुटत आहेत. दाभोळ-धोपावे मार्गावरील फेरीबोटही फायदेशीर ठरत आहे.

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी