शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सौंदळ स्थानकामुळे पर्यटन वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 00:31 IST

राजापूर तालुका : दिवाळीपूर्वी होणार भूमीपूजन

राजापूर : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी बहुचर्चित अशा राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकाला मंजुरी दिल्याने कोकण रेल्वेच्या नकाशावर त्याची नोंद होणार आहे, तर खऱ्या अर्थाने बहुसंख्य तालुकावासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केवळ प्रवासी वाहतूक यादृष्टीने नाही तर पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील भविष्यात हे स्थानक उपयुक्त ठरणार आहे.कोकणात रेल्वेचे आगमन झाल्याच्या घटनेला जवळपास दीड दशकाचा कालखंड लोटला. मात्र, विविध भागातील मोठ्या प्रमाणातील जनता आपल्या लगत एखादे स्थानक नसल्याने उपेक्षित राहात होती व तो अनुभव राजापूर तालुक्यातील जनतेने घेतला. अशा सौंदळ स्थानकाची निर्मिती करण्याबाबत मागील बावीस वर्षे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशपांडे यांनी सातत्याने उत्तम संघटन कौशल्याच्या जोरावर रेल्वे मंत्रालयाकडे सौंदळ स्थानकाचा पाठपुरावा सुरुच ठेवला होता. तथापी एवढी वर्षे सातत्याने काही ना काही तांत्रिक त्रुटी काढीत वेळ मारून नेण्याचे काम कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी चालूच ठेवले होते. पण, आपल्या मागणीला सत्यात उतरविण्यासाठी अधीर झालेल्या देशपांडेंनी त्या अधिकाऱ्यांची डाळ शिजू दिली नाही. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना सौंदळ स्थानकाला मान्यता द्यावीच लागली.सौंदळ या स्थानकासाठी २५ कोटीचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा होताच तालुक्याच्या पूर्व परिसरात जंगी स्वागत झाले. आता साधारणत: दसरा ते दिवाळी या दरम्यान सौंदळ स्थानकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, तशी तयारी व बोलणी सुरु असल्याची माहिती सौंदळ रेल्वे स्थानक निर्मितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चंद्रकांत देशपांडे यांनी दिली. राजापूर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच सौंदळ स्थानक उभारले जात आहे. मुंबई - गोवा महामार्गापासून ओणीतून आतमध्ये सुमारे ८ ते १० किलोमीटर एवढ्या अंतरावर, तर ओणी - अणुस्कुरा या मार्गाला खेटूनच ते असेल. त्यामुळे प्रवाशांना इथून प्रवास करताना अडचण येणार नाही. सध्याचे राजापूर रोड स्टेशन हे एका टोकाला असल्याने लगतच्या परिसरातील काही गावातील नागरिक वगळता कुणी तेथून प्रवास करायला धजावत नाही. रात्रीच्या जाणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांना जायचे असेल तर तेथे जाण्यासाठी एस. टी.ची सुविधा नाही. त्यामुळे रिक्षाने प्रवास करावा लागतो. रिक्षाचालक ३०० रुपयांपेक्षा जास्त पैसे घेतात, असे आजवरचे चित्र राहिले आहे. त्यामुळे राजापूरवासीयांसह विविध भागातील प्रवाशांना सोयीचे ठरेल, अशा सौंदळ स्थानकाचा पर्याय मिळणार आहे. ओणी पट्ट्यातील तसेच पूर्व विभागातील प्रवासी लगतच्या लांजा तालुक्यातील विलवडे या स्थानकाचा आधार घेतात. तेथे फार मोठी गर्दी उसळते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील सर्व प्रवासी सौंदळचाच पर्याय निवडू शकतात. केवळ राजापूर तालुकाच नाही, तर लगतच्या अणुस्कुरा व त्याच्या आजूबाजूच्या प्रवाशांना रेल्वेसाठी थेट कोल्हापूर गाठावे लागते. त्यामुळे तिकडच्या प्रवाशांनादेखील सुलभ प्रवास करण्यासाठी हे स्थानक उपयुक्त ठरु शकणार आहे. (प्रतिनिधी)राजापूरकरांची होणार सोयपूर्वेकडे सह्याद्री, तर पश्चिमेला अरबी समुद्र अशा विस्तीर्ण पसरलेल्या राजापूर तालुक्याला विद्यमान क्षणी केवळ एकच रेल्वेस्थानक आहे व तेसुद्धा शहरापासून १८ ते २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोलये गावी. त्या स्थानकाचा फायदा आजूबाजूच्या १५ ते २० गावांना सोडला, तर उर्वरित राजापूर तालुकावासीय हे विलवडे, रत्नागिरी अशा ठिकाणीच जाऊन रेल्वेने प्रवास करतात, हे मागील काही वर्षांचे चित्र आहे. त्यामुळे राजापूरकरांच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल.