शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :पर्यटनाला आता सरोवरांचे पाठबळ, दापोली तालुक्यातील पाच गावांकरिता तब्बल ४ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 16:20 IST

राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने राज्य योजनेंतर्गत राज्य सरोवर संवर्धन योजना या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दापोली तालुक्यातील गिम्हवणे, मुरूड, गुडघे, विरसई व गावतळे आदी पाच गावांकरिता तब्बल ४ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे दापोलीच्या पर्यटनाला आता सरोवरांचे पाठबळ मिळणार आहे.

ठळक मुद्देतलाव, सरोवरे व मोठे जलाशय संवर्धन करण्यासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनादापोली तालुक्यातील गिम्हवणे, मुरूड, गुडघे, विरसई, गावतळे गावांकरिता ४ कोटी ५२ लाखांचा निधी पर्यावरण विभागाच्या परवानगीशिवाय बोटिंगची सुविधा नाहीमंजूर रकमेपैकी ९० टक्के निधी शासन, १० टक्के निधी ग्रामपंचायत देणार

दापोली : राज्यातील तलाव, सरोवरे व मोठे जलाशय यांचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने राज्य योजनेंतर्गत राज्य सरोवर संवर्धन योजना या आर्थिक वर्षापासून सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दापोली तालुक्यातील गिम्हवणे, मुरूड, गुडघे, विरसई व गावतळे आदी पाच गावांकरिता तब्बल ४ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे दापोलीच्या पर्यटनाला आता सरोवरांचे पाठबळ मिळणार आहे.या योजनेंतर्गत तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्रोत निश्चित करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, तलावात साचलेला व आरगॅनिक गाळ काढणे, तलावाची गुणवत्ता टिकवण्यासाठी तलावातील अनावश्यक व उपद्रवी वनस्पती नष्ट करून त्यांची वाढ नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे व तलावातील जैविक प्रक्रियेद्वारे तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारणे तसेच किनारा सौंदर्यीकरण, हरितपट्टा विकसित करणे, कुंपण घालणे, मनोरंजनासाठी बालोद्यान, नौकाविहार, कमी किंंमतीची स्वच्छतागृहे बांधणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

याकरिता मुरूडला ७८ लाख २३ हजार, गिम्हवणेला ४३ लाख ६१ हजार, गुडघेला ४५ लाख ४२ हजार, विरसईला ८६ लाख ३७ हजार व तळ्यांचे गाव म्हणून प्रसिध्द असणाऱ्या गावतळेला तब्बल २ कोटी ९ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.याकरिता राज्य सरोवर योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्यामार्फत कोंड तलावाचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धनासाठी सविस्तर प्रकल्प अहवालानुसार यात नमूद केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी मंजूर एकूण रकमेपैकी ९० टक्के निधी राज्य शासन व १० टक्के निधी ग्रामपंचायत उपलब्ध करून देणार आहे.याअंतर्गत नमूद कामांना प्रथमत: तांत्रिक मंजुरी प्राप्त करून घेण्याकरिता योजनेच्या प्रत्येक टप्प्यात हाती घेण्यात येणाऱ्या कामाचे मंजूर तांत्रिक आराखडे, अंदाजपत्रके, नकाशे, संकल्पचित्रे आदी शासनाकडे काम सुरू करण्यापूर्वी सादर करणे बंधनकारक राहणार आहे.ही कामे विहीत कालावधीत पूर्ण करण्याची व कामाची गुणवत्ता राखण्याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांची राहणार आहे. सदर प्रकल्पाच्या कामासाठी लागणारा निधी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या देखरेखेखाली खर्च करण्यात यावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.प्रकल्पाची यथायोग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीकोनातून प्रकल्प अंमलबजावणी समितीची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात यावी. या समितीत ग्रामपंचायतीतील संबंधित अधिकारी, कर्मचारी, पर्यावरणविषयक तज्ज्ञ, उपरोक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासह ग्रामपंचायतीला आवश्यक वाटतील अशा प्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे. ही समिती प्रकल्पांतर्गत होत असलेल्या सर्व कामकाजाचे सनियंत्रण व कामांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणार आहे.काम पूर्ण झाल्यावर किमान पुढील १० वर्षापर्यंत तलावाची देखभाल व दुरूस्ती ग्रामपंचायतीने स्वखर्चाने करावयाची आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेलमधून, लोकवस्तीतून, वाणिज्यिक आस्थापनेतून निघणारे सांडपाणी तलावात जाणार नाही, याची जबाबदारी संबंधित स्थानिक संस्थेची असेल.

राज्य शासन पर्यावरण विभागाच्या परवानगीशिवाय तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नाही. तसेच यांत्रिक बोटींचा वापर तलावात कुठल्याही प्रयोजनासाठी केला जाणार नाही. फक्त पॅडल बोटच्या वापराला परवानगी असेल. तलावात मासेमारी करण्यात येऊ नये व करावयाची झाल्यास फक्त मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांसाठी परवानगी देण्यात येणार आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwater parkवॉटर पार्कtourismपर्यटन