शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:13 IST

सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले हॉटेल्स, लॉज १० जूनपर्यंत फुल्ल, रेल्वे, बसगाड्यांनाही गर्दी

रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.कोकणात हिवाळी आणि उन्हाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढतो. विद्यार्थीवर्गाला दिवाळीची सुटी तशी फारशी नसते. मात्र, उन्हाळी सुटी महिना, दीड महिना असल्याने या कालावधीत बहुतांश लोक कुटुंबासह पर्यटनाला निघतात.ह्यमार्च एंडिंगह्णच्या धावपळीतून बाहेर पडलेला नोकरदारवर्गही रिलॅक्स होण्यासाठी आठ - दहा दिवसांची सुटी काढून फिरायला बाहेर पडतो. कोकणातील समुद्र किनारे आणि वनराजी पर्यटकांना हापूस आंब्याच्या ओढीने बहुतांश पर्यटक या कालावधीत कोकणात येतात.सध्या मे महिना सुरु असल्याने रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल झाला आहे. रत्नागिरीतील भगवतीबंदर, भाट्ये, मांडवी किनारा, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी, आरे-वारे किनारा, गणपतीपुळे, मुरूड - दापोली, गुहागर, वेळणेश्वर आदी पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजलेली आहेत. त्यामुळे या भागातील हॉटेल्स, लॉज सध्या पर्यटकांनी भरलेली आहेत. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ सुरू असते.या कालावधीत एस. टी. गाड्यांबरोबरच कोकण रेल्वेच्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडूनही त्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीचा हंगाम पाहता सध्या एस. टी.तून मुंबई प्रवास ४५० रूपयांत होत असताना खासगी गाड्यांना नॉन एसीसाठी ७०० ते ८००, तर एसी गाड्यांना ९०० ते ११००पर्यंत भाडे मोजावे लागत आहे.गेल्या काही वर्षात रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. यंदा तर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा हा हंगाम अगदी १० ते १५ जूनपर्यंत राहील, असे मत हॉटेल व्यावसायिक तसेच लॉजधारकांकडून व्यक्त होत आहे.

पर्यटन हंगामात यंदा पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे.

 

दरवर्षी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. याहीवर्षी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने आताच लॉजचे ८५ टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे. अगदी ८ ते १० जूनपर्यंतचे आरक्षणही आतापासूनच फुल्ल झाले आहे.- दीपक साळवी,हॉटेल ग्रार्इंड इन, रत्नागिरी.

 

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी