शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:13 IST

सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्दे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन हंगामाला जोर, बीचेस गर्दीने फुलले हॉटेल्स, लॉज १० जूनपर्यंत फुल्ल, रेल्वे, बसगाड्यांनाही गर्दी

रत्नागिरी : सध्या जिल्ह्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. जिल्ह्याच्या पर्यटनस्थळांबरोबरच परिसरातील हॉटेल्स, लॉज सध्या ८५ टक्के आरक्षित झाली असून, हा हंगाम १० जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.कोकणात हिवाळी आणि उन्हाळी हंगामात पर्यटकांचा ओघ वाढतो. विद्यार्थीवर्गाला दिवाळीची सुटी तशी फारशी नसते. मात्र, उन्हाळी सुटी महिना, दीड महिना असल्याने या कालावधीत बहुतांश लोक कुटुंबासह पर्यटनाला निघतात.ह्यमार्च एंडिंगह्णच्या धावपळीतून बाहेर पडलेला नोकरदारवर्गही रिलॅक्स होण्यासाठी आठ - दहा दिवसांची सुटी काढून फिरायला बाहेर पडतो. कोकणातील समुद्र किनारे आणि वनराजी पर्यटकांना हापूस आंब्याच्या ओढीने बहुतांश पर्यटक या कालावधीत कोकणात येतात.सध्या मे महिना सुरु असल्याने रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल झाला आहे. रत्नागिरीतील भगवतीबंदर, भाट्ये, मांडवी किनारा, पावस येथील स्वामी स्वरूपानंद समाधी, आरे-वारे किनारा, गणपतीपुळे, मुरूड - दापोली, गुहागर, वेळणेश्वर आदी पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजलेली आहेत. त्यामुळे या भागातील हॉटेल्स, लॉज सध्या पर्यटकांनी भरलेली आहेत. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची वर्दळ सुरू असते.या कालावधीत एस. टी. गाड्यांबरोबरच कोकण रेल्वेच्या गाड्यांना गर्दी वाढली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडूनही त्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीचा हंगाम पाहता सध्या एस. टी.तून मुंबई प्रवास ४५० रूपयांत होत असताना खासगी गाड्यांना नॉन एसीसाठी ७०० ते ८००, तर एसी गाड्यांना ९०० ते ११००पर्यंत भाडे मोजावे लागत आहे.गेल्या काही वर्षात रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. यंदा तर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटनाचा हा हंगाम अगदी १० ते १५ जूनपर्यंत राहील, असे मत हॉटेल व्यावसायिक तसेच लॉजधारकांकडून व्यक्त होत आहे.

पर्यटन हंगामात यंदा पर्यटकांची लक्षणीय वाढ झाली आहे. पर्यटकांच्या संख्येबरोबरच वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गांवर आता वाहनांची गर्दी दिसू लागली आहे.

 

दरवर्षी रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. याहीवर्षी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने आताच लॉजचे ८५ टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे. अगदी ८ ते १० जूनपर्यंतचे आरक्षणही आतापासूनच फुल्ल झाले आहे.- दीपक साळवी,हॉटेल ग्रार्इंड इन, रत्नागिरी.

 

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी