शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

ग्रामीण साहित्य संमेलन आजपासून

By admin | Updated: January 30, 2016 00:13 IST

पाचल येथे आयोजन : स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारकर साहित्यनगरी सजली

वाटूळ : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व ग्रामपंचायत, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० व ३१ जानेवारी असे दोन दिवस दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारकर साहित्यनगरीत ग्रामीण साहित्य संमेलनाची रेलचेल सुरु झाली आहे.सरस्वती विद्यामंदिर, पाचल येथील वाडिया सभागृहाला साहित्य नगरीचे स्वरुप आले आहे. ग्रामीण कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन, जीवन गौरव पुरस्कार यांचे वितरण यावेळी होणार आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यिक मदन हजेरी यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड झाली आहे. ध्वजारोहण सरपंच अपेक्षा मासये यांचेहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक मनोहर खापणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शांताराम पाटकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. संमेलनामध्ये ग्रामीण साहित्यकार अप्पासाहेब खोत यांची ‘ग्रामीण कथा’, रमेश कदम ‘ग्रामीण सांस्कृतिक साहित्य’ तसेच नामदेव, खामकर ‘फुले, शाहू, आंबेडकर चळवळ’, प्राचार्य व्ही. के. खाडे हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ग्रामीण विकास’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुरु होणाऱ्या साहित्य संमेलनाचा समारोप, दि. ३१ जानेवारी रोजी १२.३० वाजता होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कामगार नेते अ‍ॅड. सदानंद शेट्ये, अजित यशवंतराव, अ‍ॅड. सुरेश मोरे, सिद्धाली मोरे, महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, पंचायत समिती सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी रबसे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, दत्ता कदम, तुकाराम शिंदे, गणपत शिर्के, कुंडलिक अघाटे उपस्थित राहणार आहे. (वार्ताहर)