शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

ग्रामीण साहित्य संमेलन आजपासून

By admin | Updated: January 30, 2016 00:13 IST

पाचल येथे आयोजन : स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारकर साहित्यनगरी सजली

वाटूळ : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व ग्रामपंचायत, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० व ३१ जानेवारी असे दोन दिवस दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारकर साहित्यनगरीत ग्रामीण साहित्य संमेलनाची रेलचेल सुरु झाली आहे.सरस्वती विद्यामंदिर, पाचल येथील वाडिया सभागृहाला साहित्य नगरीचे स्वरुप आले आहे. ग्रामीण कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन, जीवन गौरव पुरस्कार यांचे वितरण यावेळी होणार आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यिक मदन हजेरी यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड झाली आहे. ध्वजारोहण सरपंच अपेक्षा मासये यांचेहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक मनोहर खापणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शांताराम पाटकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. संमेलनामध्ये ग्रामीण साहित्यकार अप्पासाहेब खोत यांची ‘ग्रामीण कथा’, रमेश कदम ‘ग्रामीण सांस्कृतिक साहित्य’ तसेच नामदेव, खामकर ‘फुले, शाहू, आंबेडकर चळवळ’, प्राचार्य व्ही. के. खाडे हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ग्रामीण विकास’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुरु होणाऱ्या साहित्य संमेलनाचा समारोप, दि. ३१ जानेवारी रोजी १२.३० वाजता होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कामगार नेते अ‍ॅड. सदानंद शेट्ये, अजित यशवंतराव, अ‍ॅड. सुरेश मोरे, सिद्धाली मोरे, महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, पंचायत समिती सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी रबसे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, दत्ता कदम, तुकाराम शिंदे, गणपत शिर्के, कुंडलिक अघाटे उपस्थित राहणार आहे. (वार्ताहर)