शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

ग्रामीण साहित्य संमेलन आजपासून

By admin | Updated: January 30, 2016 00:13 IST

पाचल येथे आयोजन : स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारकर साहित्यनगरी सजली

वाटूळ : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व ग्रामपंचायत, पाचल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० व ३१ जानेवारी असे दोन दिवस दुसरे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यसैनिक गोपाळ नारकर साहित्यनगरीत ग्रामीण साहित्य संमेलनाची रेलचेल सुरु झाली आहे.सरस्वती विद्यामंदिर, पाचल येथील वाडिया सभागृहाला साहित्य नगरीचे स्वरुप आले आहे. ग्रामीण कवी संमेलन, पुस्तक प्रदर्शन, जीवन गौरव पुरस्कार यांचे वितरण यावेळी होणार आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बालसाहित्यिक मदन हजेरी यांची निवड झाली असून, स्वागताध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव यांची निवड झाली आहे. ध्वजारोहण सरपंच अपेक्षा मासये यांचेहस्ते होणार असून, कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक मनोहर खापणे यांच्या उपस्थितीत होणार आहे.यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शांताराम पाटकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. संमेलनामध्ये ग्रामीण साहित्यकार अप्पासाहेब खोत यांची ‘ग्रामीण कथा’, रमेश कदम ‘ग्रामीण सांस्कृतिक साहित्य’ तसेच नामदेव, खामकर ‘फुले, शाहू, आंबेडकर चळवळ’, प्राचार्य व्ही. के. खाडे हे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ग्रामीण विकास’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत.दि. ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुरु होणाऱ्या साहित्य संमेलनाचा समारोप, दि. ३१ जानेवारी रोजी १२.३० वाजता होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कामगार नेते अ‍ॅड. सदानंद शेट्ये, अजित यशवंतराव, अ‍ॅड. सुरेश मोरे, सिद्धाली मोरे, महिला व बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, पंचायत समिती सभापती सोनम बावकर, उपसभापती उमेश पराडकर, पंचायत समिती सदस्य शिवाजी रबसे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, दत्ता कदम, तुकाराम शिंदे, गणपत शिर्के, कुंडलिक अघाटे उपस्थित राहणार आहे. (वार्ताहर)