शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर मतदारसंघ यावेळीही चर्चेचाच

By admin | Updated: August 18, 2014 21:37 IST

राजकीय घडामोडी : विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू

संकेत गोयथळे - गुहागर -- मागील विधानसभा निवडणुकीमध्ये तत्कालीन आमदार डॉ. विनय नातू, भास्कर जाधव व तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे संपूर्ण राज्यात ही निवडणूक चर्चेची होती. यावेळी रामदास कदम रिंगणाबाहेर असले आणि आताच्या राजकीय स्थितीनुसार जाधव विरोधात डॉ. नातू थेट लढतील, असे चित्र दिसले तरी नीलेश राणे यांनी अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केल्याने यावेळीही गुहागर मतदारसंघ महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत खेड मतदारसंघ गायब झाल्याने भाजपचे वर्चस्व असलेल्या गुहागर मतदारसंघाची मागणी कदम यांनी केली. यातूनच युतीमध्ये वितुष्ट आले. जागा कदम यांना मिळाली व नातू यांनी श्रीधर सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवली. ज्यातून युतीच्या मतांचे विभाजन झाल्याने भास्कर जाधव निवडून आले. यानंतर कदम यांचे गुहागर मतदारसंघातील धावते दोन दौरेवगळता पुन्हा ते फिरकलेच नाहीत. नातू हे सुरुवातीची तीन वर्षे राजकीय विजनवासात होते. गेले वर्षभर पुन्हा नातूंनी वाडीवस्तीवर संपर्क वाढवला आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहता रामदास कदम यांनी पुन्हा गुहागर संघातून निवडणूक लढवण्याबाबत जाहीर इच्छा व्यक्त केलेली नाही. याबाबत कदम व नातूंमध्ये अंतर्गत समझोता झाल्याची चर्चा आहे. यातूनच जाधव विरोधात डॉ. नातू अशी थेट लढत होईल, असे राजकीय चित्र आहे.आता भास्कर जाधव यांना पराभूत करण्यासाठी म्हणून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे नीलेश राणे यांनी जाहीर केल्याने पुन्हा एकदा ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे दिसू लागले आहे. जाधव राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सावर्डे येथील एका कार्यक्रमात नारायण राणे यांच्यावर टीका केली आणि तेथून जाधव विरोधी राणे असा मोठा संघर्ष झाला. यातूनच दोघांच्याही समर्थकांनी एकमेकांची कार्यालये फोडली, रास्ता रोको झाला. यानंतर काही महिने हा वाद शांत झाला होता. मात्र, तरीही एकमेकांविरोधी राजकीय द्वेष कायम होता. जाधव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूक झाली. यावेळी सिंधुदुर्गचे आमदार दीपक केसरकर यांना भडकवण्याचे काम जाधव यांनी केल्याने आपला पराभव झाल्याचा राणे यांचा आरोप आहे. तालुक्यात काँग्रेस नेतृत्वहीन होती. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत नारायण राणे यांनी गुहागरकडे विशेष लक्ष देणार असल्याचे जाहीर केले होते. पण, तसे झाले नाही. आता राणे यांनी अपक्ष लढण्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली.माजी खासदार नीलेश राणे गुहागरातून अपक्ष लढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.रामदास कदम यांनी गुहागरातून निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केलेली नाही.जाधव विरोधात नातू लढत होण्याचे संकेत.