शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

काळ हेच उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:31 IST

आज मात्र अठरा वर्षांच्या ‘अनघा’ या इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थिनीनेही तसाच प्रश्न व्हाॅट्सॲप ग्रुपवर विचारला. ‘‘सर, आमची बोर्डाची ...

आज मात्र अठरा वर्षांच्या ‘अनघा’ या इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या माझ्या विद्यार्थिनीनेही तसाच प्रश्न व्हाॅट्सॲप ग्रुपवर विचारला. ‘‘सर, आमची बोर्डाची एक्झाम होणार तर आहे ना’’ या वरील दोन्ही प्रश्नांची उत्तरे जरी माझ्यासारख्या शिक्षकाकडून अनुत्तरीत राहिली असली तरी येणारा काळच त्या प्रश्नांची उत्तरे देईल. पहिलीपासून ते बारावी इयत्तेपर्यंतच्या मुलांच्या मनात म्हणजे बालवयापासून ते किशोरवयीन मुलांच्या मनात असे शिक्षणविषयक अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

आज कोरोनाच्या काळात शिक्षणाची सर्वच गणिते बदललेली आहेत. ‘गुरुकुल’ व्यवस्थेतील ‘पाठांतर पद्धत’ ही तर नाहीशी झाली आहे आहे. ऑनलाईन शिक्षण किंवा ऑनलाईन परीक्षा यांसारख्या नवीन शिक्षणातील माध्यमांचा वापर केला जाऊ लागला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ‘‘शिक्षण वाघिणीच्या दुधासारखे आहे, ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’’ कोरोनामुळे शिक्षित माणूससुद्धा शांत झाला आहे. शिक्षण हे दुधारी तलवारीसारखे असले तरी कोरोनामुळे ती दुधारी तलवार बोथट तर झाली नाही ना, असा विचार माझ्या मनामध्ये येतो. परंतु या प्रश्नाला काळच उत्तर देईल.

बारावीच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी एकच प्रश्न विचारून मन हैराण केले आहे. परीक्षा होईल काय, सीबीएसई दहावी बोर्डाच्या परीक्षेचे स्वरूपही स्पष्ट झाले. तसेच निकालाच्या तारखाही जाहीर झाल्या. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षाही रद्द झाल्या. त्यांच्या मूल्यमापनाचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला. बारावीच्या परीक्षांचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांचे शिक्षण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. कोरोनाने फक्त जगातील मनुष्यप्राण्यावरच नाही तर त्यांच्या शिक्षणप्रणालीवरही दूरगामी परिणाम केला आहे. आपली पुढील शैक्षणिक वाटचाल कशी असेल, त्याचे उत्तर येणारा काळच देईल.

- प्रा. हनुमंत लोखंडे, आडिवरे हायस्कूल, राजापूर