शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील निम्मी धरणे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:06 IST

पूर्ण भरलेल्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २२ :जिल्ह्यातील पाटबंधारे विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या ६१ लघू व २ मध्यम अशा एकूण ६३ धरण प्रकल्पांपैकी ३५ धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी १० धरणे येत्या आठवड्यात पूर्ण भरण्याची शक्यता आहे. २० जुलैपर्यंत सर्व धरणांमध्ये ३५९ .०८ दशलक्ष घनमीटर अर्थात ८०.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पूर्ण भरलेल्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पावसाअभावी भात लावणीचे काम रखडले होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भात लावणीचे कामही सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सिंचनासाठी साठवण होत असलेल्या धरणांमध्येही साठा कमी होता. मात्र दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर २० जुलैपर्यंत जिल्ह्यातील ६३ पैकी ३५ धरणे तुडुंब भरली असून, सांडव्यावरून पाणी वाहून जात आहे. रत्नागिरी शहराची पाण्याची मदार असलेल्या शीळ धरणातही शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. अतिरिक्त पाणी सांडव्यावरून वाहात आहे. या वर्षभरात रत्नागिरीच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम होणार आहे. त्यामुळे शीळ धरणातील या पाणीसाठ्यातून रत्नागिरी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तालुकानिहाय शंभर टक्के भरलेली धरणे याप्रमाणे : मंडणगड ३, दापोली ४, खेड २, गुहागर १, चिपळूण ८, संगमेश्वर ५, रत्नागिरी १, लांजा ८ आणि राजापूर ३ यांचा समावेश आहे.