शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

‘ई-पाॅस’ मशीनवर अंगठा; कोरोनाला आयतेच निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने १ मे पासून मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. यासाठी ई पाॅस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने १ मे पासून मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. यासाठी ई पाॅस मशीनवर लाभार्थ्याचा अंगठा लावणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र, कोरोनाच्या सद्यस्थितीत ही यंत्रणा कोरोनासाठी निमंत्रक असल्याने रेशन दुकानदारांनी याला तीव्र विरोध दर्शवीत धान्य वितरण न करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर दुकानदारांची ही मागणी मान्य करीत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाने ई पाॅस मशीनद्वारे धान्य वितरण न करता केवळ दुकानदाराच्या अंगठ्याने धान्य वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदारांची ही मागणी मान्य झाल्याने आता लवकरच याप्रकारे धान्य वितरित होणार आहे.

राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली आहे. या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देत प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता केंद्र सरकारनेही मे आणि जून हे दोन महिने धान्य मोफत देण्याची घोषणा केली असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.

या योजनेचा लाभ एकूण ११ लाख २६ हजार १५५ सदस्यांना मिळणार आहे. मात्र त्यासाठी लाभार्थ्याच्या अंगठ्याचा ठसा ई पाॅस मशीनवर घेणे बंधनकारक केले होते. मात्र, हे कोरोनाचा संसर्ग वाढविणारे असल्याने दुकानदारांनी विरोध केला होता. मात्र, ही मागणी मान्य झाल्याने धान्य वाटपातील अडथळा दूर झाला आहे.

ई पाॅस मशीनवर दुकानदार आणि ग्राहकांचे ठसे घेऊन वाटप होते. अशा स्वरूपाचे वाटप म्हणजे कोरोनाला निमंत्रण असल्याने त्याऐवजी केेवळ दुकानदाराचे ठसे घेऊन धान्याचे वितरण व्हावे, ही मागणी अखेर मान्य झाली.

लाभार्थ्यांपर्यंत धान्य....

शासनाच्या निर्णयानुसार मोफत धान्य देताना कुठल्याही लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही, याबाबत दुकानदारांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पाच महिन्यात धान्य अनियमित असलेल्या ग्राहकावर विशेष लक्ष ठेवावे. कोरोना काळात विलगीकरणात असलेल्या कुटुंबाचे धान्य त्याच्या वेळेनुसार वितरित करण्याच्याही सूचना आहेत.

धान्य वाटपात पारदर्शकता असावी, यासाठी शासनाने ई-पाॅस मशीनद्वारे वितरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सध्या कोराेनाचा संसर्ग पाहता आता पावतीद्वारे सध्या तरी वितरण सुरू करण्यात आले आहे.

- ऐश्वर्या काळुसे, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी