शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुटल्यानंतर तीन वर्षांनी दहावी, शौनक जोशीची परिस्थिती बेताची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:33 IST

कित्येक मुले आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी केवळ शिक्षणाच्या प्रेमापोटी परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे जात आहेत. गणपतीपुळे येथील शौनक गजानन जोशी या मुलानेही सातवीनंतर शिक्षण थांबले असतानाच रत्नागिरीतील रामकृष्ण सुर्वे दहावी अभ्यास वर्गात प्रवेश घेऊन दहावीत ६६ टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे वेदाभ्यास करत असतानाच त्याने ही परीक्षा दिली.

ठळक मुद्देशाळा सुटल्यानंतर तीन वर्षांनी दहावी, शौनक जोशीची परिस्थिती बेताचीशाळा सोडून वेदाभ्यास, परिश्रमपूर्वक अभ्यास

शोभना कांबळे रत्नागिरी :  कित्येक मुले आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी केवळ शिक्षणाच्या प्रेमापोटी परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे जात आहेत. गणपतीपुळे येथील शौनक गजानन जोशी या मुलानेही सातवीनंतर शिक्षण थांबले असतानाच रत्नागिरीतील रामकृष्ण सुर्वे दहावी अभ्यास वर्गात प्रवेश घेऊन दहावीत ६६ टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे वेदाभ्यास करत असतानाच त्याने ही परीक्षा दिली.शौनकचे वडील गणपतीपुळे येथील मंदिरात पुजारी आहेत. लहान बहीण शिवानी आता नववीत आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात सातवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या शौनकने वेदाभ्यास करावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी त्याला अलिबाग येथील वेद पाठशाळेत प्रवेश घेऊन दिला. या शाळेत तीन वर्षे झाल्यानंतर त्याला काही कारणास्तव ही शाळा सोडावी लागली आणि तो परत घरी आला.त्याला रत्नागिरीच्या वेदपाठ शाळेत प्रवेश घेतल्याने तो रत्नागिरीत त्याच्या काकांकडे राहू लागला. हा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच दहावीची परीक्षा देण्याची त्याची तीव्र इच्छा होती. ती पूर्णही झाली. रत्नागिरीतील गरजू आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या स्वराज्य संस्था चालवीत असलेल्या कै. रामकृष्ण सदाशिव सुर्वे दहावी अभ्यास वर्गाविषयी त्याला माहिती मिळाली. ही संस्था गेली आठ वर्षे अशा मुलांना अभ्यासात मदत करून बाहेरून दहावीची परीक्षा देण्यास मदत करीत आहे. या अभ्यासवर्गातून अनेक मुले दहावी परीक्षा उत्तीर्ण करून आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. काही पुढचे शिक्षण घेत आहेत.शौनकने दहावीची परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त करताच स्वराज्य संस्थेचे जितेंद्र शिवगण यांनी त्याला मदत करून या अभ्यासवर्गात बसवले. ऑगस्टमध्ये या अभ्यासवर्गात आलेल्या शौनकने मन लावून अभ्यास करण्यास सुरूवात केली. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत दहावी अभ्यासवर्ग, त्यानंतर २ ते ६ वेद पाठशाळा असे दोन्ही अभ्यासक्रम सांभाळत त्याने परीक्षेची तयारी सुरू केली. घरी आल्यानंतर तो दोन तास नेटाने अभ्यास करायचा. काही वेळा तो पौरोहित्यासाठीही जायचा.अभ्यासवर्गात मार्गदर्शन करणाऱ्या सुवर्णा चौधरी, सोनाली डाफळे, दीपाली डाफळे, पल्लवी पवार, कुशल जाधव, सुविधा गाडेकर, अपेक्षा पाटील यांनी त्याला शिकविण्यास सुरूवात केली. यावेळी दहावीचा अभ्यासक्रम बदलला असल्याने या सर्वांकरिता आव्हानच होते. त्यातच यावर्षीपासून मिळणारे अधिकचे २० गुणही बंद करण्यात आले आहेत. मात्र, या मार्गदर्शनामुळे आणि शौनकच्या मेहनतीमुळे यश मिळाले. बाहेरून परीक्षा देऊनही शौनकला दहावीत ६६ टक्के गुण मिळाले आहेत.वेदाभ्यास सुरूचतो करीत असलेला वेदाभ्यास बारा वर्षांचा आहे. त्यातील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. पुढचा अभ्यास तो सुरूच ठेवणार आहे. याचबरोबर आणखी दोन वर्षांनंतर तो बाहेरून बारावीचीही परीक्षा जिद्दीने देणार आहे. शिकण्याची जिद्द त्याच्या चेहऱ्यावर दिसते.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालRatnagiriरत्नागिरी