शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

शाळा सुटल्यानंतर तीन वर्षांनी दहावी, शौनक जोशीची परिस्थिती बेताची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:33 IST

कित्येक मुले आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी केवळ शिक्षणाच्या प्रेमापोटी परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे जात आहेत. गणपतीपुळे येथील शौनक गजानन जोशी या मुलानेही सातवीनंतर शिक्षण थांबले असतानाच रत्नागिरीतील रामकृष्ण सुर्वे दहावी अभ्यास वर्गात प्रवेश घेऊन दहावीत ६६ टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे वेदाभ्यास करत असतानाच त्याने ही परीक्षा दिली.

ठळक मुद्देशाळा सुटल्यानंतर तीन वर्षांनी दहावी, शौनक जोशीची परिस्थिती बेताचीशाळा सोडून वेदाभ्यास, परिश्रमपूर्वक अभ्यास

शोभना कांबळे रत्नागिरी :  कित्येक मुले आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी केवळ शिक्षणाच्या प्रेमापोटी परिश्रमपूर्वक अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत पुढे जात आहेत. गणपतीपुळे येथील शौनक गजानन जोशी या मुलानेही सातवीनंतर शिक्षण थांबले असतानाच रत्नागिरीतील रामकृष्ण सुर्वे दहावी अभ्यास वर्गात प्रवेश घेऊन दहावीत ६६ टक्के गुण मिळविले आहेत. विशेष म्हणजे वेदाभ्यास करत असतानाच त्याने ही परीक्षा दिली.शौनकचे वडील गणपतीपुळे येथील मंदिरात पुजारी आहेत. लहान बहीण शिवानी आता नववीत आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयात सातवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या शौनकने वेदाभ्यास करावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी त्याला अलिबाग येथील वेद पाठशाळेत प्रवेश घेऊन दिला. या शाळेत तीन वर्षे झाल्यानंतर त्याला काही कारणास्तव ही शाळा सोडावी लागली आणि तो परत घरी आला.त्याला रत्नागिरीच्या वेदपाठ शाळेत प्रवेश घेतल्याने तो रत्नागिरीत त्याच्या काकांकडे राहू लागला. हा अभ्यासक्रम पूर्ण करतानाच दहावीची परीक्षा देण्याची त्याची तीव्र इच्छा होती. ती पूर्णही झाली. रत्नागिरीतील गरजू आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या स्वराज्य संस्था चालवीत असलेल्या कै. रामकृष्ण सदाशिव सुर्वे दहावी अभ्यास वर्गाविषयी त्याला माहिती मिळाली. ही संस्था गेली आठ वर्षे अशा मुलांना अभ्यासात मदत करून बाहेरून दहावीची परीक्षा देण्यास मदत करीत आहे. या अभ्यासवर्गातून अनेक मुले दहावी परीक्षा उत्तीर्ण करून आज स्वत:च्या पायावर उभी आहेत. काही पुढचे शिक्षण घेत आहेत.शौनकने दहावीची परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त करताच स्वराज्य संस्थेचे जितेंद्र शिवगण यांनी त्याला मदत करून या अभ्यासवर्गात बसवले. ऑगस्टमध्ये या अभ्यासवर्गात आलेल्या शौनकने मन लावून अभ्यास करण्यास सुरूवात केली. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत दहावी अभ्यासवर्ग, त्यानंतर २ ते ६ वेद पाठशाळा असे दोन्ही अभ्यासक्रम सांभाळत त्याने परीक्षेची तयारी सुरू केली. घरी आल्यानंतर तो दोन तास नेटाने अभ्यास करायचा. काही वेळा तो पौरोहित्यासाठीही जायचा.अभ्यासवर्गात मार्गदर्शन करणाऱ्या सुवर्णा चौधरी, सोनाली डाफळे, दीपाली डाफळे, पल्लवी पवार, कुशल जाधव, सुविधा गाडेकर, अपेक्षा पाटील यांनी त्याला शिकविण्यास सुरूवात केली. यावेळी दहावीचा अभ्यासक्रम बदलला असल्याने या सर्वांकरिता आव्हानच होते. त्यातच यावर्षीपासून मिळणारे अधिकचे २० गुणही बंद करण्यात आले आहेत. मात्र, या मार्गदर्शनामुळे आणि शौनकच्या मेहनतीमुळे यश मिळाले. बाहेरून परीक्षा देऊनही शौनकला दहावीत ६६ टक्के गुण मिळाले आहेत.वेदाभ्यास सुरूचतो करीत असलेला वेदाभ्यास बारा वर्षांचा आहे. त्यातील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. पुढचा अभ्यास तो सुरूच ठेवणार आहे. याचबरोबर आणखी दोन वर्षांनंतर तो बाहेरून बारावीचीही परीक्षा जिद्दीने देणार आहे. शिकण्याची जिद्द त्याच्या चेहऱ्यावर दिसते.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालRatnagiriरत्नागिरी