शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

रेल्वेच्या मोफत ‘वाय-फाय’चे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 23:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अडीच महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. लवकरच गणेशोत्सवाची गर्दी सुरू होणार असताना रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावंतवाडीसह अनेक स्थानकांवरील वायफाय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते अडीच महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधेचा अनेक ठिकाणी बोजवारा उडाला आहे. लवकरच गणेशोत्सवाची गर्दी सुरू होणार असताना रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावंतवाडीसह अनेक स्थानकांवरील वायफाय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत कोकण रेल्वे मार्गावर २८ स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्याच्या उपक्रमास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. प्रवाशांना, पर्यटकांना या सेवेचा लाभ मिळावा म्हणून रेल्वे मंत्रालयाने कोलाडपासून ते मडुरेपर्यंत २८ रेल्वे स्थानकांवर सिस्कॉन व जॉयस्टर या कंपन्यांकडून ‘जॉयस्पॉट’ ही वायफाय सेवा घेतली आहे. या सेवेचे रिसिव्हर बसविल्यानंतर सर्व २८ रेल्वे स्थानकांवरील २४ तास मोफत वायफाय सेवा उपक्रमाचे प्रातिनिधिक उदघाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २१ मे २0१७ रोजी कुडाळ स्थानकावर केले होते.कोकण रेल्वे मार्गावर कोलाड, माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, खेड, अंजनी, चिपळुण, कामथे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड व मडुरे या स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपक्रमाची सुरुवात २१ मेपासून करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. केंद्रात कोकणातील सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेला चांगले दिवस आले आहेत. कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांना अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकांवरील २४ तास मोफत वायफाय सेवा ही त्यातीलच एक महत्वाची सुविधा मानली जात आहे. मात्र काही महत्वाच्या स्थानकांवर ही सेवा महिनाभरापासून तर काही ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.काही स्थानकांवर चांगली सेवाचिपळुण, खेड, कणकवली, कुडाळ या रेल्वे स्थानकांवरील जॉयस्पॉट वायफाय सेवा मात्र चांगल्या प्रकारे सुरू असल्याचेही प्रवाशांकडून सांगण्यात आले. अन्य स्थानकांवरही ही सेवा चांगल्या प्रकारे मिळावी, अशी प्रवाशांची मागणी आहे. अशी चांगली सेवा मिळाल्यास रेल्वेतून प्रवास करताना कोणत्याही स्थानकावरून नातेवाईकांशी संपर्क साधणे प्रवाशांना शक्य होणार आहे. सध्या मार्गावरील अनेक ठिकाणी कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नाही, अशी स्थिती आहे.