शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

वैद्यकीय सेवेचे तीनतेरा

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

फुणगूस केंद्र : आरोग्य व्यवस्थेबाबत सामान्यांमध्ये नाराजी

फुणगूस : जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आडमुठ्या धोरणामुळे फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार म्हणजे वाऱ्यावरची वरात झाली आहे. कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांची वानवा असून, सातत्याने रिक्त पदे भरण्याबाबत मागणी करुनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खाडीभागातील जनतेच्या संतापाचा पारा चढला असून, याची जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास येथील जनता खाडीभाग हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य अनिल ऊर्फ पप्पू सुर्वे यांनी दिला आहे.सुमारे २० ते २५ गावांतील जनतेच्या रुग्णसेवेसाठी येथील आरोग्य केंद्र हे एकमेव आधार केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या क्षेत्राचा विस्तार तसेच रुग्णसंख्या पाहता येथे कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांची वानवा आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. अंकुश वानखडे यांची गडचिरोली येथे प्रशासकीय बदली झाल्यानंतर एकमेव कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण तपासणीसह शालेय विद्यार्थी तपासणी, उपकेंद्र भेटी, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया कॅम्प, तालुका तसेच जिल्हा सभा आदी केंद्रबाह्य कामांसाठी जावे लागते. मैलोन्मैल अंतरावरुन येणाऱ्या रुग्णांना बऱ्याच वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत ताटकळत राहावे लागते, तर काही वेळा हिरमुसले होत तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. या भागात जवळपास खासगी वा शासकीय दवाखाना नसल्याने प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना आरोग्यकेंद्र हेच एकमेव आधारस्तंभ आहे. परंतु मुख्यालयी महिला आरोग्यसेविका नसल्याची वर्षभर ओरड आहे.वैशाली यादव यांच्या प्रशासकीय बदलीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या संबंधित यंत्रणेला त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्याचा विसर पडला आहे. उपकेंद्र महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना फिरतीची कामे, सभा आदी कार्यक्रम दिवसभरात आटोपून आळीपाळीने आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी मुख्यालयाचाही कारभार सांभाळावा लागत आहे. तीच तऱ्हा उपकेंद्रांचीही आहे. पोचरी येथे सुशोभित उपकेंद्राची इमारत असून, येथे सहा ते सात वर्षे पुरुष आरोग्यसेवक तसेच मांजरे येथेही सात ते आठ वर्षे पुरुष आरोग्यसेवक नाही. त्यामुळे येथील लोक गावच्या ठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सेवा तसेच आरोग्यविषयक जनजागृतीपासून वंचित आहेत. येथील ग्रामपंचायत स्तरावरुन ठरावपत्र देण्यात आले. परंतु त्याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संपूर्ण खाडीभाग जनतेतून संतापाचा सूर निघत आहे. आता तरी हा खेळ थांबवावा अन्यथा खाडीभागातील जनता आपला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा खाडीभाग येथील ग्रामस्थांच्यावतीने अनिल ऊर्फ पप्पू सुर्वे यांनी दिला आहे. फूणगूसचा हा प्रश्न कायमचा सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)