शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

वैद्यकीय सेवेचे तीनतेरा

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

फुणगूस केंद्र : आरोग्य व्यवस्थेबाबत सामान्यांमध्ये नाराजी

फुणगूस : जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आडमुठ्या धोरणामुळे फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार म्हणजे वाऱ्यावरची वरात झाली आहे. कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांची वानवा असून, सातत्याने रिक्त पदे भरण्याबाबत मागणी करुनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खाडीभागातील जनतेच्या संतापाचा पारा चढला असून, याची जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास येथील जनता खाडीभाग हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य अनिल ऊर्फ पप्पू सुर्वे यांनी दिला आहे.सुमारे २० ते २५ गावांतील जनतेच्या रुग्णसेवेसाठी येथील आरोग्य केंद्र हे एकमेव आधार केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या क्षेत्राचा विस्तार तसेच रुग्णसंख्या पाहता येथे कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांची वानवा आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. अंकुश वानखडे यांची गडचिरोली येथे प्रशासकीय बदली झाल्यानंतर एकमेव कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण तपासणीसह शालेय विद्यार्थी तपासणी, उपकेंद्र भेटी, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया कॅम्प, तालुका तसेच जिल्हा सभा आदी केंद्रबाह्य कामांसाठी जावे लागते. मैलोन्मैल अंतरावरुन येणाऱ्या रुग्णांना बऱ्याच वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत ताटकळत राहावे लागते, तर काही वेळा हिरमुसले होत तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते. या भागात जवळपास खासगी वा शासकीय दवाखाना नसल्याने प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना आरोग्यकेंद्र हेच एकमेव आधारस्तंभ आहे. परंतु मुख्यालयी महिला आरोग्यसेविका नसल्याची वर्षभर ओरड आहे.वैशाली यादव यांच्या प्रशासकीय बदलीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या संबंधित यंत्रणेला त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्याचा विसर पडला आहे. उपकेंद्र महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना फिरतीची कामे, सभा आदी कार्यक्रम दिवसभरात आटोपून आळीपाळीने आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी मुख्यालयाचाही कारभार सांभाळावा लागत आहे. तीच तऱ्हा उपकेंद्रांचीही आहे. पोचरी येथे सुशोभित उपकेंद्राची इमारत असून, येथे सहा ते सात वर्षे पुरुष आरोग्यसेवक तसेच मांजरे येथेही सात ते आठ वर्षे पुरुष आरोग्यसेवक नाही. त्यामुळे येथील लोक गावच्या ठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सेवा तसेच आरोग्यविषयक जनजागृतीपासून वंचित आहेत. येथील ग्रामपंचायत स्तरावरुन ठरावपत्र देण्यात आले. परंतु त्याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संपूर्ण खाडीभाग जनतेतून संतापाचा सूर निघत आहे. आता तरी हा खेळ थांबवावा अन्यथा खाडीभागातील जनता आपला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा खाडीभाग येथील ग्रामस्थांच्यावतीने अनिल ऊर्फ पप्पू सुर्वे यांनी दिला आहे. फूणगूसचा हा प्रश्न कायमचा सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)