शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

चिपळूणवर तिहेरी संकट; मदतीसाठी पूरग्रस्तांचा टाहो; यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हजारोंचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 00:06 IST

दिवसभरात लोकांपर्यंत मदत पोहोचलीच नसल्याने अनेकांचा जीव मेटाकुटीला

रत्नागिरी - कुणी स्वयंपाकघरात ओट्यावर दिवसभर उभे आहे, कुणी तासनतास पोटमाळ्याचा आधार घेतला आहे, अगदीच नाईलाज झाल्याने कुणी कौलावर चढून मुसळधार पावसात उभे आहे. जगण्यासाठीची ही धडपड आहे चिपळुणातील पूरग्रस्तांची.

पहाटेपासून आलेला महापूर अजून कायम आहे. पुन्हा समुद्राची भरती सुरू झाली आहे आणि पावसाचा जोर कायम आहे. भरीस भर कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने तेथून पाण्याचा विसर्ग कधीही करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही रात्र पूरग्रस्तांसाठी खूप अवघड ठरणार आहे.

तब्बल १३-१४ तास पुराचे पाणी कायम असल्याने आणि दिवसभरात लोकांपर्यंत मदत पोहोचलीच नसल्याने पुरात अडकलेले शेकडो लोक मदतीसाठी संदेश पाठवत आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत मदत गेलेली नाही. एनडीआरएफचे जवान उशिरापर्यंत पोहोचलेले नाहीत. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने फायबर बोटी त्यात टिकत नाहीत. त्यामुळे पूरग्स्तांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आलेली नाही. स्थानिक स्वयंसेवी संस्था मदतीला गेल्या असल्या तरी तरी बोटी नसल्याने त्यांच्या मदतीला मर्यादा आल्या.

हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नाही. वीज नसल्याने सायंकाळनंतर सर्व भाग अंधारला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भयभीत झाले असून मदतीसाठी टाहो फोडत आहेत.

टॅग्स :chiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा