शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नादुरुस्त पाणी योजनांमुळे हजारो लोकांना झळ

By admin | Updated: March 22, 2017 13:42 IST

३१ नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त, २६ गावातील ५० वाड्यातील लोक पाण्यासाठी त्रस्त, दुरुस्तीवर १ कोेटी ६० लाख रुपये खर्च येणार

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : जिल्ह्यातील ३१ नळपाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने ग्रामीण भागातील हजारो लोकांना त्याची झळ पोहोचत आहे. त्यामुळे या योजनांची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी ६० लाख रुपये प्रशासनाकडून खर्च करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून नळ पाणी पुरवठा योजना, विंधन विहीरी, विहीरी आदिंवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये नळपाणी पुरवठा योजनांचे जाळे विस्तारलेले आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या पाण्याची सोय झाली आहे.

जिल्ह्यात जीवन प्राधिकरण आणि जलस्वराज प्रकल्प या अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. जीवन प्राधिकरणाच्या काही योजना वादग्रस्त ठरल्या होत्या. त्याचबरोबर जलस्वराज प्रकल्पामध्ये राबविण्यात आलेल्या जिल्ह्यात दोन-तीन योजनामध्ये निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. मात्र, लोकांना पुरेसा पाणी पुरवठा होत असतानाच जिल्ह्यातील काही योजना नादुुरुस्त झाल्या होत्या. त्यापैकी ३१ नळ पाणी योजना उन्हाळ्यामध्ये दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे. तालुका नादुरुस्त योजनामंडणगड१०दापोली०५खेड०५गुहागर०२रत्नागिरी०१लांजा०५राजापूर०३एकूण------ ३१

या योजना नादुरुस्त झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जनतेला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होतो. त्यामुळे पाण्यासाठी विहीरी, विंधन विहीरींचा आधार घ्यावा लागतो. या योजना दुरुस्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या योजनांच्या दुरुस्तीला जिल्हा प्रशासनाने मंजूरीही दिली आहे. (शहर वार्ताहर)

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थांना उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कारण ३१ नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने २६ गावातील ५० वाड्यांमधील हजारो लोकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. या योजनांची दुरुस्ती झाल्यास हजारो लोकांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.