शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

नादुरुस्त पाणी योजनांमुळे हजारो लोकांना झळ

By admin | Updated: March 22, 2017 13:42 IST

३१ नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त, २६ गावातील ५० वाड्यातील लोक पाण्यासाठी त्रस्त, दुरुस्तीवर १ कोेटी ६० लाख रुपये खर्च येणार

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : जिल्ह्यातील ३१ नळपाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने ग्रामीण भागातील हजारो लोकांना त्याची झळ पोहोचत आहे. त्यामुळे या योजनांची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी ६० लाख रुपये प्रशासनाकडून खर्च करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून नळ पाणी पुरवठा योजना, विंधन विहीरी, विहीरी आदिंवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये नळपाणी पुरवठा योजनांचे जाळे विस्तारलेले आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या पाण्याची सोय झाली आहे.

जिल्ह्यात जीवन प्राधिकरण आणि जलस्वराज प्रकल्प या अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. जीवन प्राधिकरणाच्या काही योजना वादग्रस्त ठरल्या होत्या. त्याचबरोबर जलस्वराज प्रकल्पामध्ये राबविण्यात आलेल्या जिल्ह्यात दोन-तीन योजनामध्ये निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. मात्र, लोकांना पुरेसा पाणी पुरवठा होत असतानाच जिल्ह्यातील काही योजना नादुुरुस्त झाल्या होत्या. त्यापैकी ३१ नळ पाणी योजना उन्हाळ्यामध्ये दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे. तालुका नादुरुस्त योजनामंडणगड१०दापोली०५खेड०५गुहागर०२रत्नागिरी०१लांजा०५राजापूर०३एकूण------ ३१

या योजना नादुरुस्त झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जनतेला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होतो. त्यामुळे पाण्यासाठी विहीरी, विंधन विहीरींचा आधार घ्यावा लागतो. या योजना दुरुस्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या योजनांच्या दुरुस्तीला जिल्हा प्रशासनाने मंजूरीही दिली आहे. (शहर वार्ताहर)

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थांना उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कारण ३१ नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने २६ गावातील ५० वाड्यांमधील हजारो लोकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. या योजनांची दुरुस्ती झाल्यास हजारो लोकांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.