शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

नादुरुस्त पाणी योजनांमुळे हजारो लोकांना झळ

By admin | Updated: March 22, 2017 13:42 IST

३१ नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त, २६ गावातील ५० वाड्यातील लोक पाण्यासाठी त्रस्त, दुरुस्तीवर १ कोेटी ६० लाख रुपये खर्च येणार

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : जिल्ह्यातील ३१ नळपाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने ग्रामीण भागातील हजारो लोकांना त्याची झळ पोहोचत आहे. त्यामुळे या योजनांची लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असून, त्यासाठी १ कोटी ६० लाख रुपये प्रशासनाकडून खर्च करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी उपाययोजना म्हणून नळ पाणी पुरवठा योजना, विंधन विहीरी, विहीरी आदिंवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे आजही ग्रामीण भागामध्ये नळपाणी पुरवठा योजनांचे जाळे विस्तारलेले आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेच्या पाण्याची सोय झाली आहे.

जिल्ह्यात जीवन प्राधिकरण आणि जलस्वराज प्रकल्प या अंतर्गत नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या होत्या. जीवन प्राधिकरणाच्या काही योजना वादग्रस्त ठरल्या होत्या. त्याचबरोबर जलस्वराज प्रकल्पामध्ये राबविण्यात आलेल्या जिल्ह्यात दोन-तीन योजनामध्ये निकृष्ठ दर्जाचे काम करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. मात्र, लोकांना पुरेसा पाणी पुरवठा होत असतानाच जिल्ह्यातील काही योजना नादुुरुस्त झाल्या होत्या. त्यापैकी ३१ नळ पाणी योजना उन्हाळ्यामध्ये दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनांची तालुकानिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे. तालुका नादुरुस्त योजनामंडणगड१०दापोली०५खेड०५गुहागर०२रत्नागिरी०१लांजा०५राजापूर०३एकूण------ ३१

या योजना नादुरुस्त झाल्याने त्याचा परिणाम ग्रामीण भागातील जनतेला करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होतो. त्यामुळे पाण्यासाठी विहीरी, विंधन विहीरींचा आधार घ्यावा लागतो. या योजना दुरुस्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. या योजनांच्या दुरुस्तीला जिल्हा प्रशासनाने मंजूरीही दिली आहे. (शहर वार्ताहर)

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो ग्रामस्थांना उन्हाळ्यापूर्वीच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. कारण ३१ नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त झाल्याने २६ गावातील ५० वाड्यांमधील हजारो लोकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे. या योजनांची दुरुस्ती झाल्यास हजारो लोकांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.