शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

राजापूर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या काळात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाण्याच्या गळतीबाबत नगर ...

राजापूर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या काळात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाण्याच्या गळतीबाबत नगर परिषद प्रशासन गंभीर नसल्याची बाब वारंवार पुढे येत आहे. शहरात वरचीपेठ महापुरूष मंदिर रोड परिसरात गेले तीन ते चार दिवस पाईपलाईन फुटून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या बेजबाबदार कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राजापूर शहराला दरवर्षी तीव्र पाणीटंचाई भेडसावते. प्रारंभी एक दिवसाआड तर मे महिन्यात दोन दिवसाआड शहरात पाणी पुरवठा केला जातो. यावर्षीही एप्रिलमध्ये एक दिवसाआड तर मेमध्ये दोन दिवसाआड पाणी दिले जात होते. मात्र, १६ मे रोजी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने राजापूरकरांना दिलासा दिला. या कालावधीत मुसळधार झालेल्या पावसामुळे शहराला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणारे कोदवली धरण तुडुंब भरून वाहू लागले आणि शहरात पुन्हा एकदा नियमित सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरू झाला.

दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईतून आजही नगर परिषद प्रशासनाने काही बोध घेतलेला नाही, हे मात्र पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. गेले काही दिवस वरचीपेठ भागात कोंढेतडकडे जाणाऱ्या पाणी पुरवठा वाहिनीला गळती लागली आहे. दररोज या वाहिनीतून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. महापुरूष मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावरून रात्रं-दिवस हे पाणी वाहत आहे. याबाबत तक्रार करूनही नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही.