शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:22 IST

राजापूर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या काळात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाण्याच्या गळतीबाबत नगर ...

राजापूर : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या काळात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पाण्याच्या गळतीबाबत नगर परिषद प्रशासन गंभीर नसल्याची बाब वारंवार पुढे येत आहे. शहरात वरचीपेठ महापुरूष मंदिर रोड परिसरात गेले तीन ते चार दिवस पाईपलाईन फुटून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या बेजबाबदार कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राजापूर शहराला दरवर्षी तीव्र पाणीटंचाई भेडसावते. प्रारंभी एक दिवसाआड तर मे महिन्यात दोन दिवसाआड शहरात पाणी पुरवठा केला जातो. यावर्षीही एप्रिलमध्ये एक दिवसाआड तर मेमध्ये दोन दिवसाआड पाणी दिले जात होते. मात्र, १६ मे रोजी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने राजापूरकरांना दिलासा दिला. या कालावधीत मुसळधार झालेल्या पावसामुळे शहराला नैसर्गिकरित्या पाणी पुरवठा करणारे कोदवली धरण तुडुंब भरून वाहू लागले आणि शहरात पुन्हा एकदा नियमित सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरू झाला.

दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईतून आजही नगर परिषद प्रशासनाने काही बोध घेतलेला नाही, हे मात्र पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. गेले काही दिवस वरचीपेठ भागात कोंढेतडकडे जाणाऱ्या पाणी पुरवठा वाहिनीला गळती लागली आहे. दररोज या वाहिनीतून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. महापुरूष मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावरून रात्रं-दिवस हे पाणी वाहत आहे. याबाबत तक्रार करूनही नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने याकडे लक्ष दिलेले नाही.