शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपाचे हजारो रुपये बिल; शेतकरी हैराण

By admin | Updated: March 11, 2016 00:02 IST

अडूरची घटना : मीटर कापल्याने नारळी-पोफळींची बाग सुकली

असगोली : शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असताना गुहागर तालुक्यातील महावितरण कंपनी आपल्या चुका लपवण्यासाठी आणि मार्चपूर्वी वसुली दाखवण्यासाठी शेतकऱ्याचा नाहक बळी देत असल्याचा प्रकार अडूर नागझरीतील प्रकाश मांडवकर यांच्या बाबतीत घडला आहे.मांडवकर यांनी एप्रिल २००९ साली कागदपत्रांची पूर्तता करून शेती आणि नारळी - पोफळींच्या बागायतीसाठी विद्युत शेतीपंप कनेक्शन घेतले होते. ३ एचपीचा त्यांचा शेती पंप आहे. नवीन मीटरचे पैसे भरुनसुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जुना मीटर बसवून दिला. त्यानंतर महावितरणने ३० आॅक्टोबर २००९ साली ११० रुपयांचे पहिले बिल दिले होते, तेही कोणतेही युनिट न पाहता. त्यानंतर चार वर्षांनी मार्च २०१३मध्ये ४७० रुपयांचे बिल दिले, त्यावेळीही रिडिंग घेण्यात आले नव्हते. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये ६०० रुपयांचे बिल दिले होते, त्यावेळीही रिडिंग घेण्यात आले नव्हते. ही सर्व बिले शेतकरी प्रकाश मांडवकर यांनी वेळेत त्यांच्या खात्यामध्ये भरली आहेत. वारंवार याबाबत चौकशी करुनसुद्धा तीन महिन्यांनी त्यांना मीटरचे योग्य रिडिंग घेऊन बिले देण्यात आली नाहीत. त्यानंतर दिनांक २१ जानेवारी २०१६ रोजी १७,५६० एवढ्या रकमेचे बिल दिले.यावेळी मात्र त्यांनी मीटर रिडिंग घेतले. तब्बल दोन वर्षांनी बिल दिले. महावितरणनेच दिलेल्या माहितीनुसार मीटर बिल हे सरासरी तीन महिन्यांचे ११० युनिट आहे. मात्र, सप्टेंबर २०१५मध्ये ६० युनिट दाखवत असताना तेच डिसेंबर २०१५मध्ये २०,०१५ एवढे युनिट दाखवले आणि १७,५६१ रुपये एवढी रक्कम भरण्यास सांगितल्याने शेतकऱ्याला मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.दिलेल्या नोटीसीनुसार चौकशी सुरु असतानाच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज मीटरची जोडणी बंद केल्याने बागायत सुकू लागली आहे. याबाबत महावितरण कंपनी, गुहागरचे अधिकारी जाधव यांच्याकडे चर्चा केली असता याबाबत म्हणावा तसा खुलासा केला नाही. आम्ही नियमानुसार रिडिंग घेऊन बिल दिले आहे. तुम्हाला मीटर तपासणी करायची असेल तर ५०० रुपये आधी पैसे भरा, मग मीटर कनेक्शन देतो, असा सल्ला दिला आणि त्या शेतकऱ्याच्या विषयाला धुडकावून लावले. याबाबत तहसीलदार, गुहागर यांच्याकडे ही तक्रार केली असता त्यांनी महावितरणचे अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार आपण यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करु शकत नाही. तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्याची सूचना शेतकऱ्याला दिली आणि विषय थांबवला.या सर्व प्रकारावरून शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे न्याय मिळू न शकल्याने शेतकरी प्रकाश मांडवकर यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आधी पैसे भरा, मगच पुन्हा जोडणी करतो, असे महावितरणने स्पष्ट सांगितल्याने जिवापाड वाढवलेली बागायत पाण्याविना सुकून जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)