शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

शेतीपंपाचे हजारो रुपये बिल; शेतकरी हैराण

By admin | Updated: March 11, 2016 00:02 IST

अडूरची घटना : मीटर कापल्याने नारळी-पोफळींची बाग सुकली

असगोली : शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असताना गुहागर तालुक्यातील महावितरण कंपनी आपल्या चुका लपवण्यासाठी आणि मार्चपूर्वी वसुली दाखवण्यासाठी शेतकऱ्याचा नाहक बळी देत असल्याचा प्रकार अडूर नागझरीतील प्रकाश मांडवकर यांच्या बाबतीत घडला आहे.मांडवकर यांनी एप्रिल २००९ साली कागदपत्रांची पूर्तता करून शेती आणि नारळी - पोफळींच्या बागायतीसाठी विद्युत शेतीपंप कनेक्शन घेतले होते. ३ एचपीचा त्यांचा शेती पंप आहे. नवीन मीटरचे पैसे भरुनसुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जुना मीटर बसवून दिला. त्यानंतर महावितरणने ३० आॅक्टोबर २००९ साली ११० रुपयांचे पहिले बिल दिले होते, तेही कोणतेही युनिट न पाहता. त्यानंतर चार वर्षांनी मार्च २०१३मध्ये ४७० रुपयांचे बिल दिले, त्यावेळीही रिडिंग घेण्यात आले नव्हते. त्यानंतर जानेवारी २०१४मध्ये ६०० रुपयांचे बिल दिले होते, त्यावेळीही रिडिंग घेण्यात आले नव्हते. ही सर्व बिले शेतकरी प्रकाश मांडवकर यांनी वेळेत त्यांच्या खात्यामध्ये भरली आहेत. वारंवार याबाबत चौकशी करुनसुद्धा तीन महिन्यांनी त्यांना मीटरचे योग्य रिडिंग घेऊन बिले देण्यात आली नाहीत. त्यानंतर दिनांक २१ जानेवारी २०१६ रोजी १७,५६० एवढ्या रकमेचे बिल दिले.यावेळी मात्र त्यांनी मीटर रिडिंग घेतले. तब्बल दोन वर्षांनी बिल दिले. महावितरणनेच दिलेल्या माहितीनुसार मीटर बिल हे सरासरी तीन महिन्यांचे ११० युनिट आहे. मात्र, सप्टेंबर २०१५मध्ये ६० युनिट दाखवत असताना तेच डिसेंबर २०१५मध्ये २०,०१५ एवढे युनिट दाखवले आणि १७,५६१ रुपये एवढी रक्कम भरण्यास सांगितल्याने शेतकऱ्याला मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.दिलेल्या नोटीसीनुसार चौकशी सुरु असतानाच महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज मीटरची जोडणी बंद केल्याने बागायत सुकू लागली आहे. याबाबत महावितरण कंपनी, गुहागरचे अधिकारी जाधव यांच्याकडे चर्चा केली असता याबाबत म्हणावा तसा खुलासा केला नाही. आम्ही नियमानुसार रिडिंग घेऊन बिल दिले आहे. तुम्हाला मीटर तपासणी करायची असेल तर ५०० रुपये आधी पैसे भरा, मग मीटर कनेक्शन देतो, असा सल्ला दिला आणि त्या शेतकऱ्याच्या विषयाला धुडकावून लावले. याबाबत तहसीलदार, गुहागर यांच्याकडे ही तक्रार केली असता त्यांनी महावितरणचे अधिकारी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या उत्तरानुसार आपण यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करु शकत नाही. तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करण्याची सूचना शेतकऱ्याला दिली आणि विषय थांबवला.या सर्व प्रकारावरून शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारे न्याय मिळू न शकल्याने शेतकरी प्रकाश मांडवकर यांची आर्थिक कोंडी झाली आहे. आधी पैसे भरा, मगच पुन्हा जोडणी करतो, असे महावितरणने स्पष्ट सांगितल्याने जिवापाड वाढवलेली बागायत पाण्याविना सुकून जाणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. (वार्ताहर)