शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पर्यटकांना ‘थर्टी फर्स्ट’ आणि नव्या वर्षाच्या स्वागताचे वेध; 'या' ठिकाणांना पसंती, बुकिंग झाले फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 13:11 IST

३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि १ जानेवारी २०२२ रोजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक उत्सुक. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थाने दि. २ जानेवारीपर्यंत आरक्षित झाली आहेत.

रत्नागिरी : कोरोनाच्या काळात झाकोळलेल्या पर्यटन क्षेत्राला कोरोनाचे निर्बंध काही अंशी शिथिल होताच पुन्हा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. कोरोनाविषयक सर्व त्या नियमांचे पालन करून ‘थर्टी फर्स्ट’ आणि नव्या वर्षाभिनंदनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सज्ज झाले आहे. दि. २ जानेवारीपर्यंत महामंडळाची कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील निवासस्थाने आरक्षित झाली आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली आणि कुणकेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे आणि गुहागर तालुक्यात वेळणेश्वर येथे निवासव्यवस्था आहेत. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप आणि १ जानेवारी २०२२ रोजी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटक उत्सुक झाले आहेत. त्याचबरोबर आता नाताळच्या सुटीतही कोकणात पर्यटन करण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे.

यंदाही थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाभिनंदनासाठी पर्यटकांकडून पर्यटन महामंडळाच्या तीनही जिल्ह्यांमधील निवासस्थानांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. यंदा २० ते २४ डिसेंबर या कालावधीत ७५ टक्के आरक्षण झाले असून, दि. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीसाठी ९५ टक्के आरक्षण झाले आहे. हे आरक्षण १०० टक्के होण्याचा विश्वास महामंडळाकडून व्यक्त होत आहे.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. पर्यटकांसाठी गणपतीपुळे येथे बोट क्लब सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. तसेच गणपतीपुळे दर्शन सहल हा नवा उपक्रम सुरू केला असून, त्यासाठी बॅटरी ऑपरेटेड कार उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथे ‘योगा बाय द बीच’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यामुळे आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीनही जिल्ह्यांतील महामंडळाच्या रिसाेर्टमध्ये वास्तव्य करणाऱ्या पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे.

- कोरोनाकाळात लाॅकडाऊन झाल्याने या काळात पर्यटन महामंडळाची निवासस्थाने बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे महामंडळाचे अतोनात नुकसान झाले. मात्र, निर्बंध उठताच महामंडळाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कोरोनाविषयक खबरदारी घेत पुन्हा सज्जता ठेवली आहे. सर्व खोल्या सातत्याने निर्जंतूक करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मास्कचा वापर सक्तीचा केला असून, फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीनेही काळजी घेतली जात आहे.

- कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांमध्ये विविध प्रकाराचे काैशल्य निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. हा उपक्रम दर सहा महिन्यांनी राबविला जात आहे. पुण्यातील शासकीय कॅटरिंग काॅलेजच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण दिले जाते. सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

२५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत विविध सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम, खेळ, स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. कृषी पर्यटनावरही अधिक भर दिला जाणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत पर्यटकांना विविध सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. - दीपक माने, प्रादेशिक अधिकारी (कोकण विभाग), महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNew Yearनववर्षtourismपर्यटन