शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या नूर खान बेसवर हल्ला; Video समोर आला...
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

कोरोनामुळे चोरटेही घरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा ...

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला आहे. काेराेनाच्या भीतीमुळे चोऱ्यांचेही प्रमाण घटले असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०१९ मध्ये ३५६, सन २०२० मध्ये २३३ चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. मात्र, एप्रिल २०२१ अखेरपर्यंत केवळ ७८ चोरीच्या घटना घडल्या आहेत.

कोरोनाने सन २०२० मध्ये सगळी आर्थिक गणित बिघडून टाकली होती. पहिले काही दिवस सगळे व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ‘वर्क फ्राॅम होम’ला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या तर पोलीस २४ तास रस्त्यावर तैनात झाले. या सर्व परिस्थितीचा परिणाम सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत झाला. काेराेनामुळे अनेकजण घरात असल्याने चाेरट्यांनीही त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे चाेरीचे प्रमाण कमी झाले असून, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत ७८ चाेरीच्या घटना घडल्याची नाेंद झाली आहे.

..........................

खुनाचे प्रमाण कमी

लाॅकडाऊनच्या कालावधीत खुनाचे प्रमाणही खूप कमी आल्याचे दिसत आहे. सन २०१९ मध्ये १५ खुनाच्या घटना घडल्या हाेत्या. तर सन २०२० मध्ये १७ घटना घडल्या हाेत्या. यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत केवळ ३ खुनाच्या घटना घडल्या आहेत.

...............................

बलात्काराच्या घटनांमध्येही घट

लाॅकडाऊनमुळे सारेच घरात असल्याने नातेवाइकांचा एकमेकांशी संवाद वाढला आहे. अनेकजण आपल्या कुटुंबातच राहत असल्याने घरी एकटे राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. घरातील माणसे सुरक्षित आहेत. तसेच एकमेकांच्या घरी जाणेही बंद झाले आहे. याचा चांगला परिणाम दिसत असून, बलात्कारांच्या घटनांमध्येही घट झाली आहे. सन २०१९ मध्ये तब्बल ४७ बलात्काराच्या घटना घडल्या हाेता. सन २०२१ मध्ये ३९ हाेत्या तर यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत २३ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

.............................

लोक सध्या घरात आहेत, तसेच पोलिसांची गस्तही सुरू आहे, हे चोऱ्या कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. दुसरे कारण असे, की यंत्रणाही मेहनत घेतेय, त्यामुळे चोऱ्यांचा छडा लवकर लागतोय. चोऱ्यांमधील मुद्देमाल जास्तीत जास्त हस्तगत करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरते. गस्तीबरोबरही नाकाबंदी सुरुच आहे. घराच्या आवारात सीसीटीव्ही लावा व त्याचा डिव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा. नागरिकांनीही सतर्क राहावे. बाहेर जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

डाॅ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी