शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

कोरोनामुळे चोरटेही घरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा ...

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन झाले आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला आहे. काेराेनाच्या भीतीमुळे चोऱ्यांचेही प्रमाण घटले असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सन २०१९ मध्ये ३५६, सन २०२० मध्ये २३३ चाेरीच्या घटना घडल्या हाेत्या. मात्र, एप्रिल २०२१ अखेरपर्यंत केवळ ७८ चोरीच्या घटना घडल्या आहेत.

कोरोनाने सन २०२० मध्ये सगळी आर्थिक गणित बिघडून टाकली होती. पहिले काही दिवस सगळे व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ‘वर्क फ्राॅम होम’ला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या तर पोलीस २४ तास रस्त्यावर तैनात झाले. या सर्व परिस्थितीचा परिणाम सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत झाला. काेराेनामुळे अनेकजण घरात असल्याने चाेरट्यांनीही त्याचा धसका घेतला आहे. त्यामुळे चाेरीचे प्रमाण कमी झाले असून, एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत ७८ चाेरीच्या घटना घडल्याची नाेंद झाली आहे.

..........................

खुनाचे प्रमाण कमी

लाॅकडाऊनच्या कालावधीत खुनाचे प्रमाणही खूप कमी आल्याचे दिसत आहे. सन २०१९ मध्ये १५ खुनाच्या घटना घडल्या हाेत्या. तर सन २०२० मध्ये १७ घटना घडल्या हाेत्या. यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत केवळ ३ खुनाच्या घटना घडल्या आहेत.

...............................

बलात्काराच्या घटनांमध्येही घट

लाॅकडाऊनमुळे सारेच घरात असल्याने नातेवाइकांचा एकमेकांशी संवाद वाढला आहे. अनेकजण आपल्या कुटुंबातच राहत असल्याने घरी एकटे राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. घरातील माणसे सुरक्षित आहेत. तसेच एकमेकांच्या घरी जाणेही बंद झाले आहे. याचा चांगला परिणाम दिसत असून, बलात्कारांच्या घटनांमध्येही घट झाली आहे. सन २०१९ मध्ये तब्बल ४७ बलात्काराच्या घटना घडल्या हाेता. सन २०२१ मध्ये ३९ हाेत्या तर यावर्षी एप्रिल अखेरपर्यंत २३ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

.............................

लोक सध्या घरात आहेत, तसेच पोलिसांची गस्तही सुरू आहे, हे चोऱ्या कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. दुसरे कारण असे, की यंत्रणाही मेहनत घेतेय, त्यामुळे चोऱ्यांचा छडा लवकर लागतोय. चोऱ्यांमधील मुद्देमाल जास्तीत जास्त हस्तगत करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरते. गस्तीबरोबरही नाकाबंदी सुरुच आहे. घराच्या आवारात सीसीटीव्ही लावा व त्याचा डिव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा. नागरिकांनीही सतर्क राहावे. बाहेर जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

डाॅ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी