शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

साठेच काँग्रेसमुक्त करतील

By admin | Updated: January 15, 2016 00:47 IST

प्रमोद रावराणे : वैभववाडी काँग्रेस तालुकाध्यक्षांवर पलटवार, भाजपमध्ये पक्षनिष्ठा महत्वाची

वैभववाडी : साठे आणि कंपनीच्या कारस्थानांना कंटाळून वर्षभरात अनेकांनी काँग्रेस पक्ष सोडला असून उरली सुरली काँग्रेसही संपवून साठे वैभववाडी काँग्रेसमुक्त करतील, असे टीकास्त्र सोडत भाजपमध्ये पद देताना पक्षनिष्ठा तपासली जाते. पदासाठी नेत्यांची हुजरेगिरी करावी लागत नाही, असा पलटवार भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी पत्रकाद्वारे काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे यांच्यावर केला आहे.रावराणे यांनी आमदार नीतेश राणेंवर केलेल्या टीकेला साठे यांनी उत्तर दिले होते. साठेंनी पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला रावराणे यांनी बुधवारी पत्रकाद्वारे उत्तर दिले. भाजपमध्ये कर्तृत्वावर पदे मिळतात. कोणाच्या शिफारशीने किंवा आदेशाने मिळत नाहीत. त्यामुळे माजी आमदार प्रमोद जठार यांची सहानुभूती मिळवण्यासाठी मी आमदार राणेंवर टीका केली. हे साठेंचे विधान हास्यास्पद आहे. मी २५ वर्षे भाजपात निष्ठेने काम करीत आहे. मी एकदाही पक्ष बदलला नाही आणि मरेपर्यंत बदलणार नाही. परंतु रोज पक्ष बदलणाऱ्या साठेंना पक्षनिष्ठा काय कळणार? उद्या आपण कोणत्या पक्षात असू याची त्यांना खात्री आहे का? असा सवाल रावराणेंनी केला आहे. मी विधानसभेला काम केले नाही हा जावईशोध लावणाऱ्या साठेंनी लोकसभेला नीलेश राणेंचा आणि तत्पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव साठेंनी ठरवून केला होता का? असा प्रश्न उपस्थित करीत पुतना मावशीच्या प्रेमाचे धडे साठे आपल्याच कार्यकर्त्यांना कसे देतात हे त्यांचे जवळचे सहकारी अनुभवत आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत साठेंनी कशी मदत केली हे दिगंबर पाटीलच सांगू शकतील. साठेंच्या अकार्यक्षमतेमुळेच आमदार राणेंना महिनाभर वैभववाडीत तळ ठोकावा लागला होता. वैभववाडीत काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला हे अरविंद रावराणे, नासीर काझी, दिगंबर पाटील व विकास काटे यांचे श्रेय आहे. त्यात साठेंनी आपले योगदान काय याचे आत्मचिंतन करावे. रावराणे यांनी पत्रकात म्हटले आहे की, भाजपचे नगरसेवक सज्जनराव रावराणे, सुचित्रा कदम, रवींद्र्र तांबे, सरिता रावराणे तसेच शिवसेनेचे नगरसेवक रोहन रावराणे, संतोष पवार हे काँग्रेसचेच क्रियाशील कार्यकर्ते होते. परंतु साठे व त्रिकुटाच्या मनमानीला कंटाळून त्यांना पक्षांतर करणे भाग पडले. भालचंद्र साठे आणि कंपनी सतत नेत्यांचे कान फुंकून कुरघोड्या करीत असल्यानेच नारायण राणे यांना जयेंद्र्र रावराणेंसारखा निष्ठावंत कार्यकर्ता गमावावा लागला. जयेंद्र रावराणे हे युतीचे तालुक्यातील नेते आहेत. त्यांच्यामुळेच विरोधी आठ नगरसेवक निवडून आले हे मान्य करतात. मग अशा नेत्याला पक्ष सोडण्यास कोणी भाग पाडले याचेही उत्तर साठेंनी द्यावे. (प्रतिनिधी)रावराणे : साठे मन की बात आवर्जून सांगाचआमदार नीतेश राणे यांनी निवडलेले स्विकृत नगरसेवक संताजी रावराणे, नगराध्यक्ष रवींद्र रावराणे तसेच जिल्हा बँकेचे निवडून आलेले संचालक दिगंबर पाटील ही नावे साठेंच्या मनाप्रमाणे की मनाविरुद्ध ही 'मन की बात' त्यांनी आवर्जून सांगावी. असे आव्हान देत आमदार राणे आणि सतीश सावंत यांचे एकमत करायला साठे कधी बसले होते त्याची माहिती साठेंनी आम्हाला द्यावी. आणि पुतना मावशीचे प्रेम काय असते ते आपल्या या दोन नेत्यांना विचारावे, असा सल्ला प्रमोद रावराणे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.