शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांमध्ये अजूनही गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. जनजागृतीवर भर दिला गेला. तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. एप्रिल महिन्यात ११ हजार रुग्ण सापडल्यानंतर आता मे महिन्यातही पहिल्या पाच दिवसात अडीच हजाराहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तरीही अजून लोकांमध्ये गांभीर्य नाही, अशी स्थिती दिसत आहे.

एप्रिल महिन्याच्या ३० दिवसात रोज ३७५ च्या सरासरीने ११ हजार २५४ रुग्ण सापडले. मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात रोज ५१३ या सरासरीने २,५६६ रुग्ण सापडले आहेत. ही स्थिती चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा या तीनही माध्यमातून आणि त्या त्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीवर मोठा भर दिला जात आहे. मात्र तरीही अजून रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही. अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरी भागात मात्र संचारबंदीचा पूर्ण बट्ट्याबोळ केला जात आहे.

संसर्ग हेच कोरोनावाढीचे एकमेव कारण असल्याने संचारबंदीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. लोक एकमेकांच्या कमी संपर्कात येणे, हा या संचारबंदीचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडावे, अशी त्यात सवलत असून, सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला किंवा जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी मुभा आहे. मात्र रोज या वेळेत आणि या वेळेनंतरही लोकांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. भाजी खरेदीसाठी रोज इतक्या प्रमाणात होणारी गर्दीही अनाकलनीय वाटावी, अशीच आहे. या गर्दीमुळे संचारबंदीचा, कोरोना रोखण्याचा उपाय कधीही साध्य होणार नाही, हे वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट दिसत आहे.

आरोग्याच्या सुविधा

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्याच्या सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ऑक्सिजन, कोविड सेंटर्स, बेड्‌सची संख्या या साऱ्याची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचे रोजच्या घडामोडींवर उत्तम नियंत्रण आहे. कुठे काय स्थिती आहे, काय गरजा आहेत, याकडे हे दोन्ही अधिकारी आणि त्यांच्या टीम व्यवस्थित लक्ष देत आहेत.

लोकांचे सहकार्य नाहीच

आरोग्याच्या वाढलेल्या सुविधा आणि त्यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण निश्चित झाल्यानंतरचे आहेत. रुग्ण कमी व्हावेत, यासाठी लोकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुळात तेथेच अजूनही रत्नागिरी जिल्हा कमी पडत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लोकांकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते अजूनही मिळत नाही, हे रस्त्यावरच्या रोजच्या गर्दीवरून दिसत आहे.

रस्त्यावर शतपावली

रात्रीच्यावेळी अनेक लोक शतपावलीसाठी रस्त्यावर येत असल्याचे चित्रही रत्नागिरीत दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही, महिला, मुले, घरातील ज्येष्ठ मंडळी रात्री रस्त्यावर शतपावली घालताना दिसतात. त्यांना कोरोनाची गंभीरता अजूनही कळलेली नाही.