शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांमध्ये अजूनही गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. जनजागृतीवर भर दिला गेला. तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. एप्रिल महिन्यात ११ हजार रुग्ण सापडल्यानंतर आता मे महिन्यातही पहिल्या पाच दिवसात अडीच हजाराहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तरीही अजून लोकांमध्ये गांभीर्य नाही, अशी स्थिती दिसत आहे.

एप्रिल महिन्याच्या ३० दिवसात रोज ३७५ च्या सरासरीने ११ हजार २५४ रुग्ण सापडले. मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात रोज ५१३ या सरासरीने २,५६६ रुग्ण सापडले आहेत. ही स्थिती चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा या तीनही माध्यमातून आणि त्या त्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीवर मोठा भर दिला जात आहे. मात्र तरीही अजून रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही. अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरी भागात मात्र संचारबंदीचा पूर्ण बट्ट्याबोळ केला जात आहे.

संसर्ग हेच कोरोनावाढीचे एकमेव कारण असल्याने संचारबंदीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. लोक एकमेकांच्या कमी संपर्कात येणे, हा या संचारबंदीचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडावे, अशी त्यात सवलत असून, सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला किंवा जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी मुभा आहे. मात्र रोज या वेळेत आणि या वेळेनंतरही लोकांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. भाजी खरेदीसाठी रोज इतक्या प्रमाणात होणारी गर्दीही अनाकलनीय वाटावी, अशीच आहे. या गर्दीमुळे संचारबंदीचा, कोरोना रोखण्याचा उपाय कधीही साध्य होणार नाही, हे वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट दिसत आहे.

आरोग्याच्या सुविधा

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्याच्या सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ऑक्सिजन, कोविड सेंटर्स, बेड्‌सची संख्या या साऱ्याची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचे रोजच्या घडामोडींवर उत्तम नियंत्रण आहे. कुठे काय स्थिती आहे, काय गरजा आहेत, याकडे हे दोन्ही अधिकारी आणि त्यांच्या टीम व्यवस्थित लक्ष देत आहेत.

लोकांचे सहकार्य नाहीच

आरोग्याच्या वाढलेल्या सुविधा आणि त्यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण निश्चित झाल्यानंतरचे आहेत. रुग्ण कमी व्हावेत, यासाठी लोकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुळात तेथेच अजूनही रत्नागिरी जिल्हा कमी पडत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लोकांकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते अजूनही मिळत नाही, हे रस्त्यावरच्या रोजच्या गर्दीवरून दिसत आहे.

रस्त्यावर शतपावली

रात्रीच्यावेळी अनेक लोक शतपावलीसाठी रस्त्यावर येत असल्याचे चित्रही रत्नागिरीत दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही, महिला, मुले, घरातील ज्येष्ठ मंडळी रात्री रस्त्यावर शतपावली घालताना दिसतात. त्यांना कोरोनाची गंभीरता अजूनही कळलेली नाही.