शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सर्वसामान्यांमध्ये अजूनही गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. जनजागृतीवर भर दिला गेला. तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. एप्रिल महिन्यात ११ हजार रुग्ण सापडल्यानंतर आता मे महिन्यातही पहिल्या पाच दिवसात अडीच हजाराहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तरीही अजून लोकांमध्ये गांभीर्य नाही, अशी स्थिती दिसत आहे.

एप्रिल महिन्याच्या ३० दिवसात रोज ३७५ च्या सरासरीने ११ हजार २५४ रुग्ण सापडले. मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात रोज ५१३ या सरासरीने २,५६६ रुग्ण सापडले आहेत. ही स्थिती चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा या तीनही माध्यमातून आणि त्या त्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीवर मोठा भर दिला जात आहे. मात्र तरीही अजून रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही. अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरी भागात मात्र संचारबंदीचा पूर्ण बट्ट्याबोळ केला जात आहे.

संसर्ग हेच कोरोनावाढीचे एकमेव कारण असल्याने संचारबंदीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. लोक एकमेकांच्या कमी संपर्कात येणे, हा या संचारबंदीचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडावे, अशी त्यात सवलत असून, सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला किंवा जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी मुभा आहे. मात्र रोज या वेळेत आणि या वेळेनंतरही लोकांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. भाजी खरेदीसाठी रोज इतक्या प्रमाणात होणारी गर्दीही अनाकलनीय वाटावी, अशीच आहे. या गर्दीमुळे संचारबंदीचा, कोरोना रोखण्याचा उपाय कधीही साध्य होणार नाही, हे वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट दिसत आहे.

आरोग्याच्या सुविधा

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्याच्या सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ऑक्सिजन, कोविड सेंटर्स, बेड्‌सची संख्या या साऱ्याची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचे रोजच्या घडामोडींवर उत्तम नियंत्रण आहे. कुठे काय स्थिती आहे, काय गरजा आहेत, याकडे हे दोन्ही अधिकारी आणि त्यांच्या टीम व्यवस्थित लक्ष देत आहेत.

लोकांचे सहकार्य नाहीच

आरोग्याच्या वाढलेल्या सुविधा आणि त्यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण निश्चित झाल्यानंतरचे आहेत. रुग्ण कमी व्हावेत, यासाठी लोकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुळात तेथेच अजूनही रत्नागिरी जिल्हा कमी पडत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लोकांकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते अजूनही मिळत नाही, हे रस्त्यावरच्या रोजच्या गर्दीवरून दिसत आहे.

रस्त्यावर शतपावली

रात्रीच्यावेळी अनेक लोक शतपावलीसाठी रस्त्यावर येत असल्याचे चित्रही रत्नागिरीत दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही, महिला, मुले, घरातील ज्येष्ठ मंडळी रात्री रस्त्यावर शतपावली घालताना दिसतात. त्यांना कोरोनाची गंभीरता अजूनही कळलेली नाही.