शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सर्वसामान्यांमध्ये अजूनही गांभीर्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आधी जमावबंदी, मग संचारबंदी करून झाली. रुग्णालयातील सुविधा वाढविण्यात आल्या. कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या. जनजागृतीवर भर दिला गेला. तरीही कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. एप्रिल महिन्यात ११ हजार रुग्ण सापडल्यानंतर आता मे महिन्यातही पहिल्या पाच दिवसात अडीच हजाराहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तरीही अजून लोकांमध्ये गांभीर्य नाही, अशी स्थिती दिसत आहे.

एप्रिल महिन्याच्या ३० दिवसात रोज ३७५ च्या सरासरीने ११ हजार २५४ रुग्ण सापडले. मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात रोज ५१३ या सरासरीने २,५६६ रुग्ण सापडले आहेत. ही स्थिती चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा या तीनही माध्यमातून आणि त्या त्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीवर मोठा भर दिला जात आहे. मात्र तरीही अजून रस्त्यावरची गर्दी कमी होत नाही. अनेक गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरी भागात मात्र संचारबंदीचा पूर्ण बट्ट्याबोळ केला जात आहे.

संसर्ग हेच कोरोनावाढीचे एकमेव कारण असल्याने संचारबंदीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. लोक एकमेकांच्या कमी संपर्कात येणे, हा या संचारबंदीचा मुख्य उद्देश आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोकांनी घराबाहेर पडावे, अशी त्यात सवलत असून, सकाळी ११ वाजेपर्यंत भाजीपाला किंवा जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी मुभा आहे. मात्र रोज या वेळेत आणि या वेळेनंतरही लोकांची रस्त्यावर गर्दी दिसत आहे. भाजी खरेदीसाठी रोज इतक्या प्रमाणात होणारी गर्दीही अनाकलनीय वाटावी, अशीच आहे. या गर्दीमुळे संचारबंदीचा, कोरोना रोखण्याचा उपाय कधीही साध्य होणार नाही, हे वाढणाऱ्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट दिसत आहे.

आरोग्याच्या सुविधा

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्याच्या सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंत्री उदय सामंत यांनी ऑक्सिजन, कोविड सेंटर्स, बेड्‌सची संख्या या साऱ्याची गांभीर्याने दखल घेत आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांचे रोजच्या घडामोडींवर उत्तम नियंत्रण आहे. कुठे काय स्थिती आहे, काय गरजा आहेत, याकडे हे दोन्ही अधिकारी आणि त्यांच्या टीम व्यवस्थित लक्ष देत आहेत.

लोकांचे सहकार्य नाहीच

आरोग्याच्या वाढलेल्या सुविधा आणि त्यासाठी सर्व प्रयत्न रुग्ण निश्चित झाल्यानंतरचे आहेत. रुग्ण कमी व्हावेत, यासाठी लोकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. मुळात तेथेच अजूनही रत्नागिरी जिल्हा कमी पडत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी लोकांकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते अजूनही मिळत नाही, हे रस्त्यावरच्या रोजच्या गर्दीवरून दिसत आहे.

रस्त्यावर शतपावली

रात्रीच्यावेळी अनेक लोक शतपावलीसाठी रस्त्यावर येत असल्याचे चित्रही रत्नागिरीत दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही, महिला, मुले, घरातील ज्येष्ठ मंडळी रात्री रस्त्यावर शतपावली घालताना दिसतात. त्यांना कोरोनाची गंभीरता अजूनही कळलेली नाही.