शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अखंड राज्याच्या वल्गना करू नयेत

By admin | Updated: May 4, 2016 23:50 IST

महेंद्र नाटेकर : स्वतंत्र कोकण राज्य संघटनेची सभा

कणकवली : ज्यांना एकत्र कुटुंब ठेवता येत नाही, त्यांनी अखंड महाराष्ट्र राज्याच्या वल्गना करू नयेत, अशी टीका प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केली.स्वतंत्र कोकण राज्य संघटनेची सभा संघटनेच्या कार्यालयात झाली. यावेळी ते म्हणाले, स्वतंत्र भारत निर्माण करण्याबरोबरच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात कोकणी माणूस आघाडीवर होता. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी समतोल विकासाचे आश्वासन दिले; पण प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप देऊन कोकणाची उपेक्षा केली. त्यांच्यानंतर आलेल्या उर्वरित महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही यशवंतरावांची री ओढली. ७२० किलोमीटर लाभलेली किनारपट्टी, अरबी समुद्र, मासे, जागतिक बंदरे, पर्यटनस्थळे, घनदाट जंगले, वनौषधी, दीड दोनशे इंच कोसळणारा पाऊस, बुद्धिमान व प्रतिभावंत कोकणी माणूस, आदी कोकणची बलस्थाने आहेत. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून कोकणचा विकास करण्याऐवजी उर्वरित महाराष्ट्राच्या नेतृत्वाने नियोजनबद्ध प्रयत्न करून कोकणचा विकास रोखला. परराज्यांतील शक्तिशाली ट्रॉलर्सनी कोकणी मच्छिमारांना उद्ध्वस्त केले, करीत आहेत. जागतिक दर्जाची बंदरे असूनही त्यांचा विकास केला नाही. येथील शेती-बागायतीचा विकास न करता कोकणाला आपली बाजारपेठ बनविली. शासन-प्रशासनाने येथील वृक्षांची कत्तल करून डोंगर बोडके केले. प्रचंड पाऊस पडूनही धरणे अपूर्ण ठेवली किंवा रद्द केली. त्यामुळे सर्व पाणी समुद्रात जाते. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागते. रत्नागिरी-सिंधुदुर्गातील दोन विधानसभा मतदारसंघ घटले आहेत. वैद्यकीय सेवा पुरेशी नसल्याने कोल्हापूर, गोव्याकडे प्राण वाचविण्यासाठी धाव घ्यावी लागते. वैद्यकीय, इंजिनिअरिंग, तांत्रिक शिक्षण, विद्यापीठ, आदी नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे. विना अनुदान व इतर सर्वच शिक्षण संस्थांमध्ये लाच घेतल्याशिवाय प्रवेश मिळत नाही.यावेळी सुरेश हाटे, मोतिराम गोठिवरेकर, वाय. जी. राणे, संजय हंडोरे, प्रा. प्रकाश अधिकारी, शिवाजी देसाई, आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती करणारच कोकणची धरणे झालीच पाहिजेत; पण ती कोकणी माणसासाठी. धरणे बांधल्यामुळे पेयजलाबरोबरच पिके घेता येतील. रेल्वे आहे ती चिकमंगळूरला जाण्यासाठी. हायवे आहे तो गोव्याला जाण्यासाठी. कोकणासाठी काहीही नाही. कोकणच्या सर्व समस्या न सोडवता राज्याचे तुकडे पाडू देणार नाही, अशी वल्गना करणाऱ्यांचा निषेध करतो.ज्या कोकणी माणसांनी देश स्वतंत्र केला, संयुक्त महाराष्ट्र निर्माण केला, तो कोकणी माणूस सर्वंकष विकासासाठी गोवा, उत्तरांचल, मिझोराम, छत्तीसगड, आदी राज्यांप्रमाणे घटनादत्त अधिकाराचा उपयोग करून स्वतंत्र कोकण राज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.