शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

‘त्या’ शाळेच्या वेळेत अद्याप बदल नाही

By admin | Updated: July 15, 2017 14:55 IST

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय

आॅनलाईन लोकमत

आवाशी (जि. रत्नागिरी), दि. १५ : लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या खेड तालुक्यातील त्या तथाकथित शाळेच्या वेळेत अद्याप बदल झालेला नसून, ग्रामीण भागातील वाडीवस्त्यांतून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

खेड तालुक्यातील एका नामांकित संस्थेच्या माध्यमिक शाळेची वेळ विद्यार्थी व पालक यांना विश्वासात न घेताच परस्पर बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २९ जून रोजी प्रसिद्ध केले होते. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा नियमितपणे पूर्वीच्या वेळेत सुरू झाल्या. मात्र, संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांनी संस्थेच्या सोयीसाठी शाळेची वेळ परस्पर बदलल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली.

या माध्यमिक शाळेत परिसरातील जवळपास ५ ते ७ गावातील ५००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार करता काही गावे डोंगराळ व वाहतुकीची सोय नसलेल्या परिसरातील आहेत. साहजिकच या गावातील विद्यार्थ्यांना सध्याच्या वेळेत एस. टी. बसची सोय नाही. परिणामी त्यांना ती वेळ साधण्यासाठी कित्येक अंतर पायपीट करावी लागत आहे. यावरही मुख्याध्यापक यांनी नामी शक्कल लढवत त्यांना खासगी वाहनांची सोय करा, असा भाषिक भुर्दंड बसणारा पर्याय सुचवला.

शालेय विद्यार्थिनींना शासनाकडून मोफत एस. टी. बसची सुविधा देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शाळाच त्यांना खासगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला देत आहेत. म्हणजेच विद्यार्थिनींना मिळणाऱ्या मोफत सुविधेवर टाच आणून पाल्यांना आर्थिक खाईत लोटत आहेत. हे केवळ इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू राहावी, याकरिता चाललेली ही विद्यार्थी-पालकांची गळचेपी नव्हे काय?

१५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर प्रथम दुपारी १२.३० ते ५.३० ही वेळ करण्यात आली. नंतर ती १२ ते ५ करण्यात आली आणि आता ११.३० ते ५ अशी वेळ सुरु आहे. सातत्याने बदलणाऱ्या या वेळेच्या गणिताने शाळेतील अभ्यासक्रमावरही परिणाम होत आहे. एक तासिका कमी झाली तरी विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान आहे. मात्र, याकडे संचालक मडळ, मुख्याध्यापक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.