शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

‘त्या’ शाळेच्या वेळेत अद्याप बदल नाही

By admin | Updated: July 15, 2017 14:55 IST

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय

आॅनलाईन लोकमत

आवाशी (जि. रत्नागिरी), दि. १५ : लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या खेड तालुक्यातील त्या तथाकथित शाळेच्या वेळेत अद्याप बदल झालेला नसून, ग्रामीण भागातील वाडीवस्त्यांतून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

खेड तालुक्यातील एका नामांकित संस्थेच्या माध्यमिक शाळेची वेळ विद्यार्थी व पालक यांना विश्वासात न घेताच परस्पर बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २९ जून रोजी प्रसिद्ध केले होते. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा नियमितपणे पूर्वीच्या वेळेत सुरू झाल्या. मात्र, संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांनी संस्थेच्या सोयीसाठी शाळेची वेळ परस्पर बदलल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली.

या माध्यमिक शाळेत परिसरातील जवळपास ५ ते ७ गावातील ५००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार करता काही गावे डोंगराळ व वाहतुकीची सोय नसलेल्या परिसरातील आहेत. साहजिकच या गावातील विद्यार्थ्यांना सध्याच्या वेळेत एस. टी. बसची सोय नाही. परिणामी त्यांना ती वेळ साधण्यासाठी कित्येक अंतर पायपीट करावी लागत आहे. यावरही मुख्याध्यापक यांनी नामी शक्कल लढवत त्यांना खासगी वाहनांची सोय करा, असा भाषिक भुर्दंड बसणारा पर्याय सुचवला.

शालेय विद्यार्थिनींना शासनाकडून मोफत एस. टी. बसची सुविधा देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शाळाच त्यांना खासगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला देत आहेत. म्हणजेच विद्यार्थिनींना मिळणाऱ्या मोफत सुविधेवर टाच आणून पाल्यांना आर्थिक खाईत लोटत आहेत. हे केवळ इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू राहावी, याकरिता चाललेली ही विद्यार्थी-पालकांची गळचेपी नव्हे काय?

१५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर प्रथम दुपारी १२.३० ते ५.३० ही वेळ करण्यात आली. नंतर ती १२ ते ५ करण्यात आली आणि आता ११.३० ते ५ अशी वेळ सुरु आहे. सातत्याने बदलणाऱ्या या वेळेच्या गणिताने शाळेतील अभ्यासक्रमावरही परिणाम होत आहे. एक तासिका कमी झाली तरी विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान आहे. मात्र, याकडे संचालक मडळ, मुख्याध्यापक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.