शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

‘त्या’ शाळेच्या वेळेत अद्याप बदल नाही

By admin | Updated: July 15, 2017 14:55 IST

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय

आॅनलाईन लोकमत

आवाशी (जि. रत्नागिरी), दि. १५ : लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या खेड तालुक्यातील त्या तथाकथित शाळेच्या वेळेत अद्याप बदल झालेला नसून, ग्रामीण भागातील वाडीवस्त्यांतून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

खेड तालुक्यातील एका नामांकित संस्थेच्या माध्यमिक शाळेची वेळ विद्यार्थी व पालक यांना विश्वासात न घेताच परस्पर बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २९ जून रोजी प्रसिद्ध केले होते. उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा नियमितपणे पूर्वीच्या वेळेत सुरू झाल्या. मात्र, संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांनी संस्थेच्या सोयीसाठी शाळेची वेळ परस्पर बदलल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली.

या माध्यमिक शाळेत परिसरातील जवळपास ५ ते ७ गावातील ५००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भौगोलिकदृष्ट्या विचार करता काही गावे डोंगराळ व वाहतुकीची सोय नसलेल्या परिसरातील आहेत. साहजिकच या गावातील विद्यार्थ्यांना सध्याच्या वेळेत एस. टी. बसची सोय नाही. परिणामी त्यांना ती वेळ साधण्यासाठी कित्येक अंतर पायपीट करावी लागत आहे. यावरही मुख्याध्यापक यांनी नामी शक्कल लढवत त्यांना खासगी वाहनांची सोय करा, असा भाषिक भुर्दंड बसणारा पर्याय सुचवला.

शालेय विद्यार्थिनींना शासनाकडून मोफत एस. टी. बसची सुविधा देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शाळाच त्यांना खासगी वाहनाने प्रवास करण्याचा सल्ला देत आहेत. म्हणजेच विद्यार्थिनींना मिळणाऱ्या मोफत सुविधेवर टाच आणून पाल्यांना आर्थिक खाईत लोटत आहेत. हे केवळ इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू राहावी, याकरिता चाललेली ही विद्यार्थी-पालकांची गळचेपी नव्हे काय?

१५ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर प्रथम दुपारी १२.३० ते ५.३० ही वेळ करण्यात आली. नंतर ती १२ ते ५ करण्यात आली आणि आता ११.३० ते ५ अशी वेळ सुरु आहे. सातत्याने बदलणाऱ्या या वेळेच्या गणिताने शाळेतील अभ्यासक्रमावरही परिणाम होत आहे. एक तासिका कमी झाली तरी विद्यार्थ्यांचेच शैक्षणिक नुकसान आहे. मात्र, याकडे संचालक मडळ, मुख्याध्यापक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे.