शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

आपत्तीच्या वेळी ‘त्यां’चे पोलिसांना सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

रत्नागिरी : घाटात झालेला अपघात असो किंवा नदीत बुडालेली व्यक्ती असो, अशा आपत्तीत मृतांना शोधण्याचे अवघड काम बावनदी पंचक्रोशीतील ...

रत्नागिरी : घाटात झालेला अपघात असो किंवा नदीत बुडालेली व्यक्ती असो, अशा आपत्तीत मृतांना शोधण्याचे अवघड काम बावनदी पंचक्रोशीतील सुमारे २२ ते २५ कार्यकर्ते निवळी बौद्धवाडीतील रमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २५ वर्षे करत आहेत. काही दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी नदीत बुडून मृत्यू झालेल्या विनायक गीते यांचाही मृतदेह या कार्यकर्त्यांनी अवघ्या दीड ते दोन तासात शोधून काढून पोलीस यंत्रणेला सहकार्य केले.

रमेश सावंत, संजय खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ही टीम गेल्या अनेक वर्षांपासून तळमळीने हे काम करत आहे. कुठेही अपघात झाला असेल आणि त्या अपघातात अडकलेल्या व्यक्ती किंवा अडकलेलेे मृतदेह काढण्यासाठी पोलिसांची किंवा अन्य नागरिकांची मदतीची हाक देताच धावून जाते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या भयानक अपघातातील तसेच भरलेल्या नदीत वाहून गेलेले आणि अवघड ठिकाणी अडकलेले असंख्य मृतदेह शोधून काढून पोलिसांच्या तपासकार्यात मदत केली आहे. या पथकात करबुडे, बावनदी निवळी, तळेकांटे पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वीच सप्तलिंगी नदीत विनायक गीते यांनी भरलेल्या नदीत उडी घेतली. दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर त्यांनी रमेश सावंत यांच्या या पथकाचे सहकार्य घेतले आणि अवघ्या दीड तासात गीते यांचा मृतदेह रमेश सावंत, संजय खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश खापरे, संजू सावंत, प्रमोद खापरे, मंगेश भरणकर, पिंटू शिर्के, सागर शिर्के, प्रशांत शिर्के, करबुडे पोलीस पाटील, ओमकार खापरे, प्रमोद रेवाळे, रामदास सावंत, विश्वास नितोरे, राजू खापरे, रोहन रेवाळे यांनी शोधून काढला. यापूर्वीही या पथकाने रत्नागिरी जिल्ह्यात शीळ धरण, वेरळ, लांजा, वडगाव धरण आदी ठिकाणी पोलिसांना मृतदेह शोधून देण्यात सहकार्य केले आहे. यासाठी या कार्यकर्त्यांना रमेश सावंत यांनी प्रात्यक्षिके देऊन तयार केले आहे. तसेच भरलेल्या नदीत प्रशिक्षण देताना ते त्यांची सुरक्षितताही पाहतात. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा लांजा पोलिसांनी सत्कारही केला आहे.

................

निवळी धबधबा येथे काही वर्षांपूर्वी ॲड. शिवप्रसाद महाजनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. यावेळीही या पथकाने अडचणीच्या ठिकाणी असलेले त्यांचे मृतदेह शोधून काढले. यापूर्वी आंबेनळी येथील घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात होऊन सर्वच व्यक्ती मृत झाल्या होत्या. या अवघड घाटात कोसळलेल्या या बसमधील व्यक्तींचे मृतदेह या स्वयंसेवकांनी मोठ्या शर्थीने शोधून काढले होते. यापूर्वी आंबेनळी येथील घाटात कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला अपघात होऊन सर्वच व्यक्ती मृत झाल्या होत्या. या अवघड घाटात कोसळलेल्या या बसमधील व्यक्तींचे मृतदेह या स्वयंसेवकांनी मोठ्या शर्थीने शोधून काढले होते.

.......................................

गाडीचा अपघात किंवा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर अशांचे मृतदेह काढताना पोलिसांची खरी कसरत असते. अशाठिकाणी ते पाण्यात उतरू शकत नाहीत. त्यामुळे अशा अडचणीच्यावेळी आमच्या पथकाला अगदी कुठच्याही वेळी बोलावले तरीही कुठल्याही मोबदल्याची वाट न पाहता आम्ही मदतीला धावून जातो. यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना याबाबत प्रशिक्षणही देत असतो.

- रमेश सावंत, निवळी बौद्धवाडी (ता. रत्नागिरी)