शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत दाखल झालेल्या नव्या बसेस रस्त्यातच पडतायत बंद

By अरुण आडिवरेकर | Updated: June 21, 2023 11:48 IST

दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणाची, हाच खरा प्रश्न

अरुण आडिवरेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी: सहा महिन्यांपूर्वी रत्नागिरी एसटी आगारात दाखल झालेल्या नव्या एसटी रस्त्यात बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे एसटीच्या नव्या गाड्या प्रवाशांना डोकेदूखी ठरत आहेत. मंगळवारी मध्यरात्री मुंबईकडे जाणारी एसटी बस संगमेश्वर येथे बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. रत्नागिरी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करत सहा महिन्यांपूर्वी रत्नागिरीत आगारात २२ गाड्या नव्या कोऱ्या गाड्या दाखल झाल्या होत्या. या गाड्यांपैकी सुटलेली रत्नागिरी - मुंबई सेंट्रल गाडी मंगळवारी मध्यरात्री महामार्गावर संगमेश्वर मध्ये बंद पडली. दुसरी पर्यायी गाडी उपलब्ध करून देण्यास मोठा कालावधी गेल्याने तब्बल साडेतीन तास मुंबई - गोवा महामार्गावर प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

रत्नागिरीतून दुसरी गाडी आल्यानंतर प्रवासी मुंबईकडे रवाना झाले. या साऱ्या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सहा महिन्यातच गाड्या रस्त्यावर बंद पडू लागल्याने गाड्या व त्यांच्या देखभाल दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रत्नागिरी एसटी आगारात मोठा गाजावाजा करून आणण्यात आलेल्या नव्या गाड्या कंत्राटी  स्वरुपात घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी व गाड्यांची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी