शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चिपळूणच्या रानभाज्या महोत्सवाकडे अनेकांची पाठ; अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच खरेदी केल्या भाज्या 

By संदीप बांद्रे | Updated: August 11, 2023 19:09 IST

तालुक्यातून अवघे सहाच महिला बचत गटाचे स्टॉल

चिपळूण : रानभाज्यांविषयीची जनजागृती व त्याची खरेदी, विक्री व्हावी, यादृष्टीने कृषी विभागाने शुक्रवारी (११ ऑगस्ट) रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे तालुकास्तरीय या महोत्सवात शेतकऱ्यांची उपस्थिती न लाभल्याने अखेर हा महोत्सव शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच अनुभवला. इतकेच नव्हे त्यांनीच सर्वाधिक भाज्या खरेदी केल्या. यातूनच रानभाज्या महोत्सव कर्मचाऱ्यांसाठी भरवण्यात आला होता की काय, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला.बहुगूणी असणाऱ्या रानभाज्या केवळ पावसातच मिळत असल्याने त्यांचा स्वाद घेण्यासाठी नागरिक आवर्जून वाट पाहत असतात. याशिवाय आजच्या दैनंदिन जीवनातील भाज्या महाग झाल्याने त्याला पर्याय म्हणून रानभाज्या ठरत आहेत. रानभाज्याविषयी नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृती व्हावे त्याचे महत्त्व कळावे, याशिवाय या भाज्याची महोत्सवाद्वारे खरेदी विक्री व्हावी, यातूनच शेतकऱ्यांसह महिला बचत गटांची आर्थिक उलाढाल व्हावी यासाठी दरवर्षापमाणे यंदाही तालुका कृषी विभागातर्फे पंचायत समितीच्या सभागृहात रानभाज्या महोत्सव आयोजित केला होता.तालुकास्तरीय असणाऱ्या महोत्सवात कृषीने गाजावाजा न केल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, तर इतर नागरिकही उपस्थित नव्हते. शिवाय शंभरहुन अधिक तालुक्यात बचत गट असताना रानभाज्या विक्रीसाठी तालुक्यातून अवघे सहाच महिला बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले होते. मात्र, गर्दी न झाल्याने रानभाज्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न काहीसा बारगळला. विशेष म्हणजेच पंचायत समितीच्या सभागृहात रानभाज्याचा महोत्सव आयोजित करण्यात आल्याने पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांची महोत्सव बघण्यासाठी, तर रानभाज्या खरेदीसाठी एकच गर्दी झाली होती. यातूनच हा रानभाज्या महोत्सव शेतकरी, बचत गट, नागरिक यांच्यासाठी न भरवता तो कर्मचाऱ्यांसाठी भरवण्यात आला, की काय अशी चर्चा सुरू हाेती. बहुगूणी असलेल्या रान भाज्याचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी शासकीय कार्यालयापेक्षा एखाद्या महाविद्यालयात किंवा विभागवार घेणे अपेक्षित होते, असेही काहींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी