शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटलेले 'बसरा' जहाज तब्बल तीन वर्षांनी हटविणार

By अरुण आडिवरेकर | Updated: April 26, 2023 13:00 IST

रत्नागिरी : शहरालगतच्या मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटत आलेले शारजाचे ‘बसरा’ जहाज तब्बल तीन वर्षानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून हटवले जाणार ...

रत्नागिरी: शहरालगतच्या मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी भरकटत आलेले शारजाचे ‘बसरा’ जहाज तब्बल तीन वर्षानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून हटवले जाणार आहे. या जहाजाचे भंगार साहित्य काढून पूर्णपणे हटल्यानंतर तेथील टेट्रापॉडचा बंधारा टाकण्यातील अडथळाही दूर होणार आहे.शारजाचे ऑईल टँक बसरा जहाज डिझेल घेऊन श्रीलंकेकडे जात होते. ३ जून २०२० रोजी निसर्ग वादळाचा धोका असल्याने हे जहाज आश्रयासाठी रत्नागिरी शहरातील भगवती बंदरात आले होते. नांगर टाकून हे जहाज समुद्रात उभे होते.समुद्रातील जोरदार वारे आणि लाटांच्या मार्‍याने या जहाजाचा नांगर तुटला आणि हे जहाज भरकटत मिर्‍या-पंधरामाड समुद्रकिनारी खडकात येऊन अडकले. तब्बल ३ वर्षे हे जहाज याच ठिकाणी अडकून आहे.पाऊस आणि समुद्री लाटांच्या तडाख्यांनी हे जहाज पूर्णपणे निकामी झाल्याने ते भंगारात काढण्यात आले. स्थानिक उद्योजकाने हा व्यवहार केला. त्यानंतर शासन स्तरावरील प्रक्रिया सुरू झाली. ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाचे वस्तू व सेवाकर भरल्यानंतर हे जहाज तेथून हटवण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर समुद्रकिनारी हेलकावे खात अडकून पडलेले बसरा जहाज पावसाळा सुरू होण्यापूर्वी तेथून पूर्णपणे काढले जाणार आहे.मिर्‍या पंधरा माड भागात अडकून पडलेल्या या जहाजामुळे तेथील धूपप्रतिबंधक बंधार्‍याच्या कामात अडथळे येत होते. येथील १५ ते २० मीटर लांबीच्या बंधार्‍याचे काम सोडून पुढील काम करावे लागत होते. त्यामुळे आता लवकरच जहाजाच्या ठिकाणी रखडलेला बंधाराही पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSea Routeसागरी महामार्ग