शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

टंचाईग्रस्त वाड्यांचे रत्नागिरीत त्रिशतक

By admin | Updated: June 8, 2014 00:55 IST

आठवड्यात १२ गावांतील ६२ वाड्यांची वाढ

रत्नागिरी : वादळी वाऱ्यासह पावसाने बरसात करूनही जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात यायचं नाव काढत नाहीये. उलट ती वाढतच आहे. जिल्ह्यात ११९ गावांतील ३०२ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. या टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांसाठी प्रशासनाकडून चार टँकर्स वाढविण्यात आले आहेत. जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांत बऱ्यापैकी पाऊस पडला. काही भागात तर दोन ते तीन तास मुसळधारपणे पाऊस बरसला, पण त्यामुळे एकाही वाडीची तहान भागली नाही. उलट मोठ्या संख्येने वाड्या पाणीटंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत सामील होत आहेत. मागील आठवड्यामध्ये १०७ गावांतील २४० वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू होती. या टंचाईग्रस्तांना शासकीय १२ आणि खासगी १० टँकर अशा एकूण २४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता़ आठवडाभराच्या कालावधीत यामध्ये १२ गावांतील ६० वाड्यांची भर पडली. या टंचाईग्रस्तांसाठी केवळ ४ टँकर्सची वाढ करण्यात आली आहे. मंडणगड व रत्नागिरी या तालुक्यांमध्ये चालू आठवड्यात एकाही गावाची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झालेली नाही. दापोली व लांजा या दोन तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका वाडीची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झाली. गुहागरमध्ये ४ गावांतील २१ वाड्यांची, खेडमध्ये २ गावांतील ६ वाड्यांची, चिपळूणमध्ये ३ गावांतील ११ वाड्यांची आणि संगमेश्वरमध्ये एक गावातील १६ वाड्यांची, तर राजापुरात एका गावातील सहा वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गावे आणि वाड्यांची आठवडाभरात वाढ झालेली आहे. जिल्ह्यात चालू आठवड्यामध्ये मागील आठवड्यापेक्षा टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (शहर वार्ताहर)