शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

टंचाईग्रस्त वाड्यांचे रत्नागिरीत त्रिशतक

By admin | Updated: June 8, 2014 00:55 IST

आठवड्यात १२ गावांतील ६२ वाड्यांची वाढ

रत्नागिरी : वादळी वाऱ्यासह पावसाने बरसात करूनही जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात यायचं नाव काढत नाहीये. उलट ती वाढतच आहे. जिल्ह्यात ११९ गावांतील ३०२ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. या टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांसाठी प्रशासनाकडून चार टँकर्स वाढविण्यात आले आहेत. जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांत बऱ्यापैकी पाऊस पडला. काही भागात तर दोन ते तीन तास मुसळधारपणे पाऊस बरसला, पण त्यामुळे एकाही वाडीची तहान भागली नाही. उलट मोठ्या संख्येने वाड्या पाणीटंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत सामील होत आहेत. मागील आठवड्यामध्ये १०७ गावांतील २४० वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू होती. या टंचाईग्रस्तांना शासकीय १२ आणि खासगी १० टँकर अशा एकूण २४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता़ आठवडाभराच्या कालावधीत यामध्ये १२ गावांतील ६० वाड्यांची भर पडली. या टंचाईग्रस्तांसाठी केवळ ४ टँकर्सची वाढ करण्यात आली आहे. मंडणगड व रत्नागिरी या तालुक्यांमध्ये चालू आठवड्यात एकाही गावाची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झालेली नाही. दापोली व लांजा या दोन तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका वाडीची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झाली. गुहागरमध्ये ४ गावांतील २१ वाड्यांची, खेडमध्ये २ गावांतील ६ वाड्यांची, चिपळूणमध्ये ३ गावांतील ११ वाड्यांची आणि संगमेश्वरमध्ये एक गावातील १६ वाड्यांची, तर राजापुरात एका गावातील सहा वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गावे आणि वाड्यांची आठवडाभरात वाढ झालेली आहे. जिल्ह्यात चालू आठवड्यामध्ये मागील आठवड्यापेक्षा टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (शहर वार्ताहर)