शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

‘जिल्हा नियोजन’ला दहा कोटींचा धनलाभ

By admin | Updated: May 30, 2014 01:00 IST

आराखडा १५० कोटींवर; साकव खर्च मर्यादा वाढली

रत्नागिरी : जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या २०१४-१५ या वर्षीच्या आराखड्यासाठी शासनाने दहा कोटी रुपयांचा वाढीव निधी दिल्याने आता हा आराखडा १५० कोटी रुपयांचा झाला आहे. जिल्हा नियोजन समितीतर्फे जिल्ह्यातील विकासकामे केली जातात. समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतूनही वेगळे उपक्रम राबविले जातात. तसेच लोकांच्या मागणीनुसारही अनेक विकासकामे केली जातात. गतवर्षी २०१३-१४ मध्ये राज्य शासनाने १४० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली होती. कोकण पॅकेजअंतर्गत वाडीजोड रस्त्यांसाठी निधी उपलब्ध नसताना सुचविलेली कामे जिल्हा नियोजनमधून पूर्ण करण्यात आली होती. तेव्हापासूनच साकवांसाठी अधिक तरतूद व्हावी, अशी मागणी केली जात होती. साकव बांधण्यासाठी २० लाख रुपयांची मर्यादा होती. आता ही मर्यादा ३५ लाखांपर्यंत नेण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. यावर्षी वाढीव निधी मिळाला असल्याने या निधीतून प्रामुख्याने साकवांची कामे हाती घेतली जाणार आहेत. गतवर्षी विकासकामांवर १०० टक्के निधी खर्च झाला होता. केवळ एक लाख ८५ हजारांचा निधी अखर्चित होता. यावर्षी पालकमंत्री उदय सामंत यांनी दहा कोटींचा वाढीव निधी मागितला होता. त्यानुसार आता जिल्हा नियोजन समितीला हा निधी मिळाल्याने वार्षिक आराखडा १५० कोटींचा झाला आहे. गतवर्षी निधीचा विनियोग योग्य प्रमाणात झाल्यामुळे जादा रकमेला मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)