शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

दहा उमेदवारांचे अर्ज अवैध

By admin | Updated: September 30, 2014 00:13 IST

महत्त्वाचे उमेदवार ‘सेफ’: उद्या उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील ६५ उमेदवारांपैकी दहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून, ५५ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी (दि. १ ) उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने नेमक्या लढती कशा आणि कोणामध्ये होणार, हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.अर्ज भरण्यास २० आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीचे तीन दिवस काही पक्षांचे उमेदवार निश्चित न झाल्याने अर्ज भरले गेले नाहीत. मंगळवार (दि. २३) पासून ही सुरुवात झाली. त्यानंतर बुधवारी (दि.२४) जिल्ह्यातील तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दि. २५ रोजी पाच , २६ रोजी १७, तर २७ रोजी तब्बल ४१ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे दापोली मतदारसंघात १८ उमेदवार, गुहागरमध्ये आठ उमेदवार, चिपळूणमध्ये १३ उमेदवार, रत्नागिरीमध्ये १३ उमेदवार आणि राजापूरमध्ये १२ उमेदवारांनी अर्ज भरले.आज, सोमवारी या सर्व अर्जांची छाननी त्या-त्या प्रांत कार्यालयात करण्यात आली. यावेळी रत्नागिरीतील अ‍ॅड. बाबा परुळेकर (भाजप), गुहागरमधून प्रशांत शिरगावकर (भाजप), सुरेश कातकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), दापोलीतील किशोर देसाई (राष्ट्रवादी), प्रवीण कोलगे (शेकाप), श्रद्धा दळवी (शिवसेना), बाळासाहेब बेलोसे (काँग्रेस), चिपळूणमधील अशोक जाधव (काँग्रेस) आणि राजापुरातील रूपेश गांगण (भाजप), संदीप कांबळे (रिपाइं) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.आता दापोली मतदारसंघातील १५, गुहागरामधील ६, चिपळूणमधील १२, रत्नागिरीतील १२ आणि राजापुरातील १०, असे एकूण ५५ उमेदवार रिंगणात आहेत. १ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने यापैकी कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक लढविणार, हे चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्वांचेच लक्ष या दिवसाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)४पाचही मतदारसंघांतील प्रमुख असे सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरलेला नाही. दापोलीत किशोर देसाई यांनी राष्ट्रवादीकडून आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातील पक्षाचा अर्ज बाद झाला असला तरी अपक्ष म्हणून ते रिंगणात आहेत.