शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यावरील सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

रानपाट (रत्नागिरी) येथील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी भुरळ घालत आहे. मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळी पर्यटनाचा मोह ...

रानपाट (रत्नागिरी) येथील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी भुरळ घालत आहे.

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसाळी पर्यटनाचा मोह आवरता येत नसल्यामुळे आपसूक पावले निसर्गनिर्मित धबधब्याकडे वळतात. कोरोनामुळे शासकीय निर्बंध लावण्यात आल्याने धबधब्यावरील गर्दी सध्या तरी थांबली आहे. मात्र उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यात भिजताना तसेच धबधब्यासमोर उभे राहून सेल्फी काढण्याचा आनंद वेगळा असतो. अशा वेळी पाय घसरून पडण्याचा धोका असल्याने सेल्फी जिवावर बेतू शकते.

डाेंगरातून उंचावरून सतत कोसळणारे पाणी नदी, ओढ्याला मिळते. साहजिकच पाण्याचा प्रवाह अधिक असतो. पाण्यामुळे दगडावर शैवाल आल्याने पाय घसरण्याचा धोका आहे. पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असताना जीव गमावल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळी सहलीचा आनंद घेताना, सावधानता गरजेची आहे. सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

सूचनांकडे होते दुर्लक्ष

n धबधब्याच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सूचना फलक लावले आहेत.

n सूचनाफलक असतानाही त्यावरील सूचनांचे पालन केले जात नाही

n मित्रमंडळीसमवेत माैजमस्ती करताना, सूचनांचा पडतो विसर

n उंचावरून पाणी पडत असल्याने अंदाज घेऊनच पुढे जावे, मात्र तसे होत नाही.

सावधानता बाळगावी

कुटुंबासह सहलीसाठी बाहेर पडत असताना सहलीचा आनंद घेता यावा, यासाठी सावधानता, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे फलक स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे गर्दी होणाऱ्या धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र त्याचे पालन करण्याचा विसर पडतो. त्यामुळे दुर्घटना घडतात.

- मारूती जगताप, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी ग्रामीण

कोरोनामुळे निर्बंध

निवळीचा धबधबा

रत्नागिरी शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर निवळी गाव असून लोकवस्तीपासून दूरवर हा धबधबा आहे. मात्र गावातूनच धबधब्याकडे जाण्यासाठी मार्ग खडतर व जंगलमय आहे. निवळीसह रानपाट, निवेंडी पानवल गावात धबधबे असून कोरोनामुळे जाण्यास मनाई आहे.

उक्षीचा धबधबा

रत्नागिरी तालुक्यातील व शहरापासून २० ते २२ किलोमीटर असलेल्या उक्षी गावातील धबधब्याचेही आकर्षण असले तरी धबधब्यावर जाण्याचा मार्ग गावातून जातो. कोरोनामुळे धबधब्यावरील गर्दी टाळण्यासाठी बंदी असल्याने पावसाळी भिजण्याचा आनंद घेणे अशक्य होत आहे.