शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
5
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
6
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
7
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
8
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
9
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
10
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
11
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
14
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
15
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
16
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
17
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
18
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
19
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
20
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

धबधब्यावरील सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST

रानपाट (रत्नागिरी) येथील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी भुरळ घालत आहे. मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळी पर्यटनाचा मोह ...

रानपाट (रत्नागिरी) येथील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी भुरळ घालत आहे.

मेहरून नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसाळी पर्यटनाचा मोह आवरता येत नसल्यामुळे आपसूक पावले निसर्गनिर्मित धबधब्याकडे वळतात. कोरोनामुळे शासकीय निर्बंध लावण्यात आल्याने धबधब्यावरील गर्दी सध्या तरी थांबली आहे. मात्र उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यात भिजताना तसेच धबधब्यासमोर उभे राहून सेल्फी काढण्याचा आनंद वेगळा असतो. अशा वेळी पाय घसरून पडण्याचा धोका असल्याने सेल्फी जिवावर बेतू शकते.

डाेंगरातून उंचावरून सतत कोसळणारे पाणी नदी, ओढ्याला मिळते. साहजिकच पाण्याचा प्रवाह अधिक असतो. पाण्यामुळे दगडावर शैवाल आल्याने पाय घसरण्याचा धोका आहे. पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असताना जीव गमावल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळी सहलीचा आनंद घेताना, सावधानता गरजेची आहे. सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

सूचनांकडे होते दुर्लक्ष

n धबधब्याच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सूचना फलक लावले आहेत.

n सूचनाफलक असतानाही त्यावरील सूचनांचे पालन केले जात नाही

n मित्रमंडळीसमवेत माैजमस्ती करताना, सूचनांचा पडतो विसर

n उंचावरून पाणी पडत असल्याने अंदाज घेऊनच पुढे जावे, मात्र तसे होत नाही.

सावधानता बाळगावी

कुटुंबासह सहलीसाठी बाहेर पडत असताना सहलीचा आनंद घेता यावा, यासाठी सावधानता, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे फलक स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे गर्दी होणाऱ्या धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र त्याचे पालन करण्याचा विसर पडतो. त्यामुळे दुर्घटना घडतात.

- मारूती जगताप, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी ग्रामीण

कोरोनामुळे निर्बंध

निवळीचा धबधबा

रत्नागिरी शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर निवळी गाव असून लोकवस्तीपासून दूरवर हा धबधबा आहे. मात्र गावातूनच धबधब्याकडे जाण्यासाठी मार्ग खडतर व जंगलमय आहे. निवळीसह रानपाट, निवेंडी पानवल गावात धबधबे असून कोरोनामुळे जाण्यास मनाई आहे.

उक्षीचा धबधबा

रत्नागिरी तालुक्यातील व शहरापासून २० ते २२ किलोमीटर असलेल्या उक्षी गावातील धबधब्याचेही आकर्षण असले तरी धबधब्यावर जाण्याचा मार्ग गावातून जातो. कोरोनामुळे धबधब्यावरील गर्दी टाळण्यासाठी बंदी असल्याने पावसाळी भिजण्याचा आनंद घेणे अशक्य होत आहे.