शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, भात पिकेल काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ताैक्ते वादळानंतर जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. मान्सूनपूर्व पाऊसही चांगला झाला. त्यामुळे गतवर्षीच्या ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ताैक्ते वादळानंतर जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. मान्सूनपूर्व पाऊसही चांगला झाला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १३४०.४४ मिलिमीटर इतका पाऊस झाला असला तरी ऐन भात लागवडीवेळी पावसाने विश्रांती घेतल्याने लागवडीच्या कामांना ‘ब्रेक’ लागला असून, शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

मान्सूनपूर्व पावसावर पेरण्या केल्याने भाताच्या रोपांची चांगली वाढ झाली. त्यामुळे २१ ते २२ दिवसानंतर शेतकऱ्यांनी लागवडीला प्रारंभ केला. पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रात शेतकरी भात लागवड करत आहेत. मात्र, कडक ऊन्हामुळे लागवड केलेल्या जमिनीला तडे गेले आहेत. रोपे पिवळसर पडली आहेत. लागवड केलेली रोपे वाळू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ज्याठिकाणी पाटाचे पाणी उपलब्ध आहे किंवा मळेशेतीतील भात खाचरातून पाणी आहे, तेथे लागवड केली जात असली, तरी निव्वळ लागवड केल्याचे समाधान मिळत आहे. लागवडीवेळी खते वापरली जात असल्याने सूर्याची उष्णता व खताची उष्णता यामुळे रोपे करपण्याचा धोका आहे. दिवसभरात एखादी सर कोसळते अन्यथा नाही अशीच स्थिती आहे. पावसावरच बहुतांश शेती अवलंबून असल्याने अद्याप ५० टक्केपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होणे बाकी आहे. पावसाअभावी लागवडीला उशीर होणार आहे, तर पाण्याअभावी लागवड केलेली भातशेती धोक्यात आली आहे.

भाताची दुबार पेरणी

अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसावर भाताची पेरणी केली होती. संततधार पावसामुळे काही ठिकाणी भाताची रोपेच रूजली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरलेले भात उगवले असले तरी लागवडीसाठी अद्याप अवधी आहे.

तालुका पाऊस पेरणी

(मिमी) (हेक्टरमध्ये)

मंडणगड ४८६.५७ ४८३.५०

दापोली ६६१.७१ ७२७.४१

खेड ५६२.७२ ९१५.५०

गुहागर ८७१.५५ ६९३.९१

चिपळूण ७१४.६१ ९९०.२७

संगमेश्वर ९१०.१२ ११४७.६८

रत्नागिरी ९६५.१३ ७१८.७०

लांजा ८९४.७२ ७००.००

राजापूर १००५.७८ ७१२.७५

लागवडीची कामे खोळंबली

जिल्ह्यासाठी १३ हजार २७० मेट्रिक टन खत मंजूर झाले असून, आतापर्यंत १० हजार ५०० मेट्रिक टन खताची उपलब्धता झाली आहे. सुरूवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणथळ भागात पेरणी केलेले भात न रूजल्यामुळे काही शेतकऱ्यांनी जागरुकता दाखवत अन्यत्र दुबार पेरणी केली होती. त्यामुळे दुबार पेरलेली रोपे चांगली उगवली असून, शेतकऱ्यांपुढील संकट टळले आहे. मात्र, लागवडीची कामे सुरू असताना, पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे शेतीची कामे मात्र खोळंबली आहेत.

मान्सूनपूर्व पावसामुळे रोहिणी नक्षत्रातच पेरणी उरकण्यात आली होती. रोपे काढून अन्यत्र लागवड करण्यात येते, पावसावरच शेतीची कामे अवलंबून असल्याने लागवडीची कामे थांबली आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या क्षेत्रातील लागवड करण्यात येत असली, तरी प्रखर उष्णतेमुळे पाणी टिकत नाही. त्यामुळे रोपे कोमेजली आहेत.

- मारूती चाळके, शेतकरी

खरीप हंगामातील शेतीसाठी बियाणे व खतांची उपलब्धता वेळेवर करून देण्यात आली होती. पेरण्यांची कामे वेळेवर पूर्ण होऊन लागवडीची कामेही नियोजित वेळेपूर्वी सुरू झाली होती. मात्र, ऐनवेळी पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे लागवडीच्या कामांना विलंब होत आहे. लागवड केलेल्या भात खाचराला शक्य झाल्यास शेतकऱ्यांनी पाणी देणे गरजेचे आहे.

- अजय शेंडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी

पावसावरच शेती अवलंबून आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या क्षेत्रावर लागवड पूर्ण करण्यात आली असून, लागवड केलेल्या क्षेत्राला पाणी देणे शक्य होत आहे. मात्र, पाण्याची उपलब्धताच नसलेल्या क्षेत्रावर लागवडीचा प्रश्न निर्माण झाला असून, दरवर्षी भात लागवडीवेळी निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

- राजेश पागदे, शेतकरी