शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कामांमुळे शिक्षक हतबल

By admin | Updated: October 15, 2015 00:46 IST

दापोली तालुका : अशैक्षणिक कामांचा बोजा

दापोली : शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असा शासननिर्णय असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी जूंपले जात असल्याने शिक्षकवर्गात कमालीची नाराजी आहे. विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत असल्याने पालकांमधून शासनाच्या या धोरणाविरूध्द संताप व्यक्त करण्यात येत आहे. निवडणूक जनगणना आणि आपत्कालीन व्यवस्थापन सारखी कामे वगळून शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये असा शासननिर्णय आहे. शिक्षकाने जास्तीतजास्त वेळ अध्यापनाला दिल्याने यातून सक्षम भावी पिढी घडेल. सन २०२०पर्यंत भारत महासत्ता करण्याच्या दृष्टीने उचलेलेले महत्वाचे पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात होते. हा निर्णय होऊनही सरल प्रणालीच्या नोंदी, आमआदमी विमा योजनेचे अर्ज भरून घेणे ते आॅनलाईन अपलोड करणे, विद्यार्थ्यांचे शाळा स्तरावर जातीचे, उत्पन्नाचे वास्तव्याचे दाखला मागणी अर्ज भरून घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घेणे, राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत पथनाट्य, जनजागृती फेरी विविध स्पर्धा घेऊन ग्रामस्थांना सजग करणे, गावातील शौचालयांची संख्या मोजून प्रत्येक शिक्षकांवर सोपवलेल्या कुटुंबाचा पाठपुरावा करणे, पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून नदी ओढ्यांना किमान १० बंधारे बांधणे या आणि अशा प्रकारच्या विविध कामांना शिक्षकांना जुंपले जात आहे.शाळा विद्यालयामधील भरतीवर असणाऱ्या बंदीमुळे कमी कर्मचारी असतानाही शासनाकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी होणारी शिक्षकांची ससेहोलपट पाहता शैक्षणिक गुणवत्तेचा टक्का घटण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे. सरल प्रणाली, आमआदमी योजना, पायाभूत चाचणी गुण ही माहिती संगणकावर आॅनलाईन भरण्याची सक्ती आहे. सरल प्रणालीची माहिती शाळेच्या बाहेर भरल्यास कठोर कारवाईचे आदेश देताना जिल्ह्यातील ७५ टक्के शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नाही तर ५० टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा शासनाने पुरवलेली नाही या गोष्टींकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. महिना अखेर होणारी सहामाही परीक्षा, १० वी १२ वी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेश अर्ज भरणे, सहामाहीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण करणे अशा जबाबदाऱ्या कमी कर्मचाऱ्यांच्या मदतीने शाळांना पूर्ण कराव्या लागत आहेत. शाळेच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती परीक्षा, सहशालेय उपक्रम क्रीडा स्पर्धा यांच्याकडे लक्ष पुरवण्यासाठी शिक्षक शाळेच्या वेळेपूर्वी येतात व शाळा सुटल्यानंतरही जादा वेळ काम करतात. यामध्ये शासनाच्या विविध योजनांचा भार शिक्षकांवरच सोपवला जात असल्याने शिक्षकांच्या या समस्या सोडवायला आणि भावी विद्यार्थी पिढीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्वसामान्यांना रस्त्यावर उतरावे लागणार असेच चित्र सध्या दिसत आहे. (प्रतिनिधी)शिक्षण विभाग : प्रश्नपत्रिकाच दिलेल्या नाहीतपायाभूत चाचणीचे नियोजन देऊन चाचणीचा प्रत्यक्ष दिवस उजाडला तरी तोंडी परीक्षांचे तर काही ठिकाणी लेखी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकाच दिलेल्या नाहीत. काही ठिकाणी शाळांनाच झेरॉक्स काढायला सांगून त्यांना आर्थिक भूर्दंड देण्याचा प्रकार घडल्याने शासनाच्या धोरणांबाबत कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे. कारवाईचे दाखवले भयप्रत्येक कामाला वेळेचे बंधन देऊन कारवाईचे भय दाखवून शिक्षकांना काम करण्यास भाग पाडले जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर याचा परिणाम होण्याच्या शक्यतेने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.