शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

शिक्षक, विद्यार्थ्यांना मतदान जागृतीचे काम, शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:33 IST

लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून मतदानासंदर्भात जनजागृती करण्याचा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्चपासून राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डी़ बी़ कुलाळ यांनी दिले आहेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत हे जनजागृती कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षकांना अडचणीचे ठरणार असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे़.

ठळक मुद्देशिक्षक, विद्यार्थ्यांना मतदान जागृतीचे काम, शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी महिनाभर जनजागृती कार्यक्रमाचे नियोजन

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून मतदानासंदर्भात जनजागृती करण्याचा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्चपासून राबविण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डी़ बी़ कुलाळ यांनी दिले आहेत. ऐन परीक्षेच्या कालावधीत हे जनजागृती कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षकांना अडचणीचे ठरणार असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे़.दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत़ त्यानंतर आता प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत़ त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक या परीक्षांमध्ये गुंतले आहेत़.हा परीक्षांचा कालावधी सुरु झालेला असतानाच लोकसभा निवडणूक मतदान जनजागृतीचे काम विद्यार्थी आणि शिक्षकांच्या माथी मारण्यात आल्याची भावना शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे़ निवडणुकीचे काम हे राष्ट्रीय काम असले तरी ऐन परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थी व शिक्षकांना ते दिल्याने त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे़.मतदान जनजागृतीचे काम बुधवारपासून सुरु करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना दिले आहेत़ त्यामध्ये बुधवारी पहिल्या दिवशी मतदान जागृतीसंदर्भात विद्यार्थ्यांकडून विविध घोषवाक्य लिहून घेणे व प्रभातफेरीवेळी त्यांचा वापर करणे, रांगोळी स्पर्धा, अंगणवाडी सेविकेच्या मदतीने पालक जागृती सभा व हळदी-कुंकू, प्रत्येक शनिवारी प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, काव्यस्पर्धा, भित्तीचित्र तयार करणे व दर्शनी भागात लावणे, वक्तृत्व स्पर्धा, शिक्षण विभागातील अधिकारी यांची क्षेत्रभेट, प्रश्नमंजुषा, सायकल रॅली, मतदान जागृती दौड, पथनाट्य सादरीकरण, मतदान यंत्राची ओळख व मुलांच्या बोटाला शाई लावणे, गीतमंच, संकल्पपत्रांचे संकलन करणे, शिक्षकांचे मार्गदर्शन व मतदारांची मुलाखत, चालता-बोलता, व्हीव्हीपॅट क्लीप आदी कार्यक्रम दररोज २० एप्रिलपर्यंत राबवायचे आहेत़हा कार्यक्रम दैनंदिन शालेय कामकाज सांभाळून राबवायचा आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची शिक्षकांनी दक्षता घ्यावयाची आहे़.दरम्यान, दिलेल्या नियोजनाप्रमाणे त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ त्याचबरोबर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबतचा रोजचा अहवाल व दैनंदिन उपक्रमांचे पाच फोटो सादर करावयाचे आहेत़ त्यामुळे ऐन परीक्षेच्या कालावधीत शिक्षक निवडणुकीच्या कामात अडकणार असल्याने त्यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRatnagiriरत्नागिरी