शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांप्रमाणे पालक-समाजही तेवढाच जबाबदार

By admin | Updated: July 12, 2014 00:37 IST

गुरूपौर्णिमा विशेष : शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं बदलतंय...

रत्नागिरी : गुरू-शिष्याच्या नात्याला आज शिक्षक - विद्यार्थी अशाच नात्याचं स्वरूप आलं आहे. गुरू-शिष्य या शब्दांनाच खूप अर्थ आहेत. आताच्या काळात तसे गुरू आणि तसे शिष्य अपवादानेच सापडतात. काळाच्या ओघात या नात्यात खूप बदल झाले आहेत. पण, जे शिक्षक विद्यार्थ्यांना समजून घेऊन वागतात, त्यांच्याबद्दल अजूनही विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव दिसतो, तो कृतीतून व्यक्त होतो. म्हणूनच विद्यार्थ्यांशी असलेले शिक्षकाचे नाते गुरू-शिष्याचे नाते ठरावे, यासाठी शिक्षक, पालक आणि समाज या साऱ्यांचीच जबाबदारी महत्त्वाची ठरते.उद्या शनिवारी गुरूपौर्णिमा आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’च्या रत्नागिरी कार्यालयात परिचर्चा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरू-शिष्यांमधील नातं बदलतंय का? या मुख्य विषयावर ही चर्चा झाली. या चर्चेत श्रीमान गंगाधरभाऊ गोविंद पटवर्धन स्कूलचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण, फाटक प्रशालेच्या दाक्षायिणी बोपर्डीकर, शिर्के प्रशालेच्या गुरूकुल प्रकल्पाचे प्रमुख राजेश आयरे आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. आनंद आंबेकर यांनी या विषयावर विविध मते मांडली.चर्चेची सुरूवात ‘गुरू-शिष्य’ याच शब्दावरुन झाली. आज गुरू-शिष्य म्हणण्यासारखी पिढी दिसत नाही. आज अवती-भोवती दिसतात ते शिक्षक आणि विद्यार्थी. हे नातं अधिक व्यवहारी झालं आहे, असं मत प्रतापसिंह चव्हाण यांनी मांडले. शिक्षण प्रक्रिया, पुस्तकं आणि अभ्यासक्रमांचे बदलते स्वरूप यासारख्या अनेक गोष्टींचा परिणाम शिक्षक-विद्यार्थी नात्यावर होतोय, असं मत दाक्षायिणी बोपर्डीकर यांनी मांडलं. हे नातं सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही अर्थांनी बदलतंय, असंही मत त्यांनी मांडलं. जे शिक्षक आज विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेऊन त्यांना दिशा दाखवतात, त्या शिक्षकांबद्दल आजही विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव दिसतो, असे मत प्रा. आनंद आंबेकर यांनी प्रकर्षाने मांडले. शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याचा विचार करताना समाजरचनेचा प्राधान्याने विचार करायला हवा. कारण समाजरचनेचा या नात्यावर खूप परिणाम होतोय, असे मत राजेश आयरे यांनी मांडले.विद्यार्थ्यांच्या मनातला त्यांच्या शिक्षकांबद्दलचा आदर कायम राहील किंवा वाढेल, असं वर्तन पालकांकडून घडायला हवं, असा मुद्दाही या चर्चेतून पुढे आला. शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं अधिक सुदृढ होण्यासाठी मुळात शिक्षकांनी मित्र आणि पालक (ा१्रील्ल िंल्ल िॅ४ं१्िरंल्ल) अशा दोन्ही भूमिकांमधून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधायला हवा. त्याला पालक आणि समाजाकडून तशीच जोड मिळायला हवी, असा निष्कर्ष या चर्चेतून पुढे आला. (प्रतिनिधी)